शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

विहिरीच्या नोंदणीसाठी चार महिन्यांपासून शेतकरी वेठीस

By admin | Updated: May 22, 2016 00:43 IST

‘जे न करी लल्लाटी, ते करी तलाठी’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते. कुत्र्याच्या भीतीने दमछाक होऊन झाडावर चढलेला तलाठी कुत्र्याला म्हणतो, ‘तुला माहीत नाही, तू कुणाशी पंगा घेतोय

ओझर : ‘जे न करी लल्लाटी, ते करी तलाठी’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते. कुत्र्याच्या भीतीने दमछाक होऊन झाडावर चढलेला तलाठी कुत्र्याला म्हणतो, ‘तुला माहीत नाही, तू कुणाशी पंगा घेतोय तुला एक गुंठा जरी जमीन असती ना मग तुला कळले असते, तलाठी काय चीज आहे,’ अशीच अवस्था एका शेतकऱ्याची झाली आहे.जुन्नर तालुक्यात आमदारांचे तलाठी मारहाण प्रकरण धगधगत असतानाच, नुकतेच पांगरीतर्फे ओतूर येथील तलाठ्याने दुष्काळाची पार्श्वभूमी असूनदेखील स्वत:च्या अहंकारापोटी वरिष्ठांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत एका शेतकऱ्याच्या चार महिन्यांपूर्वी नव्याने तयार झालेल्या विहिरीच्या नोंदणीसाठी, गेली तीन-चार महिने वेठीस धरले आहे. शेवटी या शेतकऱ्याला महसूल विभागाच्या लालफितीच्या कारभाराचा हिसका दाखवला आहे, तलाठी कार्यालयातच बसून गावाची सांगोवांगी पीक पाहणी नोंदवणाऱ्या महसूल खात्यात निर्ढावलेल्या काही निवडक तलाठ्यांमुळे शेतकरी वर्ग अक्षरश: मेटाकुटीस आला आहे .दुष्काळाची चाहूल ओळखून या शेतकऱ्याने सहा महिन्यांपूर्वी आपली जागा विहिरीत काही हिश्श्याच्या पाणी वापराच्या मोबदल्यात त्याचे बंधू तालूक्यातील कांद्याचे एक प्रथितयश व्यापारी यांना दिली. त्यांनी स्वखर्चाने या जागेत विहीर खोदकाम केले .विहिरीला चांगले पाणी लागले. विहिरीचे आरसीसी बांधकाम करून सुमारे सहा लाख रुपये खर्च केला. आता विहिरीची महसूल दप्तरी नोंद करून वीजजोडणी घायची व विहिरीचा पाण्याचा वापर सुरू करायचा दुष्काळात लोकांच्या विहिरींना पाणी नाही, आपल्या विहिरीला पाणी लागले आहे. आता आपण आपल्या बरोबर लोकांचीही तहान भागवू शकतो, या आनंदात हे दोघे भाऊ होते. परंतु, विहिरींची महसूल दफ्तरी नोंद झाल्याशिवाय वीजजोडणी मिळत नाही, वीज जोडणीशिवाय विहिरीतील पाण्याचा वापर हे शेतकरी करू शकत नव्हते. या विहिरीच्या नोंदणीसाठी तलाठ्याकडे गेल्यानंतर या आनंदावर विरजण पडले, तीन महिने या शेतकऱ्यांनी विहीर नोंदणीसाठी हेलपाटे मारले. शेवटी ही विहीर गावातील जबाबदार लोकांच्या सांगण्यानुसार ओढ्यात अतिक्रमणात आहे मी नोंद करू शकत नाही, असे सांगून तुमचे प्रकरण मार्गदर्शनासाठी तहसीलदार यांच्याकडे पाठविले आहे, असे उत्तर दिले. हे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे देऊन एक महिना उलटला, तरी त्यावर काही हालचाल नाही. यावर शेतकऱ्याला तलाठ्याने आकडे टाकून वीज घेण्याचा सल्ला दिला आहे़