शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब ...

शेलपिंपळगाव : ‘‘शेती क्षेत्रात बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांची प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सेंद्रिय शेती पिकवली पाहिजे. ज्यामुळे पिकविणाऱ्यांसोबत खाणाऱ्यांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पिकविलेला शेतमाल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा,’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.

वडगाव घेनंद (ता. खेड) येथे मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्वामी समर्थ सेंद्रिय गटाच्या माध्यमातून संतशिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या दीपाली काळे, माजी सभापती रमेश पवार, सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच उज्वला घेनंद, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, मृदा शास्रज्ञ डॉ. सी.आर पालवे, कीड रोग शास्रज्ञ डॉ. रवींद्र कारंडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, खेड तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे आदिंसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी - माजी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्मा प्रकल्प संचालक साबळे म्हणाले, शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्री केल्याने शेतकऱ्याला जास्त नफा होतो. ग्राहकाला ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलबध होतील. शेतकरी व शेतकरी गट थेट ग्राहकापर्यंत जोडण्यात येतील. विभागीय कृषी सहसंचालक बिराजदार म्हणाले, शेतमालाचे ग्रेडींग केल्यास गावतील गटामार्फत शेतमालाची विक्री होईल शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल. शेतमालावर प्रक्रिया केली पाहिजे. शेतकरी गटांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा. गटाला कर्जपुरवठा कमी व्याजदरात भेटतो त्याचा फायदा घेऊन गट बळकटीकरण करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक मंगेश किर्वे, जयश्री पाडेकर तसेच चाकण मंडल कार्यालयातील कर्मचारी वर्गाने केले. सूत्रसंचालन ज्योती राक्षे यांनी तर वडगाव ग्रामस्थांनी आभार मानले.

फोटो ओळ : वडगाव - घेनंद (ता. खेड) येथे 'विकेल ते पिकेल' योजनेअंतर्गत रयत बाजाराचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे.(छाया : भानुदास पऱ्हाड)