शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अतिक्रमण करून बुजवला ओढा

By admin | Updated: May 24, 2016 05:49 IST

लामजेवाडी-शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आंबरहोळ परिसरातील गट क्र. ७० लगतच्या ओढ्यावर परिसरातील शेतकऱ्याने अतिक्रमण करून ओढाच बुजवला आहे.

बारामती : लामजेवाडी-शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील आंबरहोळ परिसरातील गट क्र. ७० लगतच्या ओढ्यावर परिसरातील शेतकऱ्याने अतिक्रमण करून ओढाच बुजवला आहे. याबाबत इंदापूरच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. एकीकडे शासन ओढा खोलीकरणाची आणि विस्तारीकरणाची कामे हाती घेत आहे. जलयुक्त शिवार हा राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पदेखील यावरच आधारित आहे. परंतु लामजेवाडी येथील धनदांडग्या शेतकऱ्याने थेट ओढाच बुजवल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत येथील रहिवासी बळवंत बयाजी सूर्यवंशी यांनी प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्याकडे तक्रार दिली आहे. सूर्यवंशी यांच्या शेतालगतच हा ओढा आहे. या ओढ्याला पावसाळ्यात मुबलक पाणी असते. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळीही चांगली राहते. मात्र, येथील एका शेतकऱ्याने सूर्यवंशी बाहेरगावी गेले असता हा ओढा माती व दगड टाकून बुजवला आहे. सुमारे ४२५ फूट लांबीचा ओढा या शेतकऱ्याने बुजवला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या सूर्यवंशी यांनाच दमदाटी करण्यात आली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओढ्याला पाणी आल्यास परिसरातील शेतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, ओढ्याचा नैसर्गिक प्रवाहच रोखल्याने शेती वाहून जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन या शेतकऱ्यावर तातडीने कारवाई करून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह खुला करण्याची मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)