शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीच्या नोंदणीसाठी चार महिन्यांपासून शेतकरी वेठीस

By admin | Updated: May 22, 2016 00:43 IST

‘जे न करी लल्लाटी, ते करी तलाठी’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते. कुत्र्याच्या भीतीने दमछाक होऊन झाडावर चढलेला तलाठी कुत्र्याला म्हणतो, ‘तुला माहीत नाही, तू कुणाशी पंगा घेतोय

ओझर : ‘जे न करी लल्लाटी, ते करी तलाठी’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते. कुत्र्याच्या भीतीने दमछाक होऊन झाडावर चढलेला तलाठी कुत्र्याला म्हणतो, ‘तुला माहीत नाही, तू कुणाशी पंगा घेतोय तुला एक गुंठा जरी जमीन असती ना मग तुला कळले असते, तलाठी काय चीज आहे,’ अशीच अवस्था एका शेतकऱ्याची झाली आहे.जुन्नर तालुक्यात आमदारांचे तलाठी मारहाण प्रकरण धगधगत असतानाच, नुकतेच पांगरीतर्फे ओतूर येथील तलाठ्याने दुष्काळाची पार्श्वभूमी असूनदेखील स्वत:च्या अहंकारापोटी वरिष्ठांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत एका शेतकऱ्याच्या चार महिन्यांपूर्वी नव्याने तयार झालेल्या विहिरीच्या नोंदणीसाठी, गेली तीन-चार महिने वेठीस धरले आहे. शेवटी या शेतकऱ्याला महसूल विभागाच्या लालफितीच्या कारभाराचा हिसका दाखवला आहे, तलाठी कार्यालयातच बसून गावाची सांगोवांगी पीक पाहणी नोंदवणाऱ्या महसूल खात्यात निर्ढावलेल्या काही निवडक तलाठ्यांमुळे शेतकरी वर्ग अक्षरश: मेटाकुटीस आला आहे .दुष्काळाची चाहूल ओळखून या शेतकऱ्याने सहा महिन्यांपूर्वी आपली जागा विहिरीत काही हिश्श्याच्या पाणी वापराच्या मोबदल्यात त्याचे बंधू तालूक्यातील कांद्याचे एक प्रथितयश व्यापारी यांना दिली. त्यांनी स्वखर्चाने या जागेत विहीर खोदकाम केले .विहिरीला चांगले पाणी लागले. विहिरीचे आरसीसी बांधकाम करून सुमारे सहा लाख रुपये खर्च केला. आता विहिरीची महसूल दप्तरी नोंद करून वीजजोडणी घायची व विहिरीचा पाण्याचा वापर सुरू करायचा दुष्काळात लोकांच्या विहिरींना पाणी नाही, आपल्या विहिरीला पाणी लागले आहे. आता आपण आपल्या बरोबर लोकांचीही तहान भागवू शकतो, या आनंदात हे दोघे भाऊ होते. परंतु, विहिरींची महसूल दफ्तरी नोंद झाल्याशिवाय वीजजोडणी मिळत नाही, वीज जोडणीशिवाय विहिरीतील पाण्याचा वापर हे शेतकरी करू शकत नव्हते. या विहिरीच्या नोंदणीसाठी तलाठ्याकडे गेल्यानंतर या आनंदावर विरजण पडले, तीन महिने या शेतकऱ्यांनी विहीर नोंदणीसाठी हेलपाटे मारले. शेवटी ही विहीर गावातील जबाबदार लोकांच्या सांगण्यानुसार ओढ्यात अतिक्रमणात आहे मी नोंद करू शकत नाही, असे सांगून तुमचे प्रकरण मार्गदर्शनासाठी तहसीलदार यांच्याकडे पाठविले आहे, असे उत्तर दिले. हे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे देऊन एक महिना उलटला, तरी त्यावर काही हालचाल नाही. यावर शेतकऱ्याला तलाठ्याने आकडे टाकून वीज घेण्याचा सल्ला दिला आहे़