शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कॅन्सरशी लढताना...

By admin | Updated: February 2, 2015 23:26 IST

महागडी औषधेच जास्त गुणकारी, असा एक समज आपल्या मनात असतो. कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होण्यासाठी आर्थिक तडजोडी करून औषधोपचार केले जातात.

महागडी औषधेच जास्त गुणकारी, असा एक समज आपल्या मनात असतो. कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होण्यासाठी आर्थिक तडजोडी करून औषधोपचार केले जातात. परंतु, यासाठीही जेनेरिक औषधांचाही पर्याय आहे.णे एकेकाळी कॅन्सर म्हटला, की लोकांच्या उरात धडकी भरत असे. कारण त्यावर उपचारच उपलब्ध नव्हते. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राने हे आव्हान स्वीकारले. एकेकाळी रुग्णांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या कर्करोगावर अमाप संशोधन झाले. कर्करोगाची कारणे, निदान व उपचार यात अभूतपूर्व प्रगती झाली. याचा अर्थ असा नव्हे, की मानवाने त्यावर विजय मिळवला. आजही ही प्रगती अपूर्ण आहे. तथापि, अनेक प्रकारच्या कर्करोगांचे अचूक निदान व त्यातील बऱ्याचशा प्रकारांवर विविध उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यातील काही रुग्णांचे आयुष्य व त्याचा दर्जा वाढवणारे तर काही मृत्यूपर्यंतचे जीवन सुखद वा सुसह्य करणारे आहेत.कर्क रुग्णाच्या उपचारासाठी वैद्यकांचे सांघिक प्रयत्न महत्त्वाचे असतात. कारण कॅन्सरचे कितीतरी प्रकार आहेत. विविध चाचण्याव्दारे कॅन्सरच आहे ना? असल्यास कुठल्या प्रकारचा व तो किती गंभीर स्वरूपाचा (स्टेज) आहे, याचे निदान करता येते व उपचाराची रूपरेषा ठरते.कॅन्सरवर तीन प्रकारच्या प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध आहेत. पैकी एक म्हणजे शस्त्रक्रिया. कर्कग्रस्त अवयव जीवनावश्यक नसेल तर तो काढून टाकला की रुग्ण रोगमुक्त होऊ शकतो. दुसरा उपाय म्हणजे कर्करोधी औषधे. वेगवेगळ्या प्रकारच्या कर्कासाठी वेगवेगळी औषधे वापरली जातात. बहुतेक कर्कांना निष्प्रभ करण्यासाठी एकाहून अधिक औषधे द्यावी लागतात. तिसरी उपचारपद्धती म्हणजे किरणोपचार (रेडिएशन) थेरपी यातही वेगवेगळे प्रकार असून हे उपचारही फेरीपद्धतीने घ्यावे लागतात. आणखी गुंतागुंतीची बाब म्हणजे कॅन्सरनुसार या तिन्ही उपचारपद्धतींचा रास्त सयुक्तिक वापर करावा लागतो. म्हणजे काही कॅन्सर यापैकी केवळ एकाच पद्धतीने बरे होतील, काहींना दोन पद्धती वापराव्या लागतील तर काहींसाठी रुग्णाला तिन्ही उपचार घेणे अनिवार्य होय. या उपचारपद्धतींचा क्रमही कर्कानुसार बदलतो. म्हणजे एखाद्या कॅन्सरसाठी आधी औषधे, मग शस्त्रक्रिया व नंतर किरणोपचार तर दुसऱ्या कर्कासाठी वेगळा क्रम अधिक उपयुक्त ठरतो. म्हणून कॅन्सरसाठी उपचार घेताना या सर्व प्रकारच्या तज्ज्ञांची एकत्रित चर्चा होऊन सर्वाधिक रास्त उपचार करणे फार महत्त्वाचे असते. पूर्वी कॅन्सर म्हणजे साक्षात मृत्यूच असे साधारण समीकरण होते. आता ही परिस्थिती बरीच सुधारली आहे. अनेक प्रकारच्या कर्काविरुद्ध आपण लढू शकतो आणि काहींविरुद्ध तर जिंकूही शकतो! काहींशी समेट करावा लागतो. थोड्याच कॅन्सरना वा गंभीर कॅन्सरना आपल्याला नाइलाजाने शरण जावे लागते. थोडक्यात कॅन्सरला आता पूर्वीइतके घाबरण्याची गरज नाही. शक्य त्या कर्काला प्रतिबंध (उदा. तंबाखू / धूम्रपान वर्ज्य), शक्य तेवढ्या लवकर निदान व उपलब्ध सर्वात प्रभावी उपचारांचा अवलंब या त्रिसूत्रीवर आपले कर्कविरोधी युद्ध चालू आहे.अनेक कॅन्सरचे निदान व त्यावरील उपचार ही बरीच खर्चिक बाब आहे. बऱ्याचदा हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्याला मुख्य खर्च औषधांचा असतो. नवनवी कर्करोधी औषधे प्रचंड महाग असतात. यावर मुख्य उपाय म्हणजे मूळ (जेनेरिक) नावाची औषधे वापरणे. अशी औषधे व्यापारी (ब्रँड) नावाने उपलब्ध औषधांपेक्षा खूपच स्वस्त असतात आणि ती तितकीच गुणकारी असल्याची खात्री करून घेतलेली असते. तेव्हा रुग्णांनी संकोच न बाळगता कॅन्सरतज्ज्ञांशी आपल्या आर्थिक अडचणीबद्दल बोलावे व त्यांना किमान किमतीचे पण तितकेच प्रभावी औषध देण्याबद्दल सांगावे. सध्या भारतात अनेक कर्करोधी औषधे उपलब्ध आहेत. अगदी नव्या औषधांची जेनेरिक उपलब्धता नसते. मात्र, विविध रुग्णालयात त्यावरील चिकित्सा चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) सुरू असतात. त्या चाचण्यांची साद्यंत माहिती घेऊन रुग्ण त्यात सहभागी होऊ शकतात. लेखक बी. जे. मेडिकल महाविद्यालयात औषधशास्त्रविषयाचे प्राध्यापक (एम. डी.) आहेत.डॉ. पद्माकर पंडित