शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पिके वाचविण्याची शेतक:यांची धडपड!

By admin | Updated: November 28, 2014 23:05 IST

बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक रोग आक्रमण करू लागले आहेत.

शेलपिंपळगाव : बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक रोग आक्रमण करू लागले आहेत. हंगामातील प्रमुख असलेल्या कांदा पिकाला याचा मोठा फटका बसत आहे. अन्य पिकांवर मावा, पीळ तसेच अळी रोगाची सर्वाधिक लागण झाली आहे. त्यामुळे ही बाधित पिके वाचविण्यासाठी महागडय़ा औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतक:यांवर आली असून, पिके वाचविण्याची त्याची धडपड  सुरू आहे. 
या हंगामात कांदा, ज्वारी, मका, फुलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झाला आहे. परंतु, चालू हंगामात कांदारोपाच्या तुटवडय़ापायी बहुतांशी शेतक:यांनी फळपिकांव्यतिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका व पालेभाज्यांची लागवड केली आहे.  पिकांवर 
पांढरे डाग पडले आहेत. 
कांद्याला करपा व मावा रोगाची सर्वाधिक लागण होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन वाढीच्या काळात त्याची वाढ खुंटली आहे, तर वाढत्या उन्हाच्या झळांचा फ्लॉवर पिकांवर परिणाम झाला आहे. लागवडीनंतर अवघ्या काही दिवसांतच पिकाला लहान-लहान गड्डे येऊ लागले आहेत. लहान वयात लागलेले पीक म्हणजे पीक बाद झाल्याची पावती असते. परिसरात अनेक ठिकाणी पिकांची हीच अवस्था पाहावयास मिळत आहे. 
रब्बी हंगामात प्रामुख्याने घेतले जाणारे ज्वारी, हरभरा, ऊस, कांदा, मका, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या आदी पिकांना अधिक पसंती दिली. 
टोमॅटो पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. पिकांना रोगराईपासून वाचवण्यासाठी शेतकरी बाजारातील महागडी रासायनिक औषधे खरेदी करून पिकावर मारत आहे; मात्र तोही प्रयत्न अपयशी होत आहे.  गेल्या आठवडय़ात खेड तालुक्यासह शिरूरच्या काही भागांत पाऊस झाल्याने अनेक पिकांचे अतोनात नुकसान घडून आले. ज्वारीवर चिकटा तर मका पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवत आहे. (वार्ताहर)
 
दोन दिवसांपासून वातावरणात गुलाबी थंडीची चाहूल लागू लागली आहे. पिकांच्या वाढीच्या दृष्टीने थंडी पोषक मानली जाते. मात्र, थंडीबरोबर दव पडल्यास ते पिकासाठी अधिक धोकादायक बनते. कांदा, ज्वारी, हरभरा, पालेभाज्या (मेथी, कोथिंबीर, पालक) या पिकांना थंड वातावरण अनुकूल असते. मात्र, दोडका, भेंडी, तोंडले, दुधी भोपळा अशा वेलवर्गीय पिकांसह फळपिकांना या थंडीचा फटका सहन करावा लागतो.
-  डॉ. रामचंद्र साबळे , हवामान व शेतीतज्ज्ञ
 
कांद्याची महागडी रोपे खरेदी करून लागवडी केल्या. मात्र, लागवडीच्या दिवसापासून ते आजर्पयत पिकाला पोषक वातावरण लाभत नसल्याने पीक अडचणीत आले आहे. त्यातच दुकानातील महागडी रासायनिक औषधे वारंवार खरेदी करावी लागत असल्याने याची आर्थिक झळ सोसावी लागते असल्याचे कचरूनाना वाजे, रमेश गोडसे, एकनाथ आवटे या शेतक:यांनी सांगितले.