शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अतिक्रमण करून बुजवला ओढा

By admin | Updated: May 24, 2016 05:49 IST

लामजेवाडी-शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आंबरहोळ परिसरातील गट क्र. ७० लगतच्या ओढ्यावर परिसरातील शेतकऱ्याने अतिक्रमण करून ओढाच बुजवला आहे.

बारामती : लामजेवाडी-शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आंबरहोळ परिसरातील गट क्र. ७० लगतच्या ओढ्यावर परिसरातील शेतकऱ्याने अतिक्रमण करून ओढाच बुजवला आहे. याबाबत इंदापूरच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. एकीकडे शासन ओढा खोलीकरणाची आणि विस्तारीकरणाची कामे हाती घेत आहे. जलयुक्त शिवार हा राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पदेखील यावरच आधारित आहे. परंतु लामजेवाडी येथील धनदांडग्या शेतकऱ्याने थेट ओढाच बुजवल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत येथील रहिवासी बळवंत बयाजी सूर्यवंशी यांनी प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे तक्रार दिली आहे. सूर्यवंशी यांच्या शेतालगतच हा ओढा आहे. या ओढ्याला पावसाळ्यात मुबलक पाणी असते. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळीही चांगली राहते. मात्र, येथील एका शेतकऱ्याने सूर्यवंशी बाहेरगावी गेले असता हा ओढा माती व दगड टाकून बुजवला आहे. सुमारे ४२५ फूट लांबीचा ओढा या शेतकऱ्याने बुजवला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या सूर्यवंशी यांनाच दमदाटी करण्यात आली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओढ्याला पाणी आल्यास परिसरातील शेतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, ओढ्याचा नैसर्गिक प्रवाहच रोखल्याने शेती वाहून जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन या शेतकऱ्यावर तातडीने कारवाई करून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह खुला करण्याची मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)