शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
भारतीय नौदल चीन, पाकिसातन, तुर्की अन् चीनला धक्का देणार! तीन पावले उचलली
4
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
5
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
6
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
7
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
8
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
9
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
10
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
11
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
12
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
13
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
14
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
15
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
16
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
17
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
18
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
19
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
20
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक

किसान सन्मानचे पैसे जमाकरून खतांच्या किमती वाढवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:09 IST

(रविकिरण सासवडे) बारामती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर, लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती ...

(रविकिरण सासवडे)

बारामती: पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे जमा केल्यानंतर, लगेच आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती ३० ते ४० टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हे म्हणजे शेतकऱ्यांच्या कंबरेचे सोडून त्यांच्याच डोक्याला बांधण्याचा प्रकार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटू लागल्या आहेत.

रासायनिक खतांच्या किमतीचे नियंत्रण पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असते. सलग दुसऱ्यावर्षी कोरोना संकटाचा सामना करत शेतकरीवर्गाकडून खरिपाची तयारी सुरू आहे. तर, बागायती पट्ट्यात देखील याच सुमारास ऊस लागवडी केल्या जातात. नेमकी हीच वेळ साधत रासायनिक खतांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाचे गणित कोलमडणार आहे. कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी शेतमालाला कवडीचीही किंमत मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आगामी हंगामात भांडवल कसे उभे करायचे, या विवनचनेत शेतकरी असतानाच रासायनिक खतांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. इंधनदरवाढीमुळे मशागतीचा देखील खर्च वाढला आहे. आता खतांच्या किमतीसुद्धा वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने किसान सन्मान योजने अंतर्गत तीन महिन्यांतून एकदा २ हजार याप्रमाणे पैसे जमा केले. त्यानंतर लगेच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांना मदत केल्यासारखे दाखवून लुटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनानी केला आहे.

-----------------

बारामती येथे माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, रासायनिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये. एनपीके खतांचा वापर करावा. केंद्र सरकारला आमची विनंती आहे की, रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात. तसेच, किमती वाढल्यामुळे वेगवेगळी खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत.

-----------------

कोरोना संकट आणि आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या किमती वाढवने म्हणजे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटात ढकलण्यासारखे आहे. खराप हंगामावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. देशाच्या अन्नसुरक्षेवर देखील याचा परिणामी होईल. खतांच्या वाढीव किमती तातडीने मागे घेतल्या पाहिजेत किंवा हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्यायला हवे.

- डॉ. अजित नवले

राज्य सरचिटणीस

अखिल भारतीय किसान सभा

-------------------

रासायनिक खतांच्या किमती वाढवणे हा खरेतर देशद्रोह आहे. किमती वाढवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हाताबाहेर रासायनिक खते जाणार आहेत. परिणामी, गोरगरीब शेतकरी खतांचा वापर करणार नाही. देशाच्या उत्पन्न व उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. देशाचे उत्पादन घटणार असल्याने रासायनिक खतांच्या किमती वाढवणे हा देशद्रोह आहे.

-पांडुरंग रायते

जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, पुणे

--------------------

रासायनिक खतांचे जुने व नवीन दर

खते जुने दर नवीन दर

१०:२६:२६ - १, १७५ - १, ७७५

१२:३२:१६-१,१९०-१८००

२४:२४:०- १,३५०- १,९००

२०:२०:०-९७५- १,३५० ते १,४००

२०:२०:१३-१०५० ते १,०००- १,३५० ते १,६००

डीएपी - १,१८५ ते १,२०० - १,९००

पोटॅश - ८५० - १,०००