शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब ...

शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सेंद्रिय शेती पिकवली पाहिजे. ज्यामुळे पिकविणाऱ्यांसोबत खाणाऱ्यांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पिकविलेला शेतमाल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा,’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.

वडगाव घेनंद (ता. खेड) येथे मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्वामी समर्थ सेंद्रिय गटाच्या माध्यमातून संतशिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, माजी सभापती रमेश पवार, सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच उज्वला घेनंद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, मृदा शास्रज्ञ डॉ. सी.आर पालवे, कीड रोग शास्रज्ञ डॉ. रवींद्र कारंडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, खेड तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे आदिंसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी - माजी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्मा प्रकल्प संचालक साबळे म्हणाले, शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्री केल्याने शेतकऱ्याला जास्त नफा होतो. ग्राहकाला ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलबध होतील. शेतकरी व शेतकरी गट थेट ग्राहकापर्यंत जोडण्यात येतील. विभागीय कृषी सहसंचालक बिराजदार म्हणाले, शेतमालाचे ग्रेडींग केल्यास गावतील गटामार्फत शेतमालाची विक्री होईल शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल. शेतमालावर प्रक्रिया केली पाहिजे. शेतकरी गटांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा. गटाला कर्जपुरवठा कमी व्याजदरात भेटतो त्याचा फायदा घेऊन गट बळकटीकरण करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक मंगेश किर्वे, जयश्री पाडेकर तसेच चाकण मंडल कार्यालयातील कर्मचारी वर्गाने केले. सूत्रसंचालन ज्योती राक्षे यांनी तर वडगाव ग्रामस्थांनी आभार मानले.

फोटो ओळ : वडगाव - घेनंद (ता. खेड) येथे 'विकेल ते पिकेल' योजनेअंतर्गत रयत बाजाराचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे.(छाया : भानुदास पऱ्हाड)