शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

अंतिम फेरी दोन नाट्यगृहांत

By admin | Updated: February 21, 2017 03:07 IST

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात रंगणार असली तरी ती होत आहे दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये. राज्य सांस्कृतिक

पुणे : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात रंगणार असली तरी ती होत आहे दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये. राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धेचा कालावधी कमी करण्यासाठी ही क्लृप्ती शोधून काढली आहे. त्यावर ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र स्पर्धा अशा पद्धतीने घेण्यावर सांस्कृतिक संचालनालय ठाम आहे.स्पर्धकांना एकाच पातळीवर ठेवायचे असेल तर एकच नाट्यगृह मिळायला हवे आणि एकाच वेळी ते सादर करण्याची संधी दिली पाहिजे असे वझे यांचे म्हणणे आहे. मात्र, व्यावसायिक नाटकेदेखील दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत होतातच ना, मग स्पर्धा का घेतल्या जाऊ शकत नाही, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांनी वझे यांचा आक्षेप झटकला आहे. स्पर्धेविषयीच्या या निर्णयाबद्दल कुणाचा विरोध असेल तर तो मला सांगावा, मी बघेन काय करायचे ते? असा एकाधिकारशाहीचा सूर संचालकांनी आळविला आहे.यासंदर्भात राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘व्यावसायिक नाटके ही दोन वेगळ्या नाट्यगृहांत होतात. मग स्पर्धा का नाही? २० नाटकांना वीस दिवस लावण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत त्या आयोजित केल्याने परीक्षकांचा वेळही वाचणार आहे. आत्तापर्यंत एकही स्पर्धक किंवा परीक्षकाने यावर आक्षेप नोंदविलेला नाही. कुणाला काही सांगायचे असेल तर त्यांनी मला थेट सांगावे.’’ (प्रतिनिधी)भरत नाट्य मंदिर व टिळक स्मारकात  अंतिम फेरीचे उद्यापासून आयोजन राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने यावर्षीच्या ५६व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान टिळक स्मारक मंदिर आणि भरत नाट्य मंदिरात ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या प्रयोगावर माधव वझे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  दोन्ही नाट्यगृहांमध्ये मिळणाऱ्या सुविधा या वेगळ्या आहेत. भरत नाट्यमध्ये कलाकार व प्रेक्षक यांच्यात एक नाते तयार होत असल्यामुळे तिथे जेवढे नाटक रंगते तितकेच टिळक स्मारक काय कुठल्याच नाट्यगृहात रंगत नाही. टिळक स्मारकची पहिली रांग दूर असणे, रंगमंचाची खोली, प्रकाशव्यवस्था, पडदा पडण्याची प्रक्रिया अशा खूप गोष्टी आहेत ज्या स्पर्धकांवरअन्याय करणाऱ्या ठरू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  व्यावसायिक नाटकांमधल्या कलाकारांना तडजोडी कराव्या लागतात, त्या करण्यात नवल नाही, पण स्पर्धा ही समान पातळीवर असायला हवी आणि नाटकांची बक्षिसे वाढविण्यापेक्षा परीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.