शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पोखरी योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:11 IST

तळेघर: पोखरी प्रादेशिक योजना कालबाह्य झाली आहे. ती पुनरुज्जीवित करण्यासाठी लागणारा शासकीय पाच टक्के निधी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या ...

तळेघर: पोखरी प्रादेशिक योजना कालबाह्य झाली आहे. ती पुनरुज्जीवित करण्यासाठी लागणारा शासकीय पाच टक्के निधी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या माध्यमातून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व अन्य ठिकाणांवरून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी समाज कल्याण सभापती व आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे यांनी सांगितले.

पश्चिम आदिवासी भागातील सात गावांसाठी असणारी पोखरी प्रादेशिक योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी तळेघर येथे बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. तत्पूर्वी मोरमारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी आणि जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप-अंभियंता व्ही. आर. पवार, ग्रामीण पाणीपुरवठा प्रादेशिक उपविभागचे उप-अभियंता सुनील पटेकर, पंचायत समितीचे पाणीपुरवठा उप-अभियंता कैलास टोपे, पंचायत समिती माजी उपसभापती सुभाष तळपे, सलिम तांबोळी, माजी कृषी बाजार समिती संचालक मारुती केंगले, जांभोरी सरपंच संजय केंगले, तळेघर सरपंच चंद्रकांत उगले, सरुबाई पोटकुले, सरपंच अनिता आढारी, बाबूराव माळी, उपसंरपच ठकसेन लोहकरे उपस्थित होते.

मोरमारे म्हणाले, पोखरी प्रादेशिक योजनेत मापोली, गोहे खु, गोहे बु, राजेवाडी, चिखली, पोखरी, जांभोरी गावे व वाडीवस्त्यांचा समावेश आहे. सध्याची परिस्थिती पाहता लोकसंख्याही वाढली आहे. तर योजना कालबाह्य झाली आहे. यातच पोखरी, चिखली, मापोली, गोहे गावात प्रादेशिक योजनेची पाण्याची टाक्या नाहीत. काही ठिकाणी अनधिकृत नळजोडणी झाल्याने पाणी योजनेलाच ग्रहण लागले आहे. शेवटच्या टोकावरील जांभोरीलाही कमी पाणी मिळते. अनधिकृत नळजोडणीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पोखरी योजनेत सात गावांबरोबरच आता गोहे गावच्या वाड्या-वस्त्या, तळेघर, जांभोरीच्या उर्वरित वाड्या-वस्त्या यांचे समायोजन करण्याचे नियोजन असल्याचे माेरमारे यांनी सांगितले.