शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम अन‌् सायकलींना हवे प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत असून, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीमुळेच अधिक ...

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत असून, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीमुळेच अधिक प्रदूषण होत असल्याचा अहवाल नुकताच आला आहे. त्यात ९१ टक्के प्रदूषणात वाढ ही याचमुळे झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी यावर लक्ष देऊन वाहतुकीचे नियोजन करावे अशी मागणी ‘परिसर’ संस्थेकडून केली आहे. सायकलींना प्रोत्साहन आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करावेत, हे उपायही सांगितले आहेत.

नुकताच ‘आयआयटीएम’च्या सफर संस्थेकडून शहरातील प्रदूषणाबाबतचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये वाहतुकीचा वाटा मोठा आहे. वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणात भर पडत आहे. ही वाहतूक कमी कशी करायची, यावर विचार न करता महापालिका मात्र रस्त्यांची रुंदी वाढवणे, उड्डाणपूल तयार करण्यावर भर देत आहे. ते न करता इतर उपाय करावेत, अशा मागणीचे निवेदन परिसरने महापालिका आयुक्तांना दिले आहे. सध्या रस्ता रुंद करणे, पूल तयार करणे हे उपाय कायमस्वरूपीचे नाहीत. उलट त्यामुळे वाहनांच्या संख्येत भर पडून अधिक वाहतूककोंडी आणि प्रदूषणातही भर पडेल, असे परिसरचे विश्वस्त सुजीत पटवर्धन यांनी सांगितले.

——————————-

सायकल मार्ग चांगले करावेत

शहरातील सायकलचालकांसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पादचाऱ्यांसाठी सर्व सोयी करायला हव्यात. तरच नागरिक त्याचा अधिक वापर करतील. कोरोनामुळे सायकलकडे अनेकजण वळले आहेत. त्याचा आधार घेऊन शहरात सायकलींचे मार्ग अधिक चांगले करायला हवेत. नागरिकांनी स्वत:च्या घरापासून जवळ जायचे असेल, तर त्यांनी सायकलचा वापर करायला हवा, अशी स्थिती निर्माण करणे आवश्यक आहे.

-------------------

एक लाख लोकसंख्येमागे ५० बस हव्या

सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे देखील गरजेचे आहे. सध्या कोरोनामुळे नागरिक स्वत:चे वाहन घेऊन जाण्यावर भर देत आहेत. त्यामुळे सर्व सुरळीत झाल्यावर कोंडीचा प्रश्न आणि प्रदूषण वाढणार आहे. म्हणून बसच्या संख्या वाढवायला हव्यात. एक लाख लोकसंख्येमागे ४० ते ५० बस असायला पाहिजेत. सार्वजनिक बसचे मार्ग चांगले करायला हवेत. तरच त्याचा वापर नागरिक अधिक करतील.

------------

पार्किंग योजना लागू करावी

पे अँड पार्क योजनाही राबविणे आवश्यक आहे. तरच नागरिक रस्त्यावर अधिक वाहने घेऊन येणार नाहीत. त्याबाबत २०१७ मध्ये पार्किंग पॉलिसी मंजूर केलेली आहे. ती लगेच लागू केली पाहिजे.

-------------