शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक नियमावलीचा चेंडू मुख्य सभेत

By admin | Updated: March 13, 2015 06:30 IST

राज्याच्या अग्निशामक संचालनालयाने तयार करून महापालिकेकडे पाठविलेल्या अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमावलीची लगेच

पुणे : राज्याच्या अग्निशामक संचालनालयाने तयार करून महापालिकेकडे पाठविलेल्या अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमावलीची लगेच अंमलबजावणी प्रशासनाला करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सेवा नियमावलीला मुख्य सभेची मान्यता घेतल्यांनतर ती नगरविकास विभागाकडे पाठवून गॅझेटमध्ये प्रकाशित करावी लागणार आहे, असे राज्याचे अग्निशामक संचालक एस. एस. वारीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता या नियमावलीचे अंतिम भवितव्य मुख्य सभेला निश्चित करावे लागणार आहे.महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीची सेवा नियमावली आॅगस्ट २०१४मध्ये गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आली. त्या वेळी अग्निशमन सेवेसाठी राज्य अग्निशमन संचालनालयाकडून सर्व महापालिकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, केवळ पुणे महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन संचालक एस. एस. वारीक यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी स्वतंत्र नियमावली तयार करून अंमलबजावणीसाठी पाठविली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशामक अधिकारीपद भरण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अग्निशामक संचालकांनी या नियमावलीला राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केल्याने ही प्रक्रिया थांबवावी लागणार आहे.नवीन सेवा नियमावलीमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद परीक्षा, मुलाखत घेऊन भरण्याऐवजी ते खात्यांतर्गत बढतीने भरले जावे, असा बदल करण्यात आला. तसेच या पदाकरिता अग्निशमनचे काही डिप्लोमा आवश्यक असताना ही तरतूद वगळण्यात आली आहे. इतर महापालिका तसेच एमआयडींसीमध्ये अग्निशामक अधिकारी हे विज्ञान शाखेतील असणे बंधनकारक असताना पुण्याच्या नियमावलीनुसार कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र ठरणार आहे. केंद्रप्रमुखपदाचा १० वर्षांचा, सहायक अग्निशमन अधिकारीपदाचा ५ वर्षांचा, उपमुख्य अग्निशमन अधिकारीपदाचा ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना पूर्वी मुख्य अग्निशमन अधिकारीपदाच्या भरतीप्रक्रियेत सहभागी होता येत होते. मात्र, आता केवळ उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक, अशी पात्रता ठरविली आहे. त्यामुळे या भरतीप्रक्रियेतून अनेक अग्निशमन अधिकारी बाहेर फेकले जाणार आहेत. नियमावलीत हे बदल स्वीकारयचे की फेटाळून लावायचे, हे ठरविण्याचा अंतिम अधिकार महापालिकेच्या मुख्य सभेला आहेत. मुख्य सभेने घेतलेल्या निर्णयांना राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करता येणार आहे.