शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

खतांची दरवाढ शेतकऱ्यांवर अन्याय करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST

पुणे : ऐन कोरोना काळात सगळेच खर्चाने त्रस्त असताना खतांच्या दरामध्ये केलेली वाढ शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याची तक्रार आम ...

पुणे : ऐन कोरोना काळात सगळेच खर्चाने त्रस्त असताना खतांच्या दरामध्ये केलेली वाढ शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याची तक्रार आम आदमी पार्टीच्या राज्य शाखेने थेट पंतप्रधानांकडेच केली आहे.

खासदारांनी यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी राज्यातील विरोधी तसेच सत्ताधारी खासदारांंना पत्राद्वारे केली आहे. यामुळे आधीच हैराण झालेला शेतकरी कोलमडून पडेल व त्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होईल, अशी भीती आपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले, या वाढीचा परिणाम म्हणून सर्वच पिकांचा हेक्टरी किमान ५००० रुपये उत्पादन खर्च वाढू शकतो. त्यातून छोटे शेतकरी अधिक अडचणीत येतील. कोर्पोरेट क्षेत्रासाठी पायघड्या घालणारे सरकारची नवे कृषी कायदे आलेत. शेती क्षेत्रातून छोटा शेतकरी उखडून टाकण्याचे आणि मोठ्या भांडवलदारांच्या हातात भारतातील शेती देण्याचा डाव यामागे असल्याचे दिसते आहे.

कोणत्याही वस्तूचे दर काही विशिष्ट पातळीत वाढतात, असे असताना खतांच्या किमतीतील थेट ५५ टक्के दरवाढ अनाकलनीय आहे, असे किर्दत म्हणाले. खतांचा दर असा वाढवताना केंद्र सरकारने कपाशी, तांदूळ, ज्वारी, गहू या पिकांच्या हमीभावात मात्र फक्त २ ते ३ टक्के वाढ केली आहे. शेतीक्षेत्रात काम करणाऱ्या आपच्या अभिजित मोरे, संदीप सोनावणे, गणेश ढमाले, श्रीकांत आचार्य, तुषार कासार असगर बेग,चंद्रकांत पानसे, सैद अली, विक्रम गायकवाड, सतीश यादव, संदेश दिवेकर, रवींद्र आदरकर, मनोज थोरात व अन्य कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांंना पत्र पाठवून कळवले आहे.