शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

आप्तस्वकियांकडूनच महिलांना धोका

By admin | Updated: June 27, 2017 08:04 IST

‘‘रस्त्यांवरच्या बोचऱ्या नजरांचा सामना आम्ही करू शकतो; परंतु घरातील वासनांध नजरांचा सामना आम्ही कसा करायचा,’’ असा प्रश्न जेव्हा एक अल्पवयीन मुलगी

लक्ष्मण मोरे। लोकमत न्यूज नेटवर्क‘‘रस्त्यांवरच्या बोचऱ्या नजरांचा सामना आम्ही करू शकतो; परंतु घरातील वासनांध नजरांचा सामना आम्ही कसा करायचा,’’ असा प्रश्न जेव्हा एक अल्पवयीन मुलगी महिला पोलिसांना करते तेव्हा निरुत्तर होण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. महिला आणि मुली घरांमध्येही सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पोलीस दप्तरी वर्षाकाठी दाखल होणाऱ्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक आरोपी हे नातेवाईक, वडील व शेजारीच असल्याचे चित्र आहे. वासनेच्या आवेगात नात्यांचा होत चाललेला खून ही एक नवी सामाजिक समस्या पुढे येत आहे.शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्यामध्ये सामाजिक चळवळी रुजल्या आणि वाढल्या. विशेषत: महिला सक्षमीकरणाच्या चळवळी कायमच आघाडीवर राहिल्या. पुरोगामित्वाचा चेहरा असलेल्या या शहराच्या पोटात मात्र काही भीषण वास्तव लपलेलं पाहायला मिळतं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वर्षाकाठी साधारणपणे बलात्काराचे ३०० च्याआसपास गुन्हे दाखल होतात; तर विनयभंगाचे ६०० च्या पुढे गुन्हे दाखल होतात. या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये या घटना वाढणे चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी तीन वर्षांत अटक केलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमधील अटक आरोपींमध्ये नातेवाईक, ओळखीचे आणि शेजारी यांचे प्रमाण अधिक असल्याचेही वास्तव समोर आले आहे. वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना वाढत आहेत. ज्यांच्यावर विश्वास असतो तीच व्यक्ती अशी घृणास्पद कृत्ये करते त्या वेळी त्यांच्यासमोर कोणासमोर जाऊन ‘व्यक्त’ व्हायचे, हा मोठा प्रश्न असतो. पोलिसांकडे झालेल्या तक्रारींमुळे किमान काही घटना उजेडात येतात. मात्र दहशतीमुळे, समाजातील इभ्रतीच्या भीतीमुळे अशा कित्येक अत्याचारांना वाचाच फुटत नाही, हे गंभीर आहे. विशेषत: महिलाच या अत्याचारांमध्ये आणि त्या घटना दाबण्यामध्ये सहभागी असतात तेव्हा पोलिसांसमोरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. व्यसनाधीनता, ओळखीचा गैरफायदा, भावना उद्दीपित होणे यासोबतच सहजतेने उपलब्ध होत असलेल्या ‘पॉर्न मटेरियल’मुळेही हे प्रकार वाढत चालले आहेत. कौटुंबिक संस्कारांचा कमी होत चाललेला प्रभाव, नात्यांचे पावित्र्य जपण्यापेक्षा उपभोगवादी होत चाललेली वृत्ती या घटनांना कारणीभूत ठरत आहेत.अनेकदा बलात्कार आणि लैंगिक छळवणुकीच्या बळी ठरलेल्या महिला आणि मुलींना दादही मागता येत नाही. कुटुंबातील अन्य सदस्य दोषी नातेवाइकाला शिक्षा देण्याऐवजी पीडितेलाच शांत राहण्यासाठी दबाव टाकतात. कुटुंबाची इभ्रत आणि खोट्या प्रतिष्ठेपायी अनेक जणी दहशतीमुळे तक्रार द्यायला पुढेही येत नाहीत. बदलत्या काळात महिला स्वयंपूर्ण होत आहेत; परंतु त्यांच्यावरच्या अत्याचारांच्या संख्येत मात्र घट होताना दिसत नाही. प्रत्येक घरातील पुरुषी मानसिकता आणि स्त्री ही भोगाची वस्तू आहे, ही विचारसरणी बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मुलाने स्वत:च्याच आईवर बलात्कार करून खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी वाकडमध्ये घडली होती, तर स्वत:च्या पोटच्या १६ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार करून तिच्या चेहऱ्यावर चाकूने वार करणाऱ्या वडिलांसह शेजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नोकरीत बढतीसाठी स्वत:च्या मुलीला बॉससोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या वडील आणि आजी-आजोबांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तर कोंढव्यातही एका वडिलांनी स्वत:च्याच तीन मुलींवर अनेक वर्षे बलात्कार केल्याचा प्रकारही समोर आला होता.ज्यांच्यासोबत अशा घटना घडलेल्या आहेत, त्या महिलांना समाजामध्ये उजळ माथ्याने फिरणे अवघड होऊन बसले आहे. एकवेळ त्यांच्याकडे समाज सहानुभूतीने पाहतो; परंतु कुटुंबातील अन्य पुरुष तसेच नातेवाइकांचा मात्र बघण्याचा दृष्टिकोन बदलतो़ क्वचितच त्यांना मानसिक आधार दिला जातो़ त्यापेक्षा सहानुभूती दाखवत जवळीक साधून या पीडित महिलांचे अधिकाधिक शोषण करण्याचेच प्रकार होत आहेत. सार्वजनिक ठिकाणांवर होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आलेली आहेत. कामाच्या ठिकाणी होणारी छळवणूक रोखण्यासाठी ‘विशाखा’ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. निर्भयासारखी प्रकरणे घडल्यानंतर त्याचा गाजावाजा होतो. परंतु घरामध्ये पालक, नातेवाइक आणि ओळखीच्यांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडणे पीडितेसाठी तेवढेसे सोपे नसते.नात्यांची वीण उसवतेय नात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी वासनेच्या आवेगात उसवत चालली आहे. बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्येही पालक आणि नातेवाइकांकडून सर्वाधिक लैंगिक अत्याचार केले जात असल्याची आकडेवारी आहे. पुरुषी वासनांधतेत कोवळ्या जिवांचाही विचार करू नये, ही समाजासाठी शरमेची बाब म्हणावीइतपत गंभीर आहे.मोबाईल फोनवर सहज उपलब्ध असलेले इंटरनेट आणि त्यावरील लाखो पोर्न साईट्स, रस्त्यावर सहज उपलब्ध होणाऱ्या पोर्न सीडी आणि अन्य साहित्यामुळे भावना उद्दीपित होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर तर अनेक अश्लील व्हिडीओ क्लिप सहज उपलब्ध होताहेत.1भावना उद्दीपित झाल्यानंतर त्या आवेगात कधी नकळत, तर कधी जाणिवपूर्वक अशा घटना घडत आहेत. नात्यांच्या पावित्र्याला काळिमा फासणाऱ्या या घटना आहेत. पोलिसांकडील दाखल गुन्ह्यांची आणि त्यातील आरोपींच्या वर्गवारीची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. भविष्यामध्ये या घटना वाढत राहिल्या तर सामाजिक स्वास्थ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.2बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या खटल्यांमध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता होते. अनेकदा तपासातील त्रुटी आणि परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध न झाल्याने दोषारोप सिद्ध होत नाहीत. कायद्याच्या पळवाटांमुळेही पीडितेला न्याय मिळत नाही.