शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
5
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
6
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
9
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
10
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
11
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
12
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
13
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
14
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
15
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
16
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
17
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
18
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
19
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
20
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  

‘स्मार्ट सिटी’ आराखडा अंतिम टप्प्यात

By admin | Updated: November 22, 2015 03:40 IST

केंद्र शासनाकडे पाठवायच्या ‘स्मार्ट सिटी’ आराखड्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल. पुणेकर नागरिकांकडून तीन टप्प्यांमध्ये त्यांची मते, सूचना

पुणे : केंद्र शासनाकडे पाठवायच्या ‘स्मार्ट सिटी’ आराखड्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल. पुणेकर नागरिकांकडून तीन टप्प्यांमध्ये त्यांची मते, सूचना, शिफारशी जाणून घेऊन त्यांचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे १५ डिसेंबरपर्यंत पाठविला जाणार आहे.केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी योजने’तील १०० शहरांमध्ये पुणे शहराची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यातून २० शहरांची निवड होणार आहे. त्याकरिता या १०० महापालिकांना आराखडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यातून स्पर्धा होऊन, २० शहरांची निवड होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये समावेशासाठी राज्यातून पुणे शहराची दावेदारी भक्कम मानली जात आहे. ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा बनविताना पुणे महापालिकेने सुरुवातीपासून नागरिकांच्या सहभागावर भर दिला आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत विकसित करण्यासाठी ‘मॉडेल एरिया’ म्हणून औंध-बाणेर भागाची निवड केली आहे. ‘स्मार्ट सिटी प्रदर्शना’मध्ये सहभागी होण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी तिथे पाहिलेल्या काही निवडक प्रकल्पांचाही समावेश ‘स्मार्ट सिटी’ आराखड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. ‘स्मार्ट सिटी योजने’मध्ये शहरांची निवड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांना निमंत्रित केले जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, असाच आराखडा तयार करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.आता पुणेकरांचा ‘स्मार्ट सिटी योजने’साठी पाठिंबा दर्शविणारी प्रतिज्ञापत्रे भरून घेतली जाणार आहेत. येत्या २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण देशासमोर आदर्श उदाहरण घालून देऊ, अशी प्रतिज्ञेचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.