शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

कालव्याच्या ‘एक्स्पायरी डेट’ संपल्या

By admin | Updated: December 24, 2016 00:21 IST

शेती सिंचनाची सोय होण्यासाठी ब्रिटिश काळात बांधलेल्या धरणांवर कालवे खोदण्यात आले. जवळपास सव्वाशे किलोमीटर लांबीचा

शेती सिंचनाची सोय होण्यासाठी ब्रिटिश काळात बांधलेल्या धरणांवर कालवे खोदण्यात आले. जवळपास सव्वाशे किलोमीटर लांबीचा नीरा डाव्या कालव्यावर लाखो एकर शेती पिकते. अनेक गावांना, शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. औद्योगिक वसाहतींना याच कालव्यातून पाणी दिले जाते. मात्र, सद्य:स्थितीला कालव्याची अवस्था दयनीय आहे. अनेक ठिकाणी बड्या शेतकऱ्यांनी कालव्याचे, चाऱ्यांचे भराव खोदून सायफनद्वारे पाणी नेण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे भराव खचले. मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. कालवा, वितरिका ठिकठिकाणी पाझरत आहे. त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने याबाबत घेतलेला आढावा.......कालव्याला कचराकुंडीचे स्वरूपनीरा डाव्या कालव्याच्या पाण्याला चांगलाच वेग असतो. तुडुंब भरलेला कालवा म्हणजे कचरा फे कण्याचे हक्काचे ठिकाण ही नवीन मानसिकता नागरिकांच्या मनात घर करीत आहे. कारण टाकलेला कचरा कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाच्या वेगात लगेच वाहून जातो. वाहून जाताना हा कचरा दिसत नाही. लगेच कालव्याच्या पोटात गडप होतो. कालव्यातून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाट मिळेल तिथे हा फेकून दिलेला कचरा वाहून जातो. मात्र, कालव्यातून पाणी बंद झाल्यानंतर फेकलेल्या कचऱ्याचे ढीग कालव्यामध्ये दिसून येतात. यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा अधिक समावेश आहे. कालव्यामध्ये दिवसेंदिवस कचरा टाकणाऱ्यांचीच संख्या मोठी आहे. त्यामुळे कालव्याला आलेले कचराकुंडीचे स्वरूप अस्वस्थ करणारे आहे.बारामती : नीरा डावा कालवा बारामती, इंदापूर तालुक्याची जीवनदायिनी मानला जातो. या कालव्यामुळेच येथील उजाड माळरानांचा परिसर हिरवाईने फुलला आहे. सर्वत्र असणाऱ्या हिरव्यागार शेतांमुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र, देखभालदुरुस्ती, पडझड झाल्याने कालव्याची मोठी दुरवस्था झाली आहे. भराव खचले, भरावालगत अतिक्रमणे वाढली. त्यामुळे कालव्यातून पाणी झिरपण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. आवर्तन सुटल्यावर कालव्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा डोह साठलेला असतो. नीरा डाव्या कालव्यावर अनेक पाणीपुरवठा योजनेसह हजारो एकर शेती सिंचन अवलंबून आहे. किंबहुना नीरा डाव्या कालव्यामुळेच या भागात कायापालट झाला आहे. येथील अर्थव्यवस्थेने कालव्याच्या पाण्यावरच उभारी घेतली आहे. साखर कारखानदारी विकसित झाल्याने मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीला मदत झाली. शेतकरीवर्ग ऊसशेती, फळबागांद्वारे सधन बनला. कालव्यातील पाण्यावरच येथे कमी पर्जन्यमानावरदेखील शेती फुलली आहे. सुमारे १०० हून अधिक वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यातून कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ही जीवनदायिनी अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे.बारामती, पणदरे, नीरा उपविभागामार्फत नीरा डाव्या कालव्यातील पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. त्यापैकी पणदरे उपविभागाअंतर्गत पणदरे, माळेगाव, वडगाव निंबाळकर, मानप्पावस्ती, मळद पाटबंधारे शाखेअंतर्गत त्यासाठी पाटबंधारे शाखा अभियंता, पाटकरी, कालवा निरीक्षक, कारकून, तारमास्तर आदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती असते. पणदरे उपविभागाअंतर्गत वितरिका क्र. ८ ते २४ चे कामकाज चालते, तर बारामती उपविभागाअंतर्गत बारामती इंदापूर तालुक्यातील सणसर, अंथुर्णे, निमगाव केतकी, बावडा या पाटबंधारे कार्यालयांचे कामकाज चालते. त्याअंतर्गत २६ ब ते वितरिका क्र. ५८ चे कामकाज चालते. मात्र, सर्वच वितरिकांची दुरवस्था झाल्याची कबुली पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.(प्रतिनिधी)