शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मानचे पैसे जमाकरून खतांच्या किमती वाढवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:09 IST

(रविकिरण सासवडे) बारामती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर, लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती ...

(रविकिरण सासवडे)

बारामती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर, लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हे म्हणजे शेतकऱ्यांच्या कंबरेचे सोडून त्यांच्याच डोक्याला बांधण्याचा प्रकार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटू लागल्या आहेत.

रासायनिक खतांच्या किमतीचे नियंत्रण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते. सलग दुसऱ्यावर्षी कोरोना संकटाचा सामना करत शेतकरीवर्गाकडून खरिपाची तयारी सुरू आहे. तर, बागायती पट्ट्यात देखील याच सुमारास ऊस लागवडी केल्या जातात. नेमकी हीच वेळ साधत रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचे गणित कोलमडणार आहे. कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी शेतमालाला कवडीचीही किंमत मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आगामी हंगामात भांडवल कसे उभे करायचे, या विवनचनेत शेतकरी असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. इंधनदरवाढीमुळे मशागतीचा देखील खर्च वाढला आहे. आता खतांच्या किमतीसुद्धा वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने किसान सन्मान योजने अंतर्गत तीन महिन्यांतून एकदा २ हजार याप्रमाणे पैसे जमा केले. त्यानंतर लगेच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना मदत केल्यासारखे दाखवून लुटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनानी केला आहे.

-----------------

बारामती येथे माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये. एनपीके खतांचा वापर करावा. केंद्र सरकारला आमची विनंती आहे की, रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात. तसेच, किमती वाढल्यामुळे वेगवेगळी खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत.

-----------------

कोरोना संकट आणि आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या किमती वाढवने म्हणजे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात ढकलण्यासारखे आहे. खराप हंगामावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. देशाच्या अन्नसुरक्षेवर देखील याचा परिणामी होईल. खतांच्या वाढीव किमती तातडीने मागे घेतल्या पाहिजेत किंवा हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्यायला हवे.

- डॉ. अजित नवले

राज्य सरचिटणीस

अखिल भारतीय किसान सभा

-------------------

रासायनिक खतांच्या किमती वाढवणे हा खरेतर देशद्रोह आहे. किमती वाढवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हाताबाहेर रासायनिक खते जाणार आहेत. परिणामी, गोरगरीब शेतकरी खतांचा वापर करणार नाही. देशाच्या उत्पन्न व उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. देशाचे उत्पादन घटणार असल्याने रासायनिक खतांच्या किमती वाढवणे हा देशद्रोह आहे.

-पांडुरंग रायते

जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे

--------------------

रासायनिक खतांचे जुने व नवीन दर

खते जुने दर नवीन दर

१०:२६:२६ - १, १७५ - १, ७७५

१२:३२:१६-१,१९०-१८००

२४:२४:०- १,३५०- १,९००

२०:२०:०-९७५- १,३५० ते १,४००

२०:२०:१३-१०५० ते १,०००- १,३५० ते १,६००

डीएपी - १,१८५ ते १,२०० - १,९००

पोटॅश - ८५० - १,०००