शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान धरणातून डाव्या कालव्याला रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST

नववर्षाच्या पहिल्या दिवशी डाव्या कालव्याला हे पाणी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. धरणात सध्या ८.५३ टीमएसी पाणीसाठा शिल्लक ...

नववर्षाच्या पहिल्या दिवशी डाव्या कालव्याला हे पाणी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. धरणात सध्या ८.५३ टीमएसी पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा उशिरापर्यंत परतीचा पाऊस सुरू होता. त्यामुळे विहिरी, तलाव, शेततळे पूर्ण क्षमतेने भरले होते. ओढे-नाले खळखळून वाहत होते. शेतक-यांनी या पाण्यावर कांदा लागवड, मका, बटाटा, गहू व इतर तरकारी पिकांची लागवड केली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना पाण्याची चणचण भासू लागली होती. धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी खेड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली होती. १ जानेवारी रोजी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले असल्यामुळे शेतकरीवर्गाची पाण्याची चिंता मिटली आहे. पाणी कालव्याला आल्यामुळे कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर घेतलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच कालवा गळतीचे पाणी ओढ्याना येऊन ते थेट भीमा नदीत जाणार असल्यामुळे भीमा नदीवरील बंधाऱ्यांतील पाण्याची पातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. सध्या धरणात ९६.६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी पाणीसाठा ९६.५६ टक्के शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास तेवढाच आहे. पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले असून हे आवर्तन जवळपास फ्रेबुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्या पध्दतीने धरण विभाग या पाण्याचे योग्यरीत्या वितरण करणार आहे. सध्या धरणातील पाण्याची टक्केवारी चांगली असल्याने उन्हाळ्यातही डाव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सोडता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला उन्हाळी हंगामातही पिके घेता येणार असल्याचे चित्र दिसत असुन शेतकरी समाधान व्यक्त करित आहे.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन ७ दिवसांपूर्वी सोडले आहे. त्यामुळे कालवा तुडुंब भरून वाहत आहे.