शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

अतिवृष्टी झाली, तर १७ गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST

(स्टार ९७४ डमी) पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यांतील ठरावीक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण ...

(स्टार ९७४ डमी)

पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यांतील ठरावीक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांना अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच मावळ, मुळशी, भोर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांतील १७ गावे दरडप्रवण म्हणून शासनाने घोषित केली आहेत. अतिवृष्टी झाल्यास या गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील धोकादायक किंवा दरडप्रवण गावांची यादी जाहीर केली आहे. तसेच या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या गावातील लोक गाव सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्नदेखील अद्यापही प्रलंबित आहे.

-----

* जिल्ह्यातील दरडप्रवण धोकादायक असलेली गावे

मावळ तालुक्यातील भुशी, बोरज, ताजे, गबालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग, मालेवाडी आणि लोहगड, तर भोर तालुक्यातील कोर्ले-जांभुळवाडी, पांगारी-सोनारवाडी, धानवली आणि हेडेन, आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी, मुळशी तालुक्यातील घुटके, खेड तालुक्यातील भोमाळे आणि जुन्नर तालुक्यातील तळमाची वाडी.

-----

* जिल्ह्यातील पुराचे पाणी साचणारी ठिकाणे

पुणे जिल्ह्यात देहू, आळंदी, राजगुरूनगर, शेलपिंपळगाव, डोंगरगाव, पिंपरी सांडस, मांजरी, थेऊर, शिरूर आदी गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यास पुराचे पाणी आतमध्ये शिरू शकते. त्यामुळे या गावातील अतिक्रमणे काढून नदीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा करणे गरजेचे आहे. अन्यथा पूरपरिस्थिती आणखी धोकादायक बनू शकते.

-----

* पाणी साचण्याची कारणे

या नदीकाठच्या गावांमध्ये मुख्यत: अतिक्रमण हा मुख्य मुद्दा आहे. अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. तसेच भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, घोड नदी, मुळा, मुठा या नद्यांवर उभारलेल्या पुलांची उंची मर्यादित असल्यामुळे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत आहे. पुराचे पाणी वेगाने जात नाही. त्यामुळे हे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरत आहे.

-----

* पाऊस नको नकोसा !

१) आमचे गाव दरडप्रवण म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला भीतीच्या छायेखालीच राहावे लागत आहे. अतिवृष्टी झाल्यास आमच्या गावाला धोका आहे. भविष्यात धोकादायक घटना होऊ नये, यासाठी शासनाने गावांचा पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- एक नागरिक, मोरमारेवाडी