शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोखरी योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST

तळेघर: पोखरी प्रादेशिक योजना कालबाह्य झाली आहे. ती पुनरुज्जीवित करण्यासाठी लागणारा शासकीय पाच टक्के निधी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या ...

तळेघर: पोखरी प्रादेशिक योजना कालबाह्य झाली आहे. ती पुनरुज्जीवित करण्यासाठी लागणारा शासकीय पाच टक्के निधी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या माध्यमातून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व अन्य ठिकाणांवरून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी समाज कल्याण सभापती व आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे यांनी सांगितले.

पश्चिम आदिवासी भागातील सात गावांसाठी असणारी पोखरी प्रादेशिक योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी तळेघर येथे बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. तत्पूर्वी मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी आणि जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप-अंभियंता व्ही. आर. पवार, ग्रामीण पाणीपुरवठा प्रादेशिक उपविभागचे उप-अभियंता सुनील पटेकर, पंचायत समितीचे पाणीपुरवठा उप-अभियंता कैलास टोपे, पंचायत समिती माजी उपसभापती सुभाष तळपे, सलिम तांबोळी, माजी कृषी बाजार समिती संचालक मारुती केंगले, जांभोरी सरपंच संजय केंगले, तळेघर सरपंच चंद्रकांत उगले, सरुबाई पोटकुले, सरपंच अनिता आढारी, बाबूराव माळी, उपसंरपच ठकसेन लोहकरे उपस्थित होते.

मोरमारे म्हणाले, पोखरी प्रादेशिक योजनेत मापोली, गोहे खु, गोहे बु, राजेवाडी, चिखली, पोखरी, जांभोरी गावे व वाडीवस्त्यांचा समावेश आहे. सध्याची परिस्थिती पाहता लोकसंख्याही वाढली आहे. तर योजना कालबाह्य झाली आहे. यातच पोखरी, चिखली, मापोली, गोहे गावात प्रादेशिक योजनेची पाण्याची टाक्या नाहीत. काही ठिकाणी अनधिकृत नळजोडणी झाल्याने पाणी योजनेलाच ग्रहण लागले आहे. शेवटच्या टोकावरील जांभोरीलाही कमी पाणी मिळते. अनधिकृत नळजोडणीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पोखरी योजनेत सात गावांबरोबरच आता गोहे गावच्या वाड्या-वस्त्या, तळेघर, जांभोरीच्या उर्वरित वाड्या-वस्त्या यांचे समायोजन करण्याचे नियोजन असल्याचे माेरमारे यांनी सांगितले.