शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
2
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
3
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
4
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
5
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
6
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
7
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
8
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
9
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
10
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
11
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
12
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
13
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
14
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
15
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
16
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
17
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
18
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
19
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
20
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

भोर शहरातील अतिक्रमण मोहीम थंडावली, वाहतूककोंडी पुन्हा जैसे थे, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

नागरिकांच्या मागणीचा विचार करून उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी नगरपालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत स्वता पुढाकार घेऊन ...

नागरिकांच्या मागणीचा विचार करून उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी नगरपालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत स्वता पुढाकार घेऊन २१ जानेवारीला अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. सदर मोहीम तहसीलदार अजित पाटील नगरपलिकेचे मुख्यधिकारी विजयकुमार थोरात, नगरपालिका व पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी व सहभागी होऊन सलग सहा दिवस कारवाई करून रस्त्यावरील विविध प्रकारचे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर नगरपलिकेकडून शहरातील हद्द निश्चित करुन रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणांना नोटिसा देऊन स्वत:हून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मंगळवार पेठेतील अनेकांनी आपली अतिक्रमणे काढून घेतली होती. त्यामुळे काही काळ भोर शहरातील वाहतूक सुरळीत झाली होती.

दरम्यान, मागील एक दीड महिन्यापासून अतिक्रमण मोहीम थंडावल्याने शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टपऱ्या शेडची अतिक्रमणे सुरु झाली आहेत. वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोडी जैसे थे झाली असून शहरासह बाहेरून येणाऱ्या नागरिकांना वाहतूककोंडीच्या ञासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे भोर नगरपलिका व भोर पोलीस यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरात वाढत असलेली अतिक्रमणे रस्त्यावर लावलेल्या गाड्या काढून थंडावलेली अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरु करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यामुळे धुरांच्या वासात गुदमरलेले शहरातील लोक मोकळा श्वास घेऊ शकतील.

वेताळ पेठ येथील व्यावसायिक तर दुरुस्तीला आलेल्या गाड्या भर रस्त्यावर लावून दुरुस्ती केली जात आहे. याबाबत भोर नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून नगरपलिका प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.

महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादात रामबाग रस्त्यावरील अतिक्रमणे वाढली

भोर शहरातील चकलांबा ते महाड नाका दरम्यानचा रस्ता वर्ग प्राधिकरणातकडे हस्तांतर झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुकान हॉटेल्स इतर अतिक्रमणे वाढत चालली आहेत. यामुळे वाहतूककोंडी होत आहे. विशेषतः चौपाटी परिसरातील सतत वाहतूककोंडी होते. अतिक्रमणांवर कारवाई कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वादात येथील कारवाई रखडली आहे. यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

रस्त्यावर वाहने यामुळे वाहतूककोंडी फोटो