शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब ...

शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सेंद्रिय शेती पिकवली पाहिजे. ज्यामुळे पिकविणाऱ्यांसोबत खाणाऱ्यांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पिकविलेला शेतमाल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा,’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.

वडगाव घेनंद (ता. खेड) येथे मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्वामी समर्थ सेंद्रिय गटाच्या माध्यमातून संतशिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, माजी सभापती रमेश पवार, सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच उज्वला घेनंद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, मृदा शास्रज्ञ डॉ. सी.आर पालवे, कीड रोग शास्रज्ञ डॉ. रवींद्र कारंडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, खेड तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे आदिंसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी - माजी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्मा प्रकल्प संचालक साबळे म्हणाले, शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्री केल्याने शेतकऱ्याला जास्त नफा होतो. ग्राहकाला ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलबध होतील. शेतकरी व शेतकरी गट थेट ग्राहकापर्यंत जोडण्यात येतील. विभागीय कृषी सहसंचालक बिराजदार म्हणाले, शेतमालाचे ग्रेडींग केल्यास गावतील गटामार्फत शेतमालाची विक्री होईल शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल. शेतमालावर प्रक्रिया केली पाहिजे. शेतकरी गटांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा. गटाला कर्जपुरवठा कमी व्याजदरात भेटतो त्याचा फायदा घेऊन गट बळकटीकरण करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक मंगेश किर्वे, जयश्री पाडेकर तसेच चाकण मंडल कार्यालयातील कर्मचारी वर्गाने केले. सूत्रसंचालन ज्योती राक्षे यांनी तर वडगाव ग्रामस्थांनी आभार मानले.

फोटो ओळ : वडगाव - घेनंद (ता. खेड) येथे 'विकेल ते पिकेल' योजनेअंतर्गत रयत बाजाराचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे.(छाया : भानुदास पऱ्हाड)