शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अग्निशामक नियमावलीचा चेंडू मुख्य सभेत

By admin | Updated: March 13, 2015 06:30 IST

राज्याच्या अग्निशामक संचालनालयाने तयार करून महापालिकेकडे पाठविलेल्या अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमावलीची लगेच

पुणे : राज्याच्या अग्निशामक संचालनालयाने तयार करून महापालिकेकडे पाठविलेल्या अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमावलीची लगेच अंमलबजावणी प्रशासनाला करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सेवा नियमावलीला मुख्य सभेची मान्यता घेतल्यांनतर ती नगरविकास विभागाकडे पाठवून गॅझेटमध्ये प्रकाशित करावी लागणार आहे, असे राज्याचे अग्निशामक संचालक एस. एस. वारीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता या नियमावलीचे अंतिम भवितव्य मुख्य सभेला निश्चित करावे लागणार आहे.महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीची सेवा नियमावली आॅगस्ट २०१४मध्ये गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आली. त्या वेळी अग्निशमन सेवेसाठी राज्य अग्निशमन संचालनालयाकडून सर्व महापालिकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, केवळ पुणे महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन संचालक एस. एस. वारीक यांनी १२ फेब्रुवारी २०१५ रोजी स्वतंत्र नियमावली तयार करून अंमलबजावणीसाठी पाठविली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशामक अधिकारीपद भरण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अग्निशामक संचालकांनी या नियमावलीला राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केल्याने ही प्रक्रिया थांबवावी लागणार आहे.नवीन सेवा नियमावलीमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद परीक्षा, मुलाखत घेऊन भरण्याऐवजी ते खात्यांतर्गत बढतीने भरले जावे, असा बदल करण्यात आला. तसेच या पदाकरिता अग्निशमनचे काही डिप्लोमा आवश्यक असताना ही तरतूद वगळण्यात आली आहे. इतर महापालिका तसेच एमआयडींसीमध्ये अग्निशामक अधिकारी हे विज्ञान शाखेतील असणे बंधनकारक असताना पुण्याच्या नियमावलीनुसार कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र ठरणार आहे. केंद्रप्रमुखपदाचा १० वर्षांचा, सहायक अग्निशमन अधिकारीपदाचा ५ वर्षांचा, उपमुख्य अग्निशमन अधिकारीपदाचा ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना पूर्वी मुख्य अग्निशमन अधिकारीपदाच्या भरतीप्रक्रियेत सहभागी होता येत होते. मात्र, आता केवळ उपमुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक, अशी पात्रता ठरविली आहे. त्यामुळे या भरतीप्रक्रियेतून अनेक अग्निशमन अधिकारी बाहेर फेकले जाणार आहेत. नियमावलीत हे बदल स्वीकारयचे की फेटाळून लावायचे, हे ठरविण्याचा अंतिम अधिकार महापालिकेच्या मुख्य सभेला आहेत. मुख्य सभेने घेतलेल्या निर्णयांना राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करता येणार आहे.