शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

महापालिकेला बालगंधर्वांचा विसर

By admin | Updated: June 26, 2017 04:06 IST

बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तम वास्तूतून आपल्याला पन्नास वर्षे कलेचा आस्वाद घेता आला आहे. रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तम वास्तूतून आपल्याला पन्नास वर्षे कलेचा आस्वाद घेता आला आहे. रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. कारण, हे रंगमंदिर पालिकेने उभारले आहे. मात्र महापालिकेला बालगंधर्वांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे, अशी खंत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; तसेच ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, खासदार अनिल शिरोळे, महानगरपालिकेतील विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नीलिमा खाडे, सिद्धार्थ शहा, सुधीर मांडके, अंकुश काकडे, दीपक साळुंखे, कृष्णकुमार गोयल, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. नितीन मोरे यांनी आभार मानले.शरद पवार म्हणाले, बालगंधर्व रंग मंदिर व्हावे, यासाठी प्रयत्न केलेले अनेक मानकरी आहेत. पुलंच्या दूरदष्टीने आणि विचाराने हे सुंदर सभागृह उभा राहिले. त्यांनी कलाकारांची सोय पाहिली. त्यामुळे गेली ५० वर्षे आपल्याला या वास्तुतून कलेचा आस्वाद घेता आला. बालगंधर्व रंगमंदिराच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकावरून वाद सुरू होता. त्या वेळी यशवंतराव चव्हाण तेव्हा नेमके पुण्यात होते. मी त्यांना ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाला बालगंधर्वमध्ये घेऊन आलो. या नाटकाने महाराष्ट्रात पगडा निर्माण केला होता. ते केवळ राज्यापुरते उरले नव्हते. नंतर मला एकदा आमचे गुरू नरूभाऊ लिमये भेटले. ते म्हणाले की, तुला काही कळते का? तू यशवंतरावांना त्या नाटकाला का घेऊन गेलास? जुन्या पिढीतील लोकांना अनेक गोष्टी मान्य नसायच्या. जब्बारने मेहनतीने हे नाटक केले. भालबा केळकर यांनी पीडीए संस्थेच्या माध्यमातून अनेक उत्तम नाटके रंगभूमीला दिली, असेही ते म्हणाले.रोहिणी हट्टंगडी यांचा गौैरव करताना पवार म्हणाले, ‘रोहिणीतार्इंनी सशक्त अभिनयाची छाप उमटवली. अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. रिचर्ड अ‍ॅटोनबोरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटात कस्तुरबाजींची व्यक्तिरेखा रोहिणीतार्इंनी कौशल्याने साकारली. आपल्या कलेशी समरस होऊन वर्षानुवर्षे दर्जा सांभाळून आणि रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवून सातत्याने यश मिळवणे अवघड काम आहे. ते रोहिणीतार्इंनी केले आहे. हट्टंगडी दाम्पत्याने कलेची सेवा केली आहे. दिल्लीत वेगळ्या घडामोडी सुरू असतानाही, मी रोहिणीतार्इंचा सत्कार करायचा आहे, असे सांगून आलो आहे.’