शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आंबिल ओढ्याच्या काठावरील नागरिकांमध्ये धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST

पुणे : आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पालिकेने या कामाची फेरनिविदा काढली. परंतु, संबंधित ठेकेदार न्यायालयात ...

पुणे : आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पालिकेने या कामाची फेरनिविदा काढली. परंतु, संबंधित ठेकेदार न्यायालयात गेल्याने न्यायालयाने पालिकेला म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे. तोपर्यंत काम ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ओढ्याच्या काठावरील नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. पालिकेच्या चुकीम उळे आम्हाला पुन्हा पुराचा सामना करावा लागू नये. पावसाळ्यापुर्वी हे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २५ सप्टेंबर २०१९ रोजी आंबिल ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे काठावरील वसाहती, सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. सीमाभिंती कोसळल्या होत्या. अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे ओढ्याची खोली वाढविणे, गाळ काढणे, पुराचे पाणी नागरी भागात पुन्हा घुसू नये म्हणून सीमािभंत बांधणे अशा मागण्या स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी केल्या होत्या. कल्व्हर्टची उंची वाढवून बांधकाम करण्याचीही मागणी करण्यात आली होती.

महापालिकेने सीमाभिंत बांधण्यासाठी निविदा काढली होती. प्रशासनाने विकास आराखड्याप्रमाणे ओढ्याची मोजणी करून काम सुरू करावे, अशी भूमिका घेतली होती. मात्र ठेकेदाराने काम करण्यात दिरंगाई केली. त्याला नोटीस बजावण्यात आल्यानंतरही काम सुरु झाले नाही. त्यामुळे आधीच्या निविदा रद्द करुन पुनर्निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्याची मुदत ४ फेब्रुवारी रोजी संपली. शुक्रवारी निविदा उघडण्यापुर्वीच ठेकेदाराने या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

====

भाजपाच्या फ्लेक्सवर झळकलेल्या ठेकेदाराने न्यायालयात धाव घेत या कामाला स्थगिती मिळविली आहे. ठेकेदार आणि पालिका यांच्या वादात नागरिकांचे नुकसान होऊ नये. पावसाळ्यापुर्वी सीमाभिंतीचे काम व्हायला हवे. वारंवार मागणी करुनही भ्रष्टाचारामुळे हे काम मार्गी लागत नाही.

- अश्विनी कदम, नगरसेविका