शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

‘लढा पारदर्शक नोकरभरतीसाठी’ हॅश टॅग मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:11 IST

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक गैरप्रकार घडलेले असतानादेखील राज्य सरकारने त्यावर अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. यावर अंतिम ...

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक गैरप्रकार घडलेले असतानादेखील राज्य सरकारने त्यावर अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. यावर अंतिम निवड यादी जाहीर न करताच मोजक्या उमेदवारांना मेल व फोन करून कागद पडताळणीसाठी बोलावले. कमी गुण असलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली. काही उमेदवारांनी अपेक्षित निकषांची पूर्तता केलेली नसतानाही त्यांची निवड यादीत नावे असल्याचे समोर आले. यावर अन्याय झालेल्या उमेदवारांना न्याय मिळवा, यासाठी ऑनलाईन मीटिंग घेऊन आक्रमक भूमिका घेऊन ‘लढा पारदर्शक नोकरभरतीसाठी’ हॅश टॅग मोहीम सुरू करण्यात आली आहे.

खासगी कंपनीमार्फत आरोग्य विभागाची परीक्षा घेतली. त्यामुळे या भरती प्रक्रियेत घोटाळा होत असताना सरकार डोळेझाक करीत आहे. अनेकवेळा तक्रार करूनही सरकार जागे होत नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून देखील निवड न होणे हा अन्याय असून, याला वाचा फुटावी म्हणून राज्यातील आरोग्य विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी एकत्र येत चर्चा केली. त्यातून अनेक मुद्दे समोर आले आहेत. या पुढील भरती ही एमपीएससीकडूनच करावी, अशी मुख्य मागणी उमेदवारांनी केली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा पद्धतीत ज्या उमेदवारांवर अन्याय झाला असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काही संस्थानी पुढाकार घेतला आहे. १७ मे पर्यंत उमेदवारांनी ९९२२२०३५२४/ ९९२३४४६६४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

चर्चेतून समोर आलेले मुद्दे -

१) ४५ टक्के गुणांचा निकष असताना, त्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती दिली आहे.

२) ५ वर्षांचा अनुभव असावा असे जाहिरातीमध्ये नमूद असताना ज्यांनी खोटी माहिती सादर केली त्यांना नियुक्ती दिली आहे.

३) माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ.

४) आरोग्य संचालकांना भेटून विद्यार्थ्यांनी निकालाची बाजू समोर मांडली. तर त्यांचे ऐकून न घेता खासगी कंपनीकडे बोट दाखविले.

५ )नॉन-क्रिमिलियर नसताना उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

६) कागदपत्रांची पडताळणी ही चुकीच्या प्रकारे केली आहे.

७) जाहिरातीच्या विरोधात न्यायालयात जाता येऊ शकते. (अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या विरुद्ध केस दाखल केली होती, आणि ती जिंकली देखील)

८) वेळेवर सरकारने ५०% जागा भरणार अशी घोषणा केली, त्यामुळे विविध जातीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गामधून प्रथम असून देखील त्यांची निवड झालेली नाही. फी मात्र पूर्ण घेतली आहे.

९) सामूहिक कॉपी झालेली आहे.

१०) प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली नाही.

११) एक बेंचवर ०२ परीक्षार्थी बसवल्याने एक मागे एक असे मुलं पास झाली आहे.