शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

पोखरी योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST

तळेघर: पोखरी प्रादेशिक योजना कालबाह्य झाली आहे. ती पुनरुज्जीवित करण्यासाठी लागणारा शासकीय पाच टक्के निधी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या ...

तळेघर: पोखरी प्रादेशिक योजना कालबाह्य झाली आहे. ती पुनरुज्जीवित करण्यासाठी लागणारा शासकीय पाच टक्के निधी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या माध्यमातून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व अन्य ठिकाणांवरून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी समाज कल्याण सभापती व आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे यांनी सांगितले.

पश्चिम आदिवासी भागातील सात गावांसाठी असणारी पोखरी प्रादेशिक योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी तळेघर येथे बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. तत्पूर्वी मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी आणि जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप-अंभियंता व्ही. आर. पवार, ग्रामीण पाणीपुरवठा प्रादेशिक उपविभागचे उप-अभियंता सुनील पटेकर, पंचायत समितीचे पाणीपुरवठा उप-अभियंता कैलास टोपे, पंचायत समिती माजी उपसभापती सुभाष तळपे, सलिम तांबोळी, माजी कृषी बाजार समिती संचालक मारुती केंगले, जांभोरी सरपंच संजय केंगले, तळेघर सरपंच चंद्रकांत उगले, सरुबाई पोटकुले, सरपंच अनिता आढारी, बाबूराव माळी, उपसंरपच ठकसेन लोहकरे उपस्थित होते.

मोरमारे म्हणाले, पोखरी प्रादेशिक योजनेत मापोली, गोहे खु, गोहे बु, राजेवाडी, चिखली, पोखरी, जांभोरी गावे व वाडीवस्त्यांचा समावेश आहे. सध्याची परिस्थिती पाहता लोकसंख्याही वाढली आहे. तर योजना कालबाह्य झाली आहे. यातच पोखरी, चिखली, मापोली, गोहे गावात प्रादेशिक योजनेची पाण्याची टाक्या नाहीत. काही ठिकाणी अनधिकृत नळजोडणी झाल्याने पाणी योजनेलाच ग्रहण लागले आहे. शेवटच्या टोकावरील जांभोरीलाही कमी पाणी मिळते. अनधिकृत नळजोडणीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पोखरी योजनेत सात गावांबरोबरच आता गोहे गावच्या वाड्या-वस्त्या, तळेघर, जांभोरीच्या उर्वरित वाड्या-वस्त्या यांचे समायोजन करण्याचे नियोजन असल्याचे माेरमारे यांनी सांगितले.