शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

विहिरीच्या नोंदणीसाठी चार महिन्यांपासून शेतकरी वेठीस

By admin | Updated: May 22, 2016 00:43 IST

‘जे न करी लल्लाटी, ते करी तलाठी’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते. कुत्र्याच्या भीतीने दमछाक होऊन झाडावर चढलेला तलाठी कुत्र्याला म्हणतो, ‘तुला माहीत नाही, तू कुणाशी पंगा घेतोय

ओझर : ‘जे न करी लल्लाटी, ते करी तलाठी’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते. कुत्र्याच्या भीतीने दमछाक होऊन झाडावर चढलेला तलाठी कुत्र्याला म्हणतो, ‘तुला माहीत नाही, तू कुणाशी पंगा घेतोय तुला एक गुंठा जरी जमीन असती ना मग तुला कळले असते, तलाठी काय चीज आहे,’ अशीच अवस्था एका शेतकऱ्याची झाली आहे.जुन्नर तालुक्यात आमदारांचे तलाठी मारहाण प्रकरण धगधगत असतानाच, नुकतेच पांगरीतर्फे ओतूर येथील तलाठ्याने दुष्काळाची पार्श्वभूमी असूनदेखील स्वत:च्या अहंकारापोटी वरिष्ठांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत एका शेतकऱ्याच्या चार महिन्यांपूर्वी नव्याने तयार झालेल्या विहिरीच्या नोंदणीसाठी, गेली तीन-चार महिने वेठीस धरले आहे. शेवटी या शेतकऱ्याला महसूल विभागाच्या लालफितीच्या कारभाराचा हिसका दाखवला आहे, तलाठी कार्यालयातच बसून गावाची सांगोवांगी पीक पाहणी नोंदवणाऱ्या महसूल खात्यात निर्ढावलेल्या काही निवडक तलाठ्यांमुळे शेतकरी वर्ग अक्षरश: मेटाकुटीस आला आहे .दुष्काळाची चाहूल ओळखून या शेतकऱ्याने सहा महिन्यांपूर्वी आपली जागा विहिरीत काही हिश्श्याच्या पाणी वापराच्या मोबदल्यात त्याचे बंधू तालूक्यातील कांद्याचे एक प्रथितयश व्यापारी यांना दिली. त्यांनी स्वखर्चाने या जागेत विहीर खोदकाम केले .विहिरीला चांगले पाणी लागले. विहिरीचे आरसीसी बांधकाम करून सुमारे सहा लाख रुपये खर्च केला. आता विहिरीची महसूल दप्तरी नोंद करून वीजजोडणी घायची व विहिरीचा पाण्याचा वापर सुरू करायचा दुष्काळात लोकांच्या विहिरींना पाणी नाही, आपल्या विहिरीला पाणी लागले आहे. आता आपण आपल्या बरोबर लोकांचीही तहान भागवू शकतो, या आनंदात हे दोघे भाऊ होते. परंतु, विहिरींची महसूल दफ्तरी नोंद झाल्याशिवाय वीजजोडणी मिळत नाही, वीज जोडणीशिवाय विहिरीतील पाण्याचा वापर हे शेतकरी करू शकत नव्हते. या विहिरीच्या नोंदणीसाठी तलाठ्याकडे गेल्यानंतर या आनंदावर विरजण पडले, तीन महिने या शेतकऱ्यांनी विहीर नोंदणीसाठी हेलपाटे मारले. शेवटी ही विहीर गावातील जबाबदार लोकांच्या सांगण्यानुसार ओढ्यात अतिक्रमणात आहे मी नोंद करू शकत नाही, असे सांगून तुमचे प्रकरण मार्गदर्शनासाठी तहसीलदार यांच्याकडे पाठविले आहे, असे उत्तर दिले. हे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे देऊन एक महिना उलटला, तरी त्यावर काही हालचाल नाही. यावर शेतकऱ्याला तलाठ्याने आकडे टाकून वीज घेण्याचा सल्ला दिला आहे़