शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार टन द्राक्षे निर्यात, द्राक्षांची वाढती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 02:43 IST

जुन्नर विभागातील द्राक्षबागा ९० टक्के संपल्या असून आजअखेरीस ३,४०० टनांहून अधिक द्राक्ष निर्यात झाल्याची माहिती कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी तात्यासाहेब कोळेकर यांनी दिली.

वडगाव कांदळी  - जुन्नर विभागातील द्राक्षबागा ९० टक्के संपल्या असून आजअखेरीस ३,४०० टनांहून अधिक द्राक्ष निर्यात झाल्याची माहिती कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी तात्यासाहेब कोळेकर यांनी दिली.या वर्षी डिसेंबरपासून हंगामाला सुरुवात झाली असून, २२० कंटेनर युरोपीयन युनियन आणि आशियाई देशांमध्ये आयएफसी ओव्हरसीज (डी जे एक्सपोर्ट) कंपनीमार्फत निर्यात केले आहे. जुन्नर, आंबेगाव तालुक्यात १००० हेक्टरहून अधिक द्राक्षाचे क्षेत्र असून द्राक्ष निर्यातीच्या माध्यमातून ३०६ कोटी रुपये तालुक्यात आले आहेत. जागतिक बाजारपेठेत जंबो, शरद सीडलेस, नाना पर्पल, थॉमसन आणि सोनाका यासारख्या सफेत रंगाच्या द्राक्षांना परदेशात मोठी मागणी आहे. आयएफसी ओव्हरसीजचे व्यवस्थापक बिजो जोसेफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की या वर्षी नारायणगाव परिसरामधून २२० हून अधिक कंटेनर युरोप, चीन, श्रीलंका, भूतान, थायलंड यासारख्या देशांत निर्यात केले असून, १०० कंटेनर हे भारतीय बाजारपेठेत पाठविले आहे. या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला बाजारभाव चढे होते; परंतु मधल्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली मंदी आणि चिली येथून आलेल्या द्राक्षांमुळे बाजारभाव ७० रुपयांपर्यंत खाली आले.या वर्षी किमान ७० ते कमाल ११० रुपये, तर सरासरी रुपये ९० ते ९५ इतका बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळाला आहे. सद्य:स्थितीत द्राक्षबागा ९० टक्के संपल्या असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत द्राक्षांची मागणी वाढत आहे. यामुळे बाजारभावात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फायदा शेवटच्या टप्प्यात असलेल्या द्राक्ष बागायतदारांना नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. द्राक्ष बागायतदार ऋषिकेश मेहेर, ऋतुपर्ण मेहेर, दिलीप वºहाडी म्हणाले, की या वर्षी ६० टक्के द्राक्षबागायतदारांनी मागील वर्षीच्या अनुभवानुसार मागणी आणि मिळालेला बाजारभावानुसार या वर्षी द्राक्ष छाटण्या आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये घेतल्या; परंतु या वर्षी हवामानात झालेल्या बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली.या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला बाजारभाव चढे होते; परंतु मधल्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली मंदी आणि चिली येथून आलेल्या द्राक्षांमुळे बाजारभाव ७० रुपयांपर्यंत खाली आले. या वर्षी किमान ७० ते कमाल ११० रुपये, तर सरासरी रुपये ९० ते ९५ इतका बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतमिळाला आहे.बाजारात असलेल्या मंदीचा फटका द्राक्षबागायतदारांना झाल्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परंतु, द्राक्ष संशोधन केंद्र पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्याकडून वेळोवेळी मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे निश्चितच मोठे नुकसान टाळण्यात यशस्वी झालो, असेही त्यांनी नमूद केले.प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादनखर्च आणि मजूरटंचाईवर मात करून येथील जिद्दी द्राक्षबागायतदारांनी आधुनिक तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर द्राक्षांच्या गुणवत्तेमुळे जागतिक बाजारपेठेत जुन्नरच्या द्राक्षांची मागणी वाढताना दिसत आहे. यामुळे येत्या काळात द्राक्षशेतीला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा शेतकरीवर्गाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती