शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

पुरंदर उपशाच्या पाण्याने शेतकऱ्यांनी केली जलक्रांती

By admin | Updated: January 15, 2017 05:32 IST

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या मोफत सुरू आहे. ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी

- मामासाहेब गायकवाड,  भुलेश्वरपुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या मोफत सुरू आहे. ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी स्वत: शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन पाईपलाईनद्वारे पाणी नेऊन नाले, ओढे, तळी भरत आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने या परिसरात जलक्रांती झाली आहे. पुण्यातील रोजचे वापरात येणारे पाणी मुळा-मुठा नदीद्वारे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळते. पुण्याची लोकसंख्या पाहता हे पाणी उन्हाळ्यातही पाहिजे त्या प्रमाणात मिळते. ही योजना सुरू झाल्यानंतर पुरंदर तालुक्यात शिंदवणे घाट चढून पुरंदर तालुक्यात येते. घाटुळीआई देवीनजीक योजनेचे पाणी डोंगराशेजारी सोडण्यात येते. मुळात पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार करतानाच ठिबक सिंचन योजनेद्वारे पाणी वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. योजनेची मुख्य लाईन झाल्यानंतर या योजनेची अनेक कामे बाकी आहेत. काही वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या योजनेचे पाणी पाईपलाईननजीक सोडून नाले, माती बांधतळी, गावतळी भरल्याने पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्याची पातळी चांगल्या प्रकारे वाढली. विशेष म्हणजे काही गावांचे दरवर्षीच लागणारे टँकर मागणीअभावी बंद झाले. हे पाणी सुरळीत सुटल्याने पुरंदरच्या शेतकऱ्यांचे बारमाही बागायतदार बनण्याचे स्वप्न काही अंशी पूर्ण झाले. ही योजना ठिबक सिंचनची असल्याने वाघापूरपासून डोंगराकडे न जाता एक ते दीड किलोमीटर अलीकडे घेण्यात आली. यामुळे या योजनेच्या पाईपलाईनपासून दोन्हीकडील क्षेत्र या पाण्यापासून वंचित राहिले, ते आजपर्यंत. पिसर्वे गावानजीक योजनेची पहिली ठिबक सिंचनाची सोसायटी करण्यात आली. मात्र तांत्रिक बाबीमुळे ती सुरू होऊ शकली नाही. यामुळे उर्वरित कामे पूर्ण न होता ही योजना आजतागायत पहिल्यासारखीच सुरू आहे. म्हणून प्रत्येक गावातील काही भागाला पाणी मिळाले तर काही भाग या योजनेपासून वंचित राहिला. यामुळे या योजनेत कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती निर्माण झाली.आपल्यालाही पुरंदर उपसाचे पाणी मिळावे यासाठी योजनेच्या लाईनपासून दोन ते तीन किलोमीटरवर असणारे नाले, तळी भरण्यासाठी सध्या शेतकरी एकत्र आले आहेत. स्वत: लोकवर्गणी करुन बारा ते पंधरा लाखांची पाईपलाईन करुन मातीबांध भरत आहेत. यासाठी योजनेचे अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. यामुळे योजनेपासून दूर असणाऱ्यांनाही सध्या पाणी मिळत आहे. स्वत: पाईपलाईनचा खर्च करुन पाणी मिळत असल्याने दूरवरचे शेतकरीही सुखावले आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वत: पैसे योजनेच्या लाईनपासून ज्या ठिकाणी योजना पोहोचली नाही त्या ठिकाणी पाणी नेले आहे. पुरंदर उपसा योजनेमुळे येथील शेतकरी सधन झाला आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरुन विविध पिके घेत आहेत. यामुळे उसाची पिकेही घेऊ लागला आहे.