शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

शेतात येणाऱ्या रासायनिक पाण्याविरोधात शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:08 IST

-- कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक दूषित पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक शासकीय कार्यालये, ...

--

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक दूषित पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक शासकीय कार्यालये, अधिकारी, नेते यांच्या पायऱ्या जिझवून कोठेच न्याय न मिळाल्याने बाधित शेतकऱ्यांनी अखेर दौंड तहसील कार्यालासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसह अन्य विविध संघटनांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत तहसीलदार संजय पाटील यांनी देखील शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. मात्र शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम असून उपोषण सुरू ठेवले आहे.

गेली अनेक वर्षे या प्रदूषणाबाबत विविध स्तरावर चर्चा घडून आल्या होत्या. मात्र, आजवर कुठल्याही निर्णयापर्यंत कुठलीच यंत्रणा पोहोचू शकली नसल्याने मागील तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात येणाऱ्या दूषित पाण्याच्या चारीला मुरुमाच्या साहाय्याने बुजवून टाकले होते. परिणामी, हे सर्व दूषित पाणी पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवारस्त्यासह मुख्य रस्त्यावर जमा होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता. यावर विविध बातम्यांची दखल घेत तहसीलदार संजय पाटील व प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी बंद करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र याचा तसूभरही परिणाम तत्सम यंत्रणेवर झाला नाही.

दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावर पाणी आल्याने राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने या चारीमधील मुरूम-माती काढून टाकत रस्ता मोकळा केला असल्याचा खुलासा तहसीलदार संजय पाटील यांनी केला होता. चर मोकळी केल्याने घातक रासायनिक पाणी पुन्हा शेतात पाणी घुसले व शेती नापीक होत आहे. अनेक प्रयत्न करून देखील कुठेही न्याय मिळत नसल्याने शेवटी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

--

संघर्षाची दुसरी पिढी

--

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पाण्याच्या समस्येने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या पिढीने पुढाकार घेत या विरोधात सोशल मीडिया व इतर विविध सामाजिक माध्यमांचा अवलंब करीत त्यांच्यावर झालेल्या अन्याया विरोधात आवाज उठवला आहे. त्यामुळे गेल्या वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील न्याय न देणारी सरकारी यंत्रणा कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन दुसऱ्या पिढीतील तरुणांना तरी न्याय देणार का? हे पाहणे आवश्यक आहे.