शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

कुटुंबाला वाळीत टाकलेल्या प्रकरणाचा सखोल तपास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीपासून अलिप्त होण्यासाठी घटस्फोटाचा दावा जातपंचायतीऐवजी न्यायालयात दाखल केल्याने मुलाच्या कुटुंबीयांना पावणेतीन वर्षांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीपासून अलिप्त होण्यासाठी घटस्फोटाचा दावा जातपंचायतीऐवजी न्यायालयात दाखल केल्याने मुलाच्या कुटुंबीयांना पावणेतीन वर्षांपासून जातपंचायतीच्या हुकुमावरून समाजातून बहिष्कृत केल्याची घटना वाकडमध्ये घडली. याप्रकरणी जातपंचायतीचे पाटील, पंच यांच्यासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने गुरुवारी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या कायदे विभागातील अॅड. मनीषा महाजन, प्रकाशन विभागाचे विशाल विमल यांच्यासह पीडित सीताराम सागरे यांच्यासह त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. सीताराम सागरे यांनी जातपंचायतीकडून देण्यात आलेल्या त्रासाचा अनुभव कथन केला. ते म्हणाले, पत्नी शीतल हिचे आई वडील, आजोबा करेप्पा मारुती वाघमारे, मामा बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे आणि बाळकृष्ण करेप्पा वाघमारे हे जातपंचायतीचे पाटील म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या पुढाकारानेच आमच्या कुटुंबीयांना बहिष्कृत करण्यात आले आहे. आमचा वाद आम्ही मिटवला असता. मात्र तिने विनाकारण तिच्या कुटुंबीयांना मध्यस्थी करण्यास भाग पाडले. सागरे कुटुंबीयांशी कुणी संबंध ठेवल्यास त्यांनाही वाळीत टाकू, असे फर्मान जातपंचायतीने काढले आहे. आम्ही हिंदू गोंधळी समाजाचे असून, ५२ गावांत जातपंचायत चालते. सर्वप्रकारचे कौटुंबिक वाद हे पंचायतीत सोडवले जातात. आमच्या समाजातील मुलींना शिकविले जात नाही. त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे.

महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकारामुळे राज्यातील १७ जातपंचायती बरखास्त

महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्यामुळे ३ जुलै २०१७ रोजी राज्यात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा झाला. ४ वर्षांत या कायद्यांतर्गत १५० गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात कोकण वगळता जिल्ह्यात सर्वाधिक १५ गुन्हे दाखल झाले आहेत. अंनिसच्या संवादी भूमिका आणि पुढाकारामुळे राज्यातील १७ जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत. सागरे कुटुंबीयांशी जातपंचायतीच्या हुकुमावरून अमानवीय वर्तन घडले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास जलगतीने व्हावा आणि या जातपंचायतीमुळे अन्य कुणी पीडित झाले असेल तर त्यांनीही तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन अॅड. मनीषा महाजन आणि विशाल विमल यांनी केले आहे.

----------------------------------------------------------------