शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

छेडछाडीच्या गुन्ह्यांकडे होतेय डोळेझाक

By admin | Updated: January 20, 2015 00:47 IST

महिलांशी संबंधित गुन्ह्यांकडे पोलीस संवेदनशीलपणे पाहत नाहीत. अनेकदा महिलांच्या तक्रारी ‘टेक्निकल’ असल्याचे सांगून गुन्हे दाखल करण्याचे टाळण्यात येते.

लक्ष्मण मोरे ल्ल पुणेमहिलांशी संबंधित गुन्ह्यांकडे पोलीस संवेदनशीलपणे पाहत नाहीत. अनेकदा महिलांच्या तक्रारी ‘टेक्निकल’ असल्याचे सांगून गुन्हे दाखल करण्याचे टाळण्यात येते. त्यामुळे संवेदनशीलपणे पाहिले जावे आणि गुन्ह्यांचा तपास पारदर्शकपणे व्हावा, याकरिता तपास अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकाऱ्याने काम पहावे तसेच फिर्यादही महिला अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यानेच घ्यावी, असा कायदा असतानाही महिला अधिकारी मात्र महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये उदासीन असल्याचे भोसरी येथे घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षात छेडछाडीच्या तब्बल ६० घटना पोलीस दरबारी दाखल झाल्या असून, महिलांच्या अपहरण आणि पळवून नेल्याच्या ८७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.बसथांब्यावर, बसमधून प्रवास करताना, शाळा-महाविद्यालयांचे आवार आणि त्याच्या बाहेर तसेच रस्त्यावरून चालताना आणि कधी कधी घरामध्येही लहान मुली, तरुणी, महिलांना छेडछाडीच्या घटनांचा सामना करावा लागतो. टवाळांची दहशत आणि बदनामीच्या भीतीमुळे तक्रार द्यायला फारच कमी महिला समोर येतात. ज्या हिंमत करून समोर येतात, त्यांना पोलीस बदनामीची भीती घालून तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अभिलेखावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी दाखविण्यासाठी पोलिसांकडून ‘समुपदेशन’ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महिलांना त्रास देणाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. रोडरोमिओंच्या या दहशतीमुळे अनेक मुली शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच तरुणी नोकरीवर जाण्याचे बंद करतात. याचा मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर अनेक तरुणी, मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. या घटनांकडे पोलीस केव्हा संवेदनशीलपणे पाहणार, हा प्रश्न आहे.भोसरी येथील नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांनी दाखविलेली दिरंगाई आणि विशेषत: महिला पोलीस उपनिरीक्षकाने दाखविलेली उदासीनता या मुलीच्या जिवावर बेतली. कुठूनही न्याय मिळत नाही म्हटल्यावर या मुलीने गळफास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा शेवटी मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिसांवर टीका होत आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची आणि नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांची भूमिकाच या घटनेत संशयास्पद आहे. महिलांविषयीच्या गुन्ह्यांमध्ये खरे तर खूपच संवेदनशीलता दाखविण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, नातेवाइकांकडून छळ अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत चालली आहे. अर्थात, गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. ही बाब प्रशंसनीय असली, तरीदेखील न दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही तेवढेच अधिक असणार आहे. मुली, तरुणी आणि महिलांमध्ये वाढत्या छेडछाडीच्या तसेच बलात्काराच्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना दृढ होऊ लागली आहे. याला पुरुषी मानसिकता जेवढी जबाबदार आहे, तेवढीच महिलांची सहनशक्तीही कारणीभूत आहे. रस्त्याने जर एखाद्या महिलेसोबत गैरकृत्य घडत असेल, तर केवळ बघ्याची भूमिका न घेता अन्य महिलांनी एकत्र येऊन त्याला प्रतिबंध करायला हवा. जी गोष्ट आपली बहीण, पत्नी, आईसोबत घडू नये, असे पुरुषाला वाटते तीच गोष्ट तो दुसऱ्या महिलेसोबत कसा करू शकतो? पुरुषांनीही अन्य स्त्रियांरडे आदराच्या भावनेने पाहणे गरजेचे आहे.- एक गृहिणीभोसरीमध्ये घडलेल्या घटनेत मुलीला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर मुलीचे प्राण वाचले असते. अंमलबजावणी झाली नाहीत, तर कायदे केवळ कागदावर राहतील व अत्याचारांमध्ये वाढ होत जाईल.- अ‍ॅड. अस्मा खान