शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

फेब्रुवारी २०२१ नंतर कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे राज्यातल्या सर्वच निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ...

फेब्रुवारी २०२१ नंतर कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे राज्यातल्या सर्वच निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका ३१ ऑगस्टनंतर होणार की पुन्हा लांबणीवर पडणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

निवडणुकांना राज्य शासनाने ३१ ऑगस्ट ही मुदतवाढ दिलेली होती. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार का पुन्हा पुढे ढकलाव्या लागणार हे १० सप्टेंबरच्या आत स्पष्ट करावे लागणार आहे.

राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्याची सुरू झालेली प्रक्रिया अचानक थांबवावी लागली होती. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ज्या ठिकाणी निवडणुकांची प्रक्रिया थांबली आहे, तेथून पुढे सुरू होईल असे स्पष्ट केलेले आहे.