शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

शेतीपंपांची वीज केली बंद

By admin | Updated: April 28, 2017 05:50 IST

नवीन मुठा उजव्या कालव्यामधून भर उन्हाळ्यात पाण्याचे चौथे आवर्तन सुरू करण्यात आल्यानंतर, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना

यवत : नवीन मुठा उजव्या कालव्यामधून भर उन्हाळ्यात पाण्याचे चौथे आवर्तन सुरू करण्यात आल्यानंतर, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी निर्बंध घालण्यात आल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.पंपांचे वीज कनेक्शन काढण्यात आल्याने शेतकरी हतबल झाला असून, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यानंतर, दौंड तालुक्यात पाणी दिले जाणार आहे; मात्र दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पंपांचे वीज कनेक्शन तोडताना हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंप मात्र सुरू आहेत. हा दुजाभाव केला जात असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. भर उन्हाळ्यात पिके जळून चालली असल्याने शेतकरीवर्ग पाटबंधारे विभागाच्या कारभारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.आणखी १५ दिवस शेतीला पाणी न मिळाल्यास यावर्षीदेखील हाताची पिके जाण्याचा धोका आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकापासून पाणीपुरवठा करण्याचा नियम अनेक वर्ष जुना आहे. सदर नियमात तथ्य असले, तरी यावर काही उपाययोजना न केल्यास मागील वर्षी दुष्काळाने पिके नव्हती, यंदा परत पिके जळाल्यास शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.जुन्या कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. नवीन कालव्यातील आवर्तनांचे नियोजन झाले असेल, तरी तालुक्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)