शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आव्हान दहावीच्या अचूक निकालाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चाचणी, सत्र परीक्षा, स्वाध्याय, गृहकार्य व्यवस्थित पूर्ण झाले आहे. पुणे-मुंबई सारख्या शहरी भागात याबाबत साशंकता आहे. ...

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चाचणी, सत्र परीक्षा, स्वाध्याय, गृहकार्य व्यवस्थित पूर्ण झाले आहे. पुणे-मुंबई सारख्या शहरी भागात याबाबत साशंकता आहे. त्यातच अचानक दिलेले काम पूर्ण करणे विद्यार्थी व शाळांसाठी तारेवरची कसरत आहे. नववीचा अभ्यासक्रम तुलनेने सखोल, संविधानिक गुणवत्ता याबाबत गुणवत्तेत असमानता येऊ शकते. अंतर्गत मूल्यमापनात समानतेबाबत संदिग्धता येऊ शकते. बोर्डासारख्या त्रयस्थ यंत्रणेकडून होणारे मूल्यमापन आणि शाळांचा निकाल याबाबत गुणवत्तेत फुगवटा येऊ शकतो.

कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक पालक शहरी भागातून गावी गेले आहेत. त्यामुळे त्यांचे योग्य मूल्यमापन करता आले नाही. शाळा कमी दिवस भरल्यामुळे पुरेसे लेखी काम करून घेणे शक्य न झाल्याने ३० गुणांचे मूल्यमापन करून घेण्यासाठी शाळांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. नववीमध्ये मागील वर्षी सत्र दोनची परीक्षा झालेली नसल्याने प्रथम सत्राच्या परीक्षेला एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर गुणदान करणे शिक्षकांना आव्हान ठरणार आहे. तसेच बौद्धकदृष्ट्या हुशार विद्यार्थ्यांना योग्य गुण देणे शिक्षकांसाठी आव्हानात्मक आहे.

जे विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा कोणत्याही शिक्षण प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, हा प्रश्नच आहे. नेहमी विद्यार्थी शिक्षकांना शिक्षकांच्या आसपास असूनही शंभर टक्के प्रतिसाद देत नव्हते. मग आत्ताच्या परिस्थितीत खूप मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे.

शासन निर्णयात खूप लवचिकता आहे. परंतु, त्यासाठी विद्यार्थी उपस्थित राहिले पाहिजे, यासाठी शाळांना आपले कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. मुख्याध्यापकांना सर्व अभिलेख निकालानंतर अठरा महिने जतन करून ठेवायचे आहेत. त्यात पारदर्शकता येण्यासाठी शाळा/ मुख्याध्यापकांना चांगले नियोजन करून मूल्यमापन प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

८० गुणांचे मूल्यमापन करताना एकवाक्यता ठेवणे कठीण होणार आहे. त्यासाठी विद्यार्थीनिहाय मूल्यमापन करावे लागणार आहे. कोणाचे स्वाध्याय, कोणाचे प्रकल्प, कोणाचे गृहकार्य अशा प्रकारे भिन्नता असेल. पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेले विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचणे व त्यांचे मूल्यमापन करणे जिकिरीचे होणार आहे.

नववीमध्ये विद्यार्थी दहावीप्रमाणे अभ्यास करत नाहीत. त्यामुळे त्यांना टक्केवारी कमी मिळालेली असण्याची शक्यता आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचे अधिकाधिक अचूक मूल्यमापन करण्याच्या या आव्हानाला सामोरे जाऊन शिक्षक, मुख्याध्यापकांना शासन निर्णयाप्रमाणे योग्य मूल्यमापन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला प्राधान्य दिले असल्याने प्राप्त परिस्थितीत या शासन निर्णयाचे स्वागत करून कार्यवाही करण्यातच सर्वांचे हीत आहे. पहिले जीवन नंतर शिक्षण व शेवटी मंदिर - 'जीवन शिक्षण मंदिर' हीच आपली खरी व पायाभूत शिक्षणव्यवस्था आहे. हे कोणीही विसरू नये. सर्वांकडून एवढीच अपेक्षा.

- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा