शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

पर्यावरणतज्ज्ञ घालणार पंतप्रधानांना साकडे

By admin | Updated: January 4, 2017 05:19 IST

पर्यावरणरक्षणाची जागृती करण्यासाठी सर्वांचीच जबाबदारी महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयातील मुलांना पर्यावरणरक्षणाचे महत्त्व कळावे, यासाठी स्वतंत्र विषय

बारामती : पर्यावरणरक्षणाची जागृती करण्यासाठी सर्वांचीच जबाबदारी महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयातील मुलांना पर्यावरणरक्षणाचे महत्त्व कळावे, यासाठी स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात नेमला. मात्र, या विषयाचे गांभीर्य शैक्षणिक संस्थांना नसल्याचे चित्र पुढे येत आहे. हा विषय केवळ कागदोपत्री आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी अस्तित्वात असल्याचे आहे. या विषयाचे तीन तेरा वाजण्याबरोबरच सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे पुढे आले आहे. आता याबाबत पर्यावरणतज्ज्ञ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार आहेत. पर्यावरण विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करावा, यासाठी १९९१ साली सर्वोच्य न्यायालयाने आदेश दिले. मात्र, आजही अनेक शाळा, महाविद्यालयांत या विषयाचे गांभीर्य नाही, असे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले. काही शाळांमध्ये माध्यमिक स्तरावरच हा विषय अभ्यासक्रमात काढून टाकला. तर महाविद्यालय स्तरावर हा विषय कोणत्याही विषयाचा शिक्षक शिकवत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री पर्यावरणरक्षणाची काळजी न घेता, या विषयाचे तीन तेरा वाजवण्याचे काम थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)पर्यावरणतज्ज्ञांची गरज :डॉ. गायकवाडसध्या हा विषय म्हणजे इंटरनेटवर माहिती गोळा करणे, त्याद्वारे प्रकल्प बनविणे, देश-विदेशातील पर्यावरणाची माहिती गोळा करून फक्त परीक्षेपुरता हा विषय हाताळला जात आहे. याबाबत न्यायालयाने देखील गांभीर्याने घेतले असल्याची माहिती काही पर्यावरणतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. न्यायालयाने विद्यापीठांना नोटिसा पाठवल्या आहेत. ज्या विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये पर्यावरण विषयाच्या शिक्षकाचीच नेमणूक केली नसेल, तेथे कारवाई करण्याची गरज आहे. तर विद्यापीठांनीदेखील या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यावरणतज्ज्ञांची नेमणूक करावी, अशी मागणी डॉ. गायकवाड यांनी केली. विनाअनुदानित विषयाने गोंधळ : डॉ. लाटेपर्यावरणाच्या समस्यांबाबत जाणिवा व जागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर २००४-०५ पासून शालेयस्तर ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्याशाखांसाठी ‘पर्यावरण शिक्षण’ हा विषय अनिवार्य केला. मात्र, या विषयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतल्यावर खूपच सावळा गोंधळ असल्याचे चित्र आहे. हा विषय ‘विनाअनुदान’ धोरणावर लागू केल्याने या विषयासाठी स्वतंत्र तज्ज्ञ शिक्षक नेमण्यात येत नाही. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून पर्यावरणरक्षणासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अमोल लाटे यांनी सांगितले.पर्यावरणतज्ज्ञ घालणार पंतप्रधानांना साकडे सध्या पर्यावरण शिकणे सोडून अमेरिकेत काय प्रदूषण होतंय, याविषयी जास्त चर्चा होत आहे. देशात, राज्यातील पर्यावरणाच्या बाबत मुलांच्या मनात आपुलकी निर्माण करण्याची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ‘घरात कचरा आणि गावाला वळसा’ अशी स्थिती सध्या आहे. याबाबत आता पर्यावरणतज्ज्ञ २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पर्यावरण विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालयांत पर्यावरणतज्ज्ञ शिक्षकांची नियुक्त करावी, तसे आदेश काढावेत, असे साकडे घालणार आहेत. पर्यावरण पदवीधरांचा विचार नाही : मराळे दररोजच्या धावपळीत पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोलचा वापर वाढला आहे. चहा पिण्यासाठीदेखील प्लास्टिकच्या कपांचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांचा पर्यावरणीय बुद्धांक सुधारला पाहिजे; अन्यथा आपण वसुंधरेला वाचवू शकणार नाही. लहानपणीच निसर्ग वाचायला शिकवण्याची गरज आहे. या संदर्भात पर्यावरणतज्ज्ञ संजय मराळे यांनी सांगितले की, विद्यापीठस्तरावर जवळपास १ लाख पर्यावरण विषयातील पदवीधर झाले आहेत. त्यांना हा विषय शिकवण्यासाठी एकाही महाविद्यालयाने नियुक्त केले नाही. तर मग त्यांनी या विषयात घेतलेल्या पदवीचे करायचे काय, या विषयाला गांभीर्याने हाताळावे, अथवा हा विषयच बंद करून टाकावा. शेती आणि पर्यावरण आणि हे दोनच विषय महत्त्वाचे राहतील. मात्र, पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पर्यावरणतज्ज्ञांची नियुक्ती न केल्यास विद्यापीठांवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.