शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

माजी विद्यार्थीही सरसावले!

By admin | Updated: December 15, 2014 01:40 IST

कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ती जागा परत घेण्यासाठी आता या संस्थेतील माजी विद्यार्थीही सरसावले आहे

बारामती : कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेची ती जागा परत घेण्यासाठी आता या संस्थेतील माजी विद्यार्थीही सरसावले आहे. जागा विद्या प्रतिष्ठानकडे हस्तांतरीत करण्यासाठी अजित पवार यांना अध्यक्ष केले नव्हते. तर त्यांच्या माध्यमातून याच संस्थेचा विकास व्हावा, अशी भूमिका होती. असा सवाल त्यांनी केला असून जागा परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर सर्व प्रकार माहिती झाला. त्यानंतर गावातील नातेवाइकांशी संर्पक साधून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. मात्र कसल्याही परिस्थितीत संस्थेची जमीन जाऊ देणार नाही, असा निर्धार या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूलशिक्षण संस्था १९५२ मध्ये डॉ. अच्युतराव आगरकर यांनी सुरू केली. त्या वेळी बारामती तालुक्यात अवघ्या तीनच शाळा होत्या. देश स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच वर्षांत शाळा सुरू करून काऱ्हाटी, माळवाडी, बाबुर्डी, देऊळगाव रसाळ, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे आदी भागातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. परिणामी घरातील एक तरी व्यक्ती नोकरीस लागण्यास मदत झाली. त्यामुळे आज या भागातील मुले डॉक्टर, शिक्षक, पोलीस, पीएसआय, आयपीएस अशा अनेक मोठ्या हुद्द्यावर आहेत. या भागाबरोबर कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बदलली ती या कृषी मूलशिक्षण संस्थेमुळे. आज या शाळेची नाळ या परिसरातील घराघरांशी जोडली आहे. आज आम्ही ज्या मातीत लहानाचे मोठे झालो, त्या मातीला विकू देणार नाही. जमीन परत मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा ठराव केला आहे.