शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

बिनखर्चात फुलली सेंद्रिय आंब्याची बाग

By admin | Updated: July 2, 2014 02:39 IST

आंबा पिकवण्यासाठी रासायनिक द्रव्ये वापरली जात असल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्यांची निर्यात बंद झाली.

घोडेगाव : आंबा पिकवण्यासाठी रासायनिक द्रव्ये वापरली जात असल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्यांची निर्यात बंद झाली. मात्र, घोडेगावजवळ नितीन काळे या शेतकऱ्याने पूर्ण सेंद्रिय आंब्यांची बाग केली असून, या बागेतील सेंद्रिय आंब्याला मुंबईमध्ये ११०० ते १२०० रुपये डझन भाव मिळत आहे. सन २००४ मध्ये ८ एकर क्षेत्रात सुमारे ३०० आंब्याची व २०० सीताफळाची झाडे लावली. त्यांची जमीन पडीक व पूर्ण मुरमाड, खडकाळ स्वरूपाची होती. यामध्ये २५० हापूस आंब्यांची झाडे आहेत, तर मानखुर्द, आम्रपाली, पेढा, पायरी अशा ५० रावळ जाती आहेत. ही बाग पूर्ण सेंद्रिय करण्याचे ध्येय नितीन काळे व त्यांचे बंधू अभिमन्यू काळे यांनी ठेवले होते. त्याप्रमाणे त्यांनी झाडांना सुकी मासळी, शेणखत, निंबोळी पेंट, अख्खी निंबोळी वेळोवेळी टाकली. तसेच दशोपर्णीची फवारणी केली. दशोपर्णीचे द्रव्य गायीचे मूत्र, शेण व विविध झाडांची पाने टाकून तयार केले जाते. मागील पाच वर्षांपासून आंब्याचे उत्पन्न सुरू झाले आहे. कैरी बाठाला आल्यानंतर पाणी देणे बंद करून टाकतात व फळांना उन्हामुळे डाग पडू नये म्हणून संरक्षणासाठी कागदी पिवशी बसवतात. आंबा तोडण्यासाठी तयार झाल्यानंतर व्यवस्थित देठासह तोडणी केली जाते. तोडलेली फळे पेंढ्यात पिकवली जातात. पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारे रासायनिक औषधे वापरत नाहीत. पिकलेले आंबे बॉक्समध्ये भरून मुंबईला हायपर सिटी व गोदरेज मॉलमध्ये पाठवले जातात.