शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

साखरेला उठाव नसल्याने कारखाने अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:10 IST

अवसरी: नुकत्याच झालेल्या गाळप हंगामात साखर उत्पादन अधिक झाले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे साखरेला उठाव नाही. त्यामुळे ...

अवसरी: नुकत्याच झालेल्या गाळप हंगामात साखर उत्पादन अधिक झाले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे साखरेला उठाव नाही. त्यामुळे साखर गोडावूनमध्ये पडून असल्याने साखर कारखानदारी अडचणीत आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सन २०१९-२० आर्थिक वर्षाची २४ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी चेअरमन बाळासाहेब बेंडे, या वेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव, सखाराम घोडेकर, आनंदराव शिंदे, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, यशवंत वाहतूक संस्थेचे अध्यक्ष गणपतराव इंदोरे, शरद सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात, कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग सैद आदी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यशस्वीपणे कारखान्याने विस्तारीकरण केल्यामुळे दररोज साडेसहा हजार मे.टन उसाचे गाळप होत असून ९ लाख ५० हजार मे.टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. कोव्हिड आजाराचे उपाययोजनासाठी जेथे सरकार कमी पडेल तेथे कारखाना व तालुक्यातील सहकारी संस्थांमार्फत मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच डिस्टीलरी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून त्यापासून अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामधून ऊस उत्पादकांना नेहमीच चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भाग विकास निधीमधूनही आवश्यक ती मदत करण्यात येते. सभासद, ऊस उत्पादक, हितचिंतक व कामगार या सर्वांच्या सहकार्यामुळे कारखाना प्रगती करीत आहे.

बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कोरोना काळात कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे काम केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, रोपवाटिका, बायोकंपोस्ट असे विविध प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे हीत साधले आहे. याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला ऊस दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

२१ अवसरी कारखाना सभा

भीमाशंकर कारखान्याच्या सभेप्रसंगी उपस्थित असलेले दिलीपराव वळसे पाटील, बाळासाहेब बेंडे व इतर.