शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:18 IST

मार्गासनी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले. पुणे ...

मार्गासनी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले. पुणे येथील विधान भवन येथे कृषिमंत्री दादासाहेब भुसे आले होते. त्यावेळी बचत गटातील सदस्यांनी त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान गटातील सदस्यांचे त्यांनी कौतुक केले तर इंद्रायणी तांदुळाची गुणवत्ता राखून ठेवण्याचे गटातील शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी कृषी संचालक दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, रफीक नाईकवाडी, उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार, तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर,कृषी सहायक तुषार तडवी, आत्माचे नीलेश अबदाहगिरे, शेतकरी लक्ष्मण भोसले,किरण भोसले अशोक लिम्हण, महेश सणस आदी उपस्थित होते. यावेळी वेल्हे तालुक्यातील विंझर संजीवनी सेंद्रिय बचत गटातून तयार झालेल्या इंद्रायणीच्या जातीच्या तांदळांचे राजतोरण व राजगड तांदळाच्या ब्रॅंडचे कौतुक कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.

दादासाहेब भुसे म्हणाले की, सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने पिकांची गुणवत्ता चांगली राहते

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. तसेच विंझर येथील संजीवनी गटातील सर्व सदस्यांचा सत्कार यावेळी दादासाहेब भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.

वेल्हे तालुक्यातील सेंद्रिय शेतीमधून निघालेला इंद्रायणी जातीच्या तांदळास चांगली बाजारपेठेत

मागणी वाढली आहे. विंझर येथील संजीवनी बचतगटाने सेंद्रिय पद्धतीने शेती करून इंद्रायणी

जातीच्या तांदळांचे उत्पादन केले असून राजतोरण नावाने ग्राहकांपर्यत पोहचवत आहे. ग्राहकांच्या पसंतीस हा तांदूळ चांगला उतरला असून गटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर वितरण सुरू झाले आहे. आतापर्यंत इंद्रायणी जातीचा तांदळाची २० टन तांदळाची विक्री झाली असल्याची माहिती संजीवनी गटाचे अध्यक्ष दिनकर भोसले यांनी दिली.

सेंद्रिय पद्धतीने केलेला राजतोरण इंद्रायणी तांदळाचे उत्पादन चांगले चालले असून भविष्यात गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादन घेतले जाणार आहे

- दिनकर भोसले, सदस्य, संजीवनी गट विंझर

०५ मार्गासनी

कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते विंझर येथील संजीवनी गटाचे लक्ष्मण भोसले व इतर शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.