शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अग्निशामक नियमावलीचा चेंडू मुख्य सभेत

By admin | Updated: March 13, 2015 06:30 IST

राज्याच्या अग्निशामक संचालनालयाने तयार करून महापालिकेकडे पाठविलेल्या अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमावलीची लगेच

पुणे : राज्याच्या अग्निशामक संचालनालयाने तयार करून महापालिकेकडे पाठविलेल्या अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमावलीची लगेच अंमलबजावणी प्रशासनाला करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सेवा नियमावलीला मुख्य सभेची मान्यता घेतल्यांनतर ती नगरविकास विभागाकडे पाठवून गॅझेटमध्ये प्रकाशित करावी लागणार आहे, असे राज्याचे अग्निशामक संचालक एस. एस. वारीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता या नियमावलीचे अंतिम भवितव्य मुख्य सभेला निश्चित करावे लागणार आहे.महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीची सेवा नियमावली आॅगस्ट २०१४मध्ये गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आली. त्या वेळी अग्निशमन सेवेसाठी राज्य अग्निशमन संचालनालयाकडून सर्व महापालिकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, केवळ पुणे महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन संचालक एस. एस. वारीक यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी स्वतंत्र नियमावली तयार करून अंमलबजावणीसाठी पाठविली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशामक अधिकारीपद भरण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अग्निशामक संचालकांनी या नियमावलीला राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केल्याने ही प्रक्रिया थांबवावी लागणार आहे.नवीन सेवा नियमावलीमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद परीक्षा, मुलाखत घेऊन भरण्याऐवजी ते खात्यांतर्गत बढतीने भरले जावे, असा बदल करण्यात आला. तसेच या पदाकरिता अग्निशमनचे काही डिप्लोमा आवश्यक असताना ही तरतूद वगळण्यात आली आहे. इतर महापालिका तसेच एमआयडींसीमध्ये अग्निशामक अधिकारी हे विज्ञान शाखेतील असणे बंधनकारक असताना पुण्याच्या नियमावलीनुसार कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र ठरणार आहे. केंद्रप्रमुखपदाचा १० वर्षांचा, सहायक अग्निशमन अधिकारीपदाचा ५ वर्षांचा, उपमुख्य अग्निशमन अधिकारीपदाचा ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना पूर्वी मुख्य अग्निशमन अधिकारीपदाच्या भरतीप्रक्रियेत सहभागी होता येत होते. मात्र, आता केवळ उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक, अशी पात्रता ठरविली आहे. त्यामुळे या भरतीप्रक्रियेतून अनेक अग्निशमन अधिकारी बाहेर फेकले जाणार आहेत. नियमावलीत हे बदल स्वीकारयचे की फेटाळून लावायचे, हे ठरविण्याचा अंतिम अधिकार महापालिकेच्या मुख्य सभेला आहेत. मुख्य सभेने घेतलेल्या निर्णयांना राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करता येणार आहे.