शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम फेरी दोन नाट्यगृहांत

By admin | Updated: February 21, 2017 03:07 IST

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात रंगणार असली तरी ती होत आहे दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये. राज्य सांस्कृतिक

पुणे : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात रंगणार असली तरी ती होत आहे दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये. राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धेचा कालावधी कमी करण्यासाठी ही क्लृप्ती शोधून काढली आहे. त्यावर ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र स्पर्धा अशा पद्धतीने घेण्यावर सांस्कृतिक संचालनालय ठाम आहे.स्पर्धकांना एकाच पातळीवर ठेवायचे असेल तर एकच नाट्यगृह मिळायला हवे आणि एकाच वेळी ते सादर करण्याची संधी दिली पाहिजे असे वझे यांचे म्हणणे आहे. मात्र, व्यावसायिक नाटकेदेखील दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत होतातच ना, मग स्पर्धा का घेतल्या जाऊ शकत नाही, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांनी वझे यांचा आक्षेप झटकला आहे. स्पर्धेविषयीच्या या निर्णयाबद्दल कुणाचा विरोध असेल तर तो मला सांगावा, मी बघेन काय करायचे ते? असा एकाधिकारशाहीचा सूर संचालकांनी आळविला आहे.यासंदर्भात राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘व्यावसायिक नाटके ही दोन वेगळ्या नाट्यगृहांत होतात. मग स्पर्धा का नाही? २० नाटकांना वीस दिवस लावण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत त्या आयोजित केल्याने परीक्षकांचा वेळही वाचणार आहे. आत्तापर्यंत एकही स्पर्धक किंवा परीक्षकाने यावर आक्षेप नोंदविलेला नाही. कुणाला काही सांगायचे असेल तर त्यांनी मला थेट सांगावे.’’ (प्रतिनिधी)भरत नाट्य मंदिर व टिळक स्मारकात  अंतिम फेरीचे उद्यापासून आयोजन राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने यावर्षीच्या ५६व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान टिळक स्मारक मंदिर आणि भरत नाट्य मंदिरात ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या प्रयोगावर माधव वझे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  दोन्ही नाट्यगृहांमध्ये मिळणाऱ्या सुविधा या वेगळ्या आहेत. भरत नाट्यमध्ये कलाकार व प्रेक्षक यांच्यात एक नाते तयार होत असल्यामुळे तिथे जेवढे नाटक रंगते तितकेच टिळक स्मारक काय कुठल्याच नाट्यगृहात रंगत नाही. टिळक स्मारकची पहिली रांग दूर असणे, रंगमंचाची खोली, प्रकाशव्यवस्था, पडदा पडण्याची प्रक्रिया अशा खूप गोष्टी आहेत ज्या स्पर्धकांवरअन्याय करणाऱ्या ठरू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  व्यावसायिक नाटकांमधल्या कलाकारांना तडजोडी कराव्या लागतात, त्या करण्यात नवल नाही, पण स्पर्धा ही समान पातळीवर असायला हवी आणि नाटकांची बक्षिसे वाढविण्यापेक्षा परीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.