शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

आप्तस्वकियांकडूनच महिलांना धोका

By admin | Updated: June 27, 2017 08:04 IST

‘‘रस्त्यांवरच्या बोचऱ्या नजरांचा सामना आम्ही करू शकतो; परंतु घरातील वासनांध नजरांचा सामना आम्ही कसा करायचा,’’ असा प्रश्न जेव्हा एक अल्पवयीन मुलगी

लक्ष्मण मोरे। लोकमत न्यूज नेटवर्क‘‘रस्त्यांवरच्या बोचऱ्या नजरांचा सामना आम्ही करू शकतो; परंतु घरातील वासनांध नजरांचा सामना आम्ही कसा करायचा,’’ असा प्रश्न जेव्हा एक अल्पवयीन मुलगी महिला पोलिसांना करते तेव्हा निरुत्तर होण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. महिला आणि मुली घरांमध्येही सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पोलीस दप्तरी वर्षाकाठी दाखल होणाऱ्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक आरोपी हे नातेवाईक, वडील व शेजारीच असल्याचे चित्र आहे. वासनेच्या आवेगात नात्यांचा होत चाललेला खून ही एक नवी सामाजिक समस्या पुढे येत आहे.शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्यामध्ये सामाजिक चळवळी रुजल्या आणि वाढल्या. विशेषत: महिला सक्षमीकरणाच्या चळवळी कायमच आघाडीवर राहिल्या. पुरोगामित्वाचा चेहरा असलेल्या या शहराच्या पोटात मात्र काही भीषण वास्तव लपलेलं पाहायला मिळतं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वर्षाकाठी साधारणपणे बलात्काराचे ३०० च्याआसपास गुन्हे दाखल होतात; तर विनयभंगाचे ६०० च्या पुढे गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये या घटना वाढणे चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी तीन वर्षांत अटक केलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमधील अटक आरोपींमध्ये नातेवाईक, ओळखीचे आणि शेजारी यांचे प्रमाण अधिक असल्याचेही वास्तव समोर आले आहे. वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना वाढत आहेत. ज्यांच्यावर विश्वास असतो तीच व्यक्ती अशी घृणास्पद कृत्ये करते त्या वेळी त्यांच्यासमोर कोणासमोर जाऊन ‘व्यक्त’ व्हायचे, हा मोठा प्रश्न असतो. पोलिसांकडे झालेल्या तक्रारींमुळे किमान काही घटना उजेडात येतात. मात्र दहशतीमुळे, समाजातील इभ्रतीच्या भीतीमुळे अशा कित्येक अत्याचारांना वाचाच फुटत नाही, हे गंभीर आहे. विशेषत: महिलाच या अत्याचारांमध्ये आणि त्या घटना दाबण्यामध्ये सहभागी असतात तेव्हा पोलिसांसमोरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. व्यसनाधीनता, ओळखीचा गैरफायदा, भावना उद्दीपित होणे यासोबतच सहजतेने उपलब्ध होत असलेल्या ‘पॉर्न मटेरियल’मुळेही हे प्रकार वाढत चालले आहेत. कौटुंबिक संस्कारांचा कमी होत चाललेला प्रभाव, नात्यांचे पावित्र्य जपण्यापेक्षा उपभोगवादी होत चाललेली वृत्ती या घटनांना कारणीभूत ठरत आहेत.अनेकदा बलात्कार आणि लैंगिक छळवणुकीच्या बळी ठरलेल्या महिला आणि मुलींना दादही मागता येत नाही. कुटुंबातील अन्य सदस्य दोषी नातेवाइकाला शिक्षा देण्याऐवजी पीडितेलाच शांत राहण्यासाठी दबाव टाकतात. कुटुंबाची इभ्रत आणि खोट्या प्रतिष्ठेपायी अनेक जणी दहशतीमुळे तक्रार द्यायला पुढेही येत नाहीत. बदलत्या काळात महिला स्वयंपूर्ण होत आहेत; परंतु त्यांच्यावरच्या अत्याचारांच्या संख्येत मात्र घट होताना दिसत नाही. प्रत्येक घरातील पुरुषी मानसिकता आणि स्त्री ही भोगाची वस्तू आहे, ही विचारसरणी बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मुलाने स्वत:च्याच आईवर बलात्कार करून खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी वाकडमध्ये घडली होती, तर स्वत:च्या पोटच्या १६ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार करून तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार करणाऱ्या वडिलांसह शेजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नोकरीत बढतीसाठी स्वत:च्या मुलीला बॉससोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या वडील आणि आजी-आजोबांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तर कोंढव्यातही एका वडिलांनी स्वत:च्याच तीन मुलींवर अनेक वर्षे बलात्कार केल्याचा प्रकारही समोर आला होता.ज्यांच्यासोबत अशा घटना घडलेल्या आहेत, त्या महिलांना समाजामध्ये उजळ माथ्याने फिरणे अवघड होऊन बसले आहे. एकवेळ त्यांच्याकडे समाज सहानुभूतीने पाहतो; परंतु कुटुंबातील अन्य पुरुष तसेच नातेवाइकांचा मात्र बघण्याचा दृष्टिकोन बदलतो़ क्वचितच त्यांना मानसिक आधार दिला जातो़ त्यापेक्षा सहानुभूती दाखवत जवळीक साधून या पीडित महिलांचे अधिकाधिक शोषण करण्याचेच प्रकार होत आहेत. सार्वजनिक ठिकाणांवर होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आलेली आहेत. कामाच्या ठिकाणी होणारी छळवणूक रोखण्यासाठी ‘विशाखा’ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. निर्भयासारखी प्रकरणे घडल्यानंतर त्याचा गाजावाजा होतो. परंतु घरामध्ये पालक, नातेवाइक आणि ओळखीच्यांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणे पीडितेसाठी तेवढेसे सोपे नसते.नात्यांची वीण उसवतेय नात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी वासनेच्या आवेगात उसवत चालली आहे. बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्येही पालक आणि नातेवाइकांकडून सर्वाधिक लैंगिक अत्याचार केले जात असल्याची आकडेवारी आहे. पुरुषी वासनांधतेत कोवळ्या जिवांचाही विचार करू नये, ही समाजासाठी शरमेची बाब म्हणावीइतपत गंभीर आहे.मोबाईल फोनवर सहज उपलब्ध असलेले इंटरनेट आणि त्यावरील लाखो पोर्न साईट्स, रस्त्यावर सहज उपलब्ध होणाऱ्या पोर्न सीडी आणि अन्य साहित्यामुळे भावना उद्दीपित होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर तर अनेक अश्लील व्हिडीओ क्लिप सहज उपलब्ध होताहेत.1भावना उद्दीपित झाल्यानंतर त्या आवेगात कधी नकळत, तर कधी जाणिवपूर्वक अशा घटना घडत आहेत. नात्यांच्या पावित्र्याला काळिमा फासणाऱ्या या घटना आहेत. पोलिसांकडील दाखल गुन्ह्यांची आणि त्यातील आरोपींच्या वर्गवारीची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. भविष्यामध्ये या घटना वाढत राहिल्या तर सामाजिक स्वास्थ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.2बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या खटल्यांमध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता होते. अनेकदा तपासातील त्रुटी आणि परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध न झाल्याने दोषारोप सिद्ध होत नाहीत. कायद्याच्या पळवाटांमुळेही पीडितेला न्याय मिळत नाही.