शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

लसीकरणावर भर द्या,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST

बारामती : कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचा मुकाबला ...

बारामती : कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरणावर भर दिला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडी निरीक्षक डॉ. अर्चना पाटील व्यक्त केले आहे.

पत्रकारांशी बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या, वारंवार लॉकडाऊन होत असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे, शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे रोजगार यामधे गेलेले आहे, अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामधे अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. याचापण विचार सरकारने केला पाहिजे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. तरच कोरोनावर आपण लवकर मात करू शकतो. अनेक देशांनी लसीकरण मोठ्या प्रमाणात केल्यामुळे कोरोनाला हद्दपार केले आहे, पण देशात लसीकरणावरून चालू असलेले राजकारण चुकीचे आहे. आज महाराष्ट्रामध्ये लसीकरणाची खूप विदारक परिस्थिती आहे. हजारो लोकांनी लसीकरणासाठी केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी लस मिळत नाही, खूप मोठी गर्दी होत आहे. आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींना येथील लोकांनी लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी आग्रह धरावा. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, हॉस्पिटल्स यांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात यावी, त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी होईल. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असे डॉ. पाटील म्हणाल्या.