शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

आदिवासी भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डेहणे : खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डेहणे : खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे भात पिकांचे झाले आहे. या नुकसानग्रस्थ भागाची पाहणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पासनरे यांनी केली. या सोबतच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. लवकरतात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आवाहन त्यांनी केले.

अतिवृष्टीमुळे खेडचा पश्चिम भाग जलमय झाला आहे. ठिक ठिकाणी ताली, बांध वाहुन गेले तर अनेक पुल तुटले आहेत. त्यांचे भराव वाहुन गेले आहेत. नायफड येथील मोठा बंधारा फुटल्याने शेकडो एकर शेती वाहुन गेली आहे. भोरगीरी येथील अनेक बांध फुटले असुन जमीन वाहुन गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. धुवोली, पाबे, भिवेगाव, टोकावडे, वांजाळे, डेहणे येथील शेती चे पुरामळे नुकसान झाले आहे.

मंदोशी - जावळेवाडी (ता. खेड) या दोन गावांना जोडणारा रस्ता मोरी वाहून गेल्याने जावळेवाडीचा संपर्क तुटला आहे. घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेत हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून दळणवळणास खुला करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच तालुकास्तरावर संबंधीत अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

याप्रसंगी माजी सभापती अरुण चांभारे, सुजाता पचपिडं, जिल्हा दूध संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारे, किरण वांळुज, सरपंंच बबन गोडे,सरपंंच दत्ता खाडे, बांधकाम विभागाचे अधिकारी एल बी जोशी, सार्वजनिक बांधकाम अभियंता मधुकर भिंगारदेवे, ग्रामसेवक लेडें व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : मंदोशी-जावळेवाडी (ता. खेड) येथे वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे.

फोटो : खेड तालुक्यातील नुकसानग्रस्थ भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देतांना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि कृषी आणि पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर.