शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

‘लढा पारदर्शक नोकरभरतीसाठी’ हॅश टॅग मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:11 IST

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक गैरप्रकार घडलेले असतानादेखील राज्य सरकारने त्यावर अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. यावर अंतिम ...

पुणे : आरोग्य विभागाच्या परीक्षेत अनेक गैरप्रकार घडलेले असतानादेखील राज्य सरकारने त्यावर अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. यावर अंतिम निवड यादी जाहीर न करताच मोजक्या उमेदवारांना मेल व फोन करून कागद पडताळणीसाठी बोलावले. कमी गुण असलेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली. काही उमेदवारांनी अपेक्षित निकषांची पूर्तता केलेली नसतानाही त्यांची निवड यादीत नावे असल्याचे समोर आले. यावर अन्याय झालेल्या उमेदवारांना न्याय मिळवा, यासाठी ऑनलाईन मीटिंग घेऊन आक्रमक भूमिका घेऊन ‘लढा पारदर्शक नोकरभरतीसाठी’ हॅश टॅग मोहीम सुरू करण्यात आली आहे.

खासगी कंपनीमार्फत आरोग्य विभागाची परीक्षा घेतली. त्यामुळे या भरती प्रक्रियेत घोटाळा होत असताना सरकार डोळेझाक करीत आहे. अनेकवेळा तक्रार करूनही सरकार जागे होत नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून देखील निवड न होणे हा अन्याय असून, याला वाचा फुटावी म्हणून राज्यातील आरोग्य विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी एकत्र येत चर्चा केली. त्यातून अनेक मुद्दे समोर आले आहेत. या पुढील भरती ही एमपीएससीकडूनच करावी, अशी मुख्य मागणी उमेदवारांनी केली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा पद्धतीत ज्या उमेदवारांवर अन्याय झाला असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काही संस्थानी पुढाकार घेतला आहे. १७ मे पर्यंत उमेदवारांनी ९९२२२०३५२४/ ९९२३४४६६४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

चर्चेतून समोर आलेले मुद्दे -

१) ४५ टक्के गुणांचा निकष असताना, त्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती दिली आहे.

२) ५ वर्षांचा अनुभव असावा असे जाहिरातीमध्ये नमूद असताना ज्यांनी खोटी माहिती सादर केली त्यांना नियुक्ती दिली आहे.

३) माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ.

४) आरोग्य संचालकांना भेटून विद्यार्थ्यांनी निकालाची बाजू समोर मांडली. तर त्यांचे ऐकून न घेता खासगी कंपनीकडे बोट दाखविले.

५ )नॉन-क्रिमिलियर नसताना उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

६) कागदपत्रांची पडताळणी ही चुकीच्या प्रकारे केली आहे.

७) जाहिरातीच्या विरोधात न्यायालयात जाता येऊ शकते. (अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या विरुद्ध केस दाखल केली होती, आणि ती जिंकली देखील)

८) वेळेवर सरकारने ५०% जागा भरणार अशी घोषणा केली, त्यामुळे विविध जातीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गामधून प्रथम असून देखील त्यांची निवड झालेली नाही. फी मात्र पूर्ण घेतली आहे.

९) सामूहिक कॉपी झालेली आहे.

१०) प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली नाही.

११) एक बेंचवर ०२ परीक्षार्थी बसवल्याने एक मागे एक असे मुलं पास झाली आहे.