शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

पंधरा वर्षे ४६ जणांना न्यायाची आस

By admin | Updated: January 4, 2016 01:12 IST

महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेत नोकरीला असलेल्या शिक्षक, शिपाई, रखवालदार यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपाखाली नोकरी मिळावी म्हणून तब्बल १५ वर्षांपासून ४६ जण फेऱ्या मारत आहेत

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेत नोकरीला असलेल्या शिक्षक, शिपाई, रखवालदार यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपाखाली नोकरी मिळावी म्हणून तब्बल १५ वर्षांपासून ४६ जण फेऱ्या मारत आहेत. मात्र शिक्षण मंडळाच्या दफ्तरदिरंगाईमुळे त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही.महापालिका शिक्षण मंडळाच्या शहरामध्ये ३०० शाळा असून, त्यामध्ये एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासकीय सेवा नियमावलीनुसार एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा नोकरीवर असताना मृत्यू झाला तर त्याच्या जवळच्या नातलगास नोकरीमध्ये सामावून घेतले जाते. शासकीय कार्यालयांमध्ये प्रतीक्षा यादीनुसार साधारणत: वर्षभरामध्ये नातेवाइकाला नोकरीवर घेतले जाते. घरातील कमविती व्यक्ती गेल्यानंतर त्याचे कुटुंब कोसळून पडू नये म्हणून मानवतेच्या भावनेने ही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, शिक्षण मंडळाच्या दफ्तरदिरंगाईने या मानवतावादी तत्त्वालाच हरताळ फासला गेला आहे.अनुकंपासाठी प्रतीक्षायादी तयार केली जाते. त्यानुसार नातलगांना नोकरीवर घेतले जाते. शिक्षण मंडळाच्या १९९९ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना अद्यापही नोकरी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपाखाली नोकरी मिळण्यासाठी ४६ जण शिक्षण मंडळामध्ये फेऱ्या मारत आहेत. ‘भरती बंद आहे, काही दिवसांनी या’, ‘महिनाभरात तुमचे काम होईल’ अशा प्रकारची उत्तरे त्यांना ऐकवली जात होती. याला आता १५ वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटल्याने अनेकांचे नोकरीचे वय ओलांडून गेले. काही जण निवृत्तीच्या वयाला येऊन ठेपले आहेत; मात्र अद्यापही त्यांची दखल घेतली गेलेली नाही.अनुकंपाखाली अर्ज केलेल्या अर्जदारांनी एकदा अर्ज केल्यानंतर मधली काही वर्षे त्याचा काहीच पाठपुरावा केला नाही त्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित राहिल्याची दुसरी बाजू मांडण्यात आली आहे.याबाबत शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहिफळे यांनी सांगितले की, ‘अनुकंपाखाली अर्ज केलेल्या उमेदवारांना नोकऱ्या मिळाव्यात याकरिता शिक्षण मंडळ प्रशासनाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.’कमी शिक्षण व इतर अडचणींमुळे त्यांना नोकरी मिळण्यास विलंब झाला असून, त्यांना नोकरी देण्यासाठी शिक्षण मंडळाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षण मंडळाच्या अनेक खरेदी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाचा कारभार महापालिका प्रशासनाकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. आता तो पुन्हा शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.