शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

उत्तरपत्रिका तपासणी डोळे झाकून ?

By admin | Updated: February 13, 2016 03:17 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून तपासल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिकांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे. मात्र, उत्तरपत्रिकेतील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त प्राध्यापकांकडून तपासल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिकांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे. मात्र, उत्तरपत्रिकेतील एकच प्रश्न दोन वेगवेगळ्या प्राध्यापकांनी तपासला असता, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणांमध्ये कमालीची तफावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्राध्यापकांकडून उत्तरपत्रिका काळजीपूर्वक तपासल्या जात नसल्याचे समोर येत आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे २0१५मध्ये अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यातील आयटीसीटी या विषयाची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासताना त्याला दोन प्रश्नांना प्रत्येकी सहा गुण दिले. मात्र, त्याचा उत्तरपत्रिकेतील एक प्रश्न तपासलाच नाही. विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेतल्यानंतर ही बाब त्याच्या लक्षात आली. त्यामुळे विद्यार्थ्याने परीक्षा विभागाकडे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. त्यावर दुसऱ्या मान्यताप्रात्र प्राध्यापकाने उत्तरपत्रिका तपासताना त्याच दोन प्रश्नांना प्रत्येकी १ गुण दिला. त्यामुळे प्रथमत: उत्तरपत्रिका तपासणाऱ्या किंवा दुसऱ्यांदा उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांनी डोळे झाकून गुण दिले असावेत, असे स्पष्ट होते. त्यातच एखादा प्रश्न तपासायचा राहिल्यास सर्व प्रश्न पुन्हा न तपासता केवळ एकच प्रश्न तपासून गुण द्यावेत, असा संकेत आहे. मात्र, या विद्यार्थ्याचे सर्व प्रश्न तपासले गेले. प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासताना हलगर्जीपणा केल्यास संबंधित प्राध्यापकाला नोटीस बजावून कारवाई करण्यास विद्यापीठाने सुरुवात केली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत मान्यताप्राप्त प्राध्यापकांची संख्या कमी आहे. त्यामुळे एक प्राध्यापकाला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. हे खरे असले; तरी काळजीपूर्वक तपासणी न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. त्यामुळे प्राध्यापकांनी डोळ्यांत तेल घालून बारकाईने उत्तरपत्रिका तपासावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला प्राध्यापकांनी योग्य गुणदान करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींमुळेच हलगर्जीपणाने उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यास विद्यापीठाने सुरुवात केली आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबत खूपच हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत असल्यास संबंधित उत्तरपत्रिका दुसऱ्या विद्यापीठातील प्राध्यापकांकडून तपासून घेतली जाईल.- डॉ.वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ