शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

आधी काम, मग मिळतोय चारा

By admin | Updated: May 11, 2017 04:10 IST

मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार

लोकमत न्यूज नेटवर्ककारेगाव : मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार काही ठराविक रक्कम द्यायचे. परंतु आता चारा हवा असल्यास शेतकऱ्यांच्या शेतात मेंढपाळाना राबावे लागत आहे. त्यामुळे मेंढपाळ अडचणीत सापडला आहे.पुणे जिल्ह्यात कांदाकाढणी अंतिम टप्प्यात आली आहे. कांदापातीचे पाच ते सहा महिने बकरीसाठी खाद्य उपलब्ध होते. परंतु, आधी कांदाकाढणी करा व त्यानंतर दररोज कांदाकाढणी होईपर्यंत कामासाठी मेंढपाळ महिला जात आहेत. त्यामुळे चारा मिळण्यासाठी मेंढपाळाना शेतकऱ्यांच्या शेतात राबावे लागत आहे. उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे सकाळी लवकरच बकरी चारणी करण्यासाठी सोडावी लागत आहेत. त्यामुळे पहाटे उठून मेंढपाळ शेतात राबत आहेत. कोणतेही पीक निघाल्यानंतर त्यात असणारे गवत बकरी खाते. त्यामुळे शेतातील तण आपोआप नष्ट होते. गवत बकरीने खाल्ल्याने शेतकऱ्यांच्या कष्टात बचत होते. तसेच बकरीपासून मिळणारे लेंडीखत जमिनीतील सुपीकता वाढवते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ आहे. तसेच पुणे जिल्ह्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होतो. परंतु याच चारासाठी मेंढपाळ दिवसभर शेतकऱ्यांच्या शेतात राबत आहेत. त्यामुळे एकीकडे चारा नसल्याने मेंढपाळ अडचणीत आला आहे, तर दुसरीकडे त्याला चारा मिळवण्यासाठी कष्ट करावे लागत आहे. बकरी चारावयाची असल्यास सगळा कांदा काढावा लागतो. काही शेतकरी थोडीफार मजुरी म्हणून पैसे मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार काही ठराविक रक्कम द्यायचे. परंतु आता चारा हवा असल्यास शेतकऱ्यांच्या शेतात राबावे लागत आहे.त्यामुळे मेंढपाळ अडचणीत सापडला आहे, तर काही शेतकरी पैसे देत नाहीत. चारा उपलब्ध होत नसल्याने नाईलाज असूनही काम करावे लागत आहे. काम नाही केले तर कोणी चारा देत नाही. दिवसभर बकरी चारायची की काम करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे, असे मेंढपाळ पांडा कचरे यांनी सांगितले.