शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब ...

शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सेंद्रिय शेती पिकवली पाहिजे. ज्यामुळे पिकविणाऱ्यांसोबत खाणाऱ्यांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पिकविलेला शेतमाल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा,’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.

वडगाव घेनंद (ता. खेड) येथे मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्वामी समर्थ सेंद्रिय गटाच्या माध्यमातून संतशिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, माजी सभापती रमेश पवार, सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच उज्वला घेनंद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, मृदा शास्रज्ञ डॉ. सी.आर पालवे, कीड रोग शास्रज्ञ डॉ. रवींद्र कारंडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, खेड तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे आदिंसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी - माजी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्मा प्रकल्प संचालक साबळे म्हणाले, शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्री केल्याने शेतकऱ्याला जास्त नफा होतो. ग्राहकाला ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलबध होतील. शेतकरी व शेतकरी गट थेट ग्राहकापर्यंत जोडण्यात येतील. विभागीय कृषी सहसंचालक बिराजदार म्हणाले, शेतमालाचे ग्रेडींग केल्यास गावतील गटामार्फत शेतमालाची विक्री होईल शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल. शेतमालावर प्रक्रिया केली पाहिजे. शेतकरी गटांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा. गटाला कर्जपुरवठा कमी व्याजदरात भेटतो त्याचा फायदा घेऊन गट बळकटीकरण करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक मंगेश किर्वे, जयश्री पाडेकर तसेच चाकण मंडल कार्यालयातील कर्मचारी वर्गाने केले. सूत्रसंचालन ज्योती राक्षे यांनी तर वडगाव ग्रामस्थांनी आभार मानले.

फोटो ओळ : वडगाव - घेनंद (ता. खेड) येथे 'विकेल ते पिकेल' योजनेअंतर्गत रयत बाजाराचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे.(छाया : भानुदास पऱ्हाड)