शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

छेडछाडीच्या गुन्ह्यांकडे होतेय डोळेझाक

By admin | Updated: January 20, 2015 00:47 IST

महिलांशी संबंधित गुन्ह्यांकडे पोलीस संवेदनशीलपणे पाहत नाहीत. अनेकदा महिलांच्या तक्रारी ‘टेक्निकल’ असल्याचे सांगून गुन्हे दाखल करण्याचे टाळण्यात येते.

लक्ष्मण मोरे ल्ल पुणेमहिलांशी संबंधित गुन्ह्यांकडे पोलीस संवेदनशीलपणे पाहत नाहीत. अनेकदा महिलांच्या तक्रारी ‘टेक्निकल’ असल्याचे सांगून गुन्हे दाखल करण्याचे टाळण्यात येते. त्यामुळे संवेदनशीलपणे पाहिले जावे आणि गुन्ह्यांचा तपास पारदर्शकपणे व्हावा, याकरिता तपास अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकाऱ्याने काम पहावे तसेच फिर्यादही महिला अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यानेच घ्यावी, असा कायदा असतानाही महिला अधिकारी मात्र महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये उदासीन असल्याचे भोसरी येथे घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षात छेडछाडीच्या तब्बल ६० घटना पोलीस दरबारी दाखल झाल्या असून, महिलांच्या अपहरण आणि पळवून नेल्याच्या ८७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.बसथांब्यावर, बसमधून प्रवास करताना, शाळा-महाविद्यालयांचे आवार आणि त्याच्या बाहेर तसेच रस्त्यावरून चालताना आणि कधी कधी घरामध्येही लहान मुली, तरुणी, महिलांना छेडछाडीच्या घटनांचा सामना करावा लागतो. टवाळांची दहशत आणि बदनामीच्या भीतीमुळे तक्रार द्यायला फारच कमी महिला समोर येतात. ज्या हिंमत करून समोर येतात, त्यांना पोलीस बदनामीची भीती घालून तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अभिलेखावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी दाखविण्यासाठी पोलिसांकडून ‘समुपदेशन’ करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महिलांना त्रास देणाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. रोडरोमिओंच्या या दहशतीमुळे अनेक मुली शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच तरुणी नोकरीवर जाण्याचे बंद करतात. याचा मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर अनेक तरुणी, मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. या घटनांकडे पोलीस केव्हा संवेदनशीलपणे पाहणार, हा प्रश्न आहे.भोसरी येथील नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांनी दाखविलेली दिरंगाई आणि विशेषत: महिला पोलीस उपनिरीक्षकाने दाखविलेली उदासीनता या मुलीच्या जिवावर बेतली. कुठूनही न्याय मिळत नाही म्हटल्यावर या मुलीने गळफास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा शेवटी मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिसांवर टीका होत आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची आणि नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांची भूमिकाच या घटनेत संशयास्पद आहे. महिलांविषयीच्या गुन्ह्यांमध्ये खरे तर खूपच संवेदनशीलता दाखविण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, नातेवाइकांकडून छळ अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत चालली आहे. अर्थात, गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. ही बाब प्रशंसनीय असली, तरीदेखील न दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही तेवढेच अधिक असणार आहे. मुली, तरुणी आणि महिलांमध्ये वाढत्या छेडछाडीच्या तसेच बलात्काराच्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना दृढ होऊ लागली आहे. याला पुरुषी मानसिकता जेवढी जबाबदार आहे, तेवढीच महिलांची सहनशक्तीही कारणीभूत आहे. रस्त्याने जर एखाद्या महिलेसोबत गैरकृत्य घडत असेल, तर केवळ बघ्याची भूमिका न घेता अन्य महिलांनी एकत्र येऊन त्याला प्रतिबंध करायला हवा. जी गोष्ट आपली बहीण, पत्नी, आईसोबत घडू नये, असे पुरुषाला वाटते तीच गोष्ट तो दुसऱ्या महिलेसोबत कसा करू शकतो? पुरुषांनीही अन्य स्त्रियांरडे आदराच्या भावनेने पाहणे गरजेचे आहे.- एक गृहिणीभोसरीमध्ये घडलेल्या घटनेत मुलीला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर मुलीचे प्राण वाचले असते. अंमलबजावणी झाली नाहीत, तर कायदे केवळ कागदावर राहतील व अत्याचारांमध्ये वाढ होत जाईल.- अ‍ॅड. अस्मा खान