शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपशाच्या पाण्याने शेतकऱ्यांनी केली जलक्रांती

By admin | Updated: January 15, 2017 05:32 IST

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या मोफत सुरू आहे. ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी

- मामासाहेब गायकवाड,  भुलेश्वरपुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या मोफत सुरू आहे. ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी स्वत: शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन पाईपलाईनद्वारे पाणी नेऊन नाले, ओढे, तळी भरत आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने या परिसरात जलक्रांती झाली आहे. पुण्यातील रोजचे वापरात येणारे पाणी मुळा-मुठा नदीद्वारे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळते. पुण्याची लोकसंख्या पाहता हे पाणी उन्हाळ्यातही पाहिजे त्या प्रमाणात मिळते. ही योजना सुरू झाल्यानंतर पुरंदर तालुक्यात शिंदवणे घाट चढून पुरंदर तालुक्यात येते. घाटुळीआई देवीनजीक योजनेचे पाणी डोंगराशेजारी सोडण्यात येते. मुळात पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार करतानाच ठिबक सिंचन योजनेद्वारे पाणी वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. योजनेची मुख्य लाईन झाल्यानंतर या योजनेची अनेक कामे बाकी आहेत. काही वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या योजनेचे पाणी पाईपलाईननजीक सोडून नाले, माती बांधतळी, गावतळी भरल्याने पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पाण्याची पातळी चांगल्या प्रकारे वाढली. विशेष म्हणजे काही गावांचे दरवर्षीच लागणारे टँकर मागणीअभावी बंद झाले. हे पाणी सुरळीत सुटल्याने पुरंदरच्या शेतकऱ्यांचे बारमाही बागायतदार बनण्याचे स्वप्न काही अंशी पूर्ण झाले. ही योजना ठिबक सिंचनची असल्याने वाघापूरपासून डोंगराकडे न जाता एक ते दीड किलोमीटर अलीकडे घेण्यात आली. यामुळे या योजनेच्या पाईपलाईनपासून दोन्हीकडील क्षेत्र या पाण्यापासून वंचित राहिले, ते आजपर्यंत. पिसर्वे गावानजीक योजनेची पहिली ठिबक सिंचनाची सोसायटी करण्यात आली. मात्र तांत्रिक बाबीमुळे ती सुरू होऊ शकली नाही. यामुळे उर्वरित कामे पूर्ण न होता ही योजना आजतागायत पहिल्यासारखीच सुरू आहे. म्हणून प्रत्येक गावातील काही भागाला पाणी मिळाले तर काही भाग या योजनेपासून वंचित राहिला. यामुळे या योजनेत कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती निर्माण झाली.आपल्यालाही पुरंदर उपसाचे पाणी मिळावे यासाठी योजनेच्या लाईनपासून दोन ते तीन किलोमीटरवर असणारे नाले, तळी भरण्यासाठी सध्या शेतकरी एकत्र आले आहेत. स्वत: लोकवर्गणी करुन बारा ते पंधरा लाखांची पाईपलाईन करुन मातीबांध भरत आहेत. यासाठी योजनेचे अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. यामुळे योजनेपासून दूर असणाऱ्यांनाही सध्या पाणी मिळत आहे. स्वत: पाईपलाईनचा खर्च करुन पाणी मिळत असल्याने दूरवरचे शेतकरीही सुखावले आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वत: पैसे योजनेच्या लाईनपासून ज्या ठिकाणी योजना पोहोचली नाही त्या ठिकाणी पाणी नेले आहे. पुरंदर उपसा योजनेमुळे येथील शेतकरी सधन झाला आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरुन विविध पिके घेत आहेत. यामुळे उसाची पिकेही घेऊ लागला आहे.