शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय खताच्या जोरावर फुलवली मिरचीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास तोट्यात असणारी शेेतीही फायद्यात आणता येते, हे राजगुरुनगर येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर : शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास तोट्यात असणारी शेेतीही फायद्यात आणता येते, हे राजगुरुनगर येथील एका शिक्षकाने सिद्ध करून दाखवले आहे. लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्याने पट्याने दिलेली शेती त्यांनी स्वत: कसत ती फायद्यात आणली आहे. त्यांनी मिरची आणि काकडीचे सेंद्रिय पद्धतीने यशस्वी उत्पादन घेत इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील शिक्षक प्रा. विठ्ठलराव दौंडकर असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे आईवडील जमेल तसे शेती करतात. मात्र, वय झाल्यामुळे त्यांना जमत नाही. वाटा पध्दतीने शेती करायला दिली, परंतु गुंतवलेले भांडवल फिटले नाही. गेली दोन वर्षे कोरोना काळात शिकवणी थांबल्या. आॅनलाईन शिकवणी करून हातात असणारा वेळ चांगल्या कामात घालवण्यासाठी शिक्षकी पेशा भरपूर पगार, आरामदायी जीवन असतानाही शेतीतील भांडवल उत्पन्नातून सुटत नाही. मात्र विठ्ठल दौंडकर यांनी स्वत: शेती करायची आणि इतरांपुढे आदर्श ठेवायचा, असे ठरवून राजगुरुनगर शहरात आपले कुटुंबासह रानमळा येथे वास्तव्यास नेले. महाविद्यालयीन वेळेत शैक्षणिक कामकाज करुन पत्नी, दोन मुली आणि आईवडिलांच्या मदतीने एक एकरात कमी पाण्याचा वापर, तण उगवू नये म्हणून मल्चिंग पेपरवर मार्च महिन्यात नियोजन केले. प्रथम आंतरपीक म्हणून उन्हाळ्याचा मौसम पाहून काकडी पीक लावले. त्यानंतर मिरची रोपांची लागवड केली. अडीच महिन्यांत मिरची तोडणी सुरू होण्याअगोदर काकडी पिकाची तोडणी संपवली. या काकडी पिकातून ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. सध्या आठवड्यातून एकदा होणाऱ्या तोड्यातून ८०० किलोचे मिरची उत्पादन मिळत आहे. सध्या हाॅटेल, केंटरिंग बंद असले तरी आज मिरचीला किलोला २८ ते ३२ रुपयांचा चाकणच्या मार्केटला बाजारभाव मिळत आहे. सर्वसाधारण आतापर्यंत या पिकाला एक लाखांचे भांडवल गुंतवले असले तरी आंतरपिकातील काकडीत ५० हजार मिळाल्यामुळे भांडवली खर्च निम्म्यावर आला. मिरचीचे एकूण उत्पादन कमी न होता वाढत जाणार आहे. संपूर्ण पिकाचे १५ तोडे होणार असून असाच बाजारभाव न राहता पावसाळ्यात भाव वाढला, तर या पिकातून चार लाखांचे भांडवली खर्च जाता मिळणार असल्याचे प्रा. विठ्ठलराव दौंडकर यांनी सांगितले.

फोटो ओळ. रानमळा (ता. खेड) येथे शिक्षक विठ्ठलराव दौंडकर यांनी मिरचीचा मळा फुलवला असून भरघोस उत्पादन घेत आहे.