शहरं
Join us  
Trending Stories
1
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
2
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
3
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
4
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
5
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
6
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
7
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
8
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
9
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
10
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
11
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
12
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
13
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
14
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
15
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
16
Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!
17
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
18
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
19
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
20
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

चासकमान धरणातून डाव्या कालव्याला रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST

नववर्षाच्या पहिल्या दिवशी डाव्या कालव्याला हे पाणी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. धरणात सध्या ८.५३ टीमएसी पाणीसाठा शिल्लक ...

नववर्षाच्या पहिल्या दिवशी डाव्या कालव्याला हे पाणी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. धरणात सध्या ८.५३ टीमएसी पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उशिरापर्यंत परतीचा पाऊस सुरू होता. त्यामुळे विहिरी, तलाव, शेततळे पूर्ण क्षमतेने भरले होते. ओढे-नाले खळखळून वाहत होते. शेतक-यांनी या पाण्यावर कांदा लागवड, मका, बटाटा, गहू व इतर तरकारी पिकांची लागवड केली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना पाण्याची चणचण भासू लागली होती. धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी खेड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती. १ जानेवारी रोजी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले असल्यामुळे शेतकरीवर्गाची पाण्याची चिंता मिटली आहे. पाणी कालव्याला आल्यामुळे कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच कालवा गळतीचे पाणी ओढ्याना येऊन ते थेट भीमा नदीत जाणार असल्यामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यांतील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. सध्या धरणात ९६.६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी पाणीसाठा ९६.५६ टक्के शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास तेवढाच आहे. पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन जवळपास फ्रेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्या पध्दतीने धरण विभाग या पाण्याचे योग्यरीत्या वितरण करणार आहे. सध्या धरणातील पाण्याची टक्केवारी चांगली असल्याने उन्हाळ्यातही डाव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला उन्हाळी हंगामातही पिके घेता येणार असल्याचे चित्र दिसत असुन शेतकरी समाधान व्यक्त करित आहे.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन ७ दिवसांपूर्वी सोडले आहे. त्यामुळे कालवा तुडुंब भरून वाहत आहे.