शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘लढा पारदर्शक नोकरभरतीसाठी’ हॅश टॅग मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:11 IST

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक गैरप्रकार घडलेले असतानादेखील राज्य सरकारने त्यावर अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. यावर अंतिम ...

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक गैरप्रकार घडलेले असतानादेखील राज्य सरकारने त्यावर अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. यावर अंतिम निवड यादी जाहीर न करताच मोजक्या उमेदवारांना मेल व फोन करून कागद पडताळणीसाठी बोलावले. कमी गुण असलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली. काही उमेदवारांनी अपेक्षित निकषांची पूर्तता केलेली नसतानाही त्यांची निवड यादीत नावे असल्याचे समोर आले. यावर अन्याय झालेल्या उमेदवारांना न्याय मिळवा, यासाठी ऑनलाईन मीटिंग घेऊन आक्रमक भूमिका घेऊन ‘लढा पारदर्शक नोकरभरतीसाठी’ हॅश टॅग मोहीम सुरू करण्यात आली आहे.

खासगी कंपनीमार्फत आरोग्य विभागाची परीक्षा घेतली. त्यामुळे या भरती प्रक्रियेत घोटाळा होत असताना सरकार डोळेझाक करीत आहे. अनेकवेळा तक्रार करूनही सरकार जागे होत नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून देखील निवड न होणे हा अन्याय असून, याला वाचा फुटावी म्हणून राज्यातील आरोग्य विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी एकत्र येत चर्चा केली. त्यातून अनेक मुद्दे समोर आले आहेत. या पुढील भरती ही एमपीएससीकडूनच करावी, अशी मुख्य मागणी उमेदवारांनी केली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा पद्धतीत ज्या उमेदवारांवर अन्याय झाला असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काही संस्थानी पुढाकार घेतला आहे. १७ मे पर्यंत उमेदवारांनी ९९२२२०३५२४/ ९९२३४४६६४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

चर्चेतून समोर आलेले मुद्दे -

१) ४५ टक्के गुणांचा निकष असताना, त्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती दिली आहे.

२) ५ वर्षांचा अनुभव असावा असे जाहिरातीमध्ये नमूद असताना ज्यांनी खोटी माहिती सादर केली त्यांना नियुक्ती दिली आहे.

३) माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ.

४) आरोग्य संचालकांना भेटून विद्यार्थ्यांनी निकालाची बाजू समोर मांडली. तर त्यांचे ऐकून न घेता खासगी कंपनीकडे बोट दाखविले.

५ )नॉन-क्रिमिलियर नसताना उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

६) कागदपत्रांची पडताळणी ही चुकीच्या प्रकारे केली आहे.

७) जाहिरातीच्या विरोधात न्यायालयात जाता येऊ शकते. (अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या विरुद्ध केस दाखल केली होती, आणि ती जिंकली देखील)

८) वेळेवर सरकारने ५०% जागा भरणार अशी घोषणा केली, त्यामुळे विविध जातीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गामधून प्रथम असून देखील त्यांची निवड झालेली नाही. फी मात्र पूर्ण घेतली आहे.

९) सामूहिक कॉपी झालेली आहे.

१०) प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली नाही.

११) एक बेंचवर ०२ परीक्षार्थी बसवल्याने एक मागे एक असे मुलं पास झाली आहे.