शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

सेंद्रिय खताच्या जोरावर फुलवली मिरचीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास तोट्यात असणारी शेेतीही फायद्यात आणता येते, हे राजगुरुनगर येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर : शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास तोट्यात असणारी शेेतीही फायद्यात आणता येते, हे राजगुरुनगर येथील एका शिक्षकाने सिद्ध करून दाखवले आहे. लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्याने पट्याने दिलेली शेती त्यांनी स्वत: कसत ती फायद्यात आणली आहे. त्यांनी मिरची आणि काकडीचे सेंद्रिय पद्धतीने यशस्वी उत्पादन घेत इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील शिक्षक प्रा. विठ्ठलराव दौंडकर असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे आईवडील जमेल तसे शेती करतात. मात्र, वय झाल्यामुळे त्यांना जमत नाही. वाटा पध्दतीने शेती करायला दिली, परंतु गुंतवलेले भांडवल फिटले नाही. गेली दोन वर्षे कोरोना काळात शिकवणी थांबल्या. आॅनलाईन शिकवणी करून हातात असणारा वेळ चांगल्या कामात घालवण्यासाठी शिक्षकी पेशा भरपूर पगार, आरामदायी जीवन असतानाही शेतीतील भांडवल उत्पन्नातून सुटत नाही. मात्र विठ्ठल दौंडकर यांनी स्वत: शेती करायची आणि इतरांपुढे आदर्श ठेवायचा, असे ठरवून राजगुरुनगर शहरात आपले कुटुंबासह रानमळा येथे वास्तव्यास नेले. महाविद्यालयीन वेळेत शैक्षणिक कामकाज करुन पत्नी, दोन मुली आणि आईवडिलांच्या मदतीने एक एकरात कमी पाण्याचा वापर, तण उगवू नये म्हणून मल्चिंग पेपरवर मार्च महिन्यात नियोजन केले. प्रथम आंतरपीक म्हणून उन्हाळ्याचा मौसम पाहून काकडी पीक लावले. त्यानंतर मिरची रोपांची लागवड केली. अडीच महिन्यांत मिरची तोडणी सुरू होण्याअगोदर काकडी पिकाची तोडणी संपवली. या काकडी पिकातून ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. सध्या आठवड्यातून एकदा होणाऱ्या तोड्यातून ८०० किलोचे मिरची उत्पादन मिळत आहे. सध्या हाॅटेल, केंटरिंग बंद असले तरी आज मिरचीला किलोला २८ ते ३२ रुपयांचा चाकणच्या मार्केटला बाजारभाव मिळत आहे. सर्वसाधारण आतापर्यंत या पिकाला एक लाखांचे भांडवल गुंतवले असले तरी आंतरपिकातील काकडीत ५० हजार मिळाल्यामुळे भांडवली खर्च निम्म्यावर आला. मिरचीचे एकूण उत्पादन कमी न होता वाढत जाणार आहे. संपूर्ण पिकाचे १५ तोडे होणार असून असाच बाजारभाव न राहता पावसाळ्यात भाव वाढला, तर या पिकातून चार लाखांचे भांडवली खर्च जाता मिळणार असल्याचे प्रा. विठ्ठलराव दौंडकर यांनी सांगितले.

फोटो ओळ. रानमळा (ता. खेड) येथे शिक्षक विठ्ठलराव दौंडकर यांनी मिरचीचा मळा फुलवला असून भरघोस उत्पादन घेत आहे.