शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST

दुसऱ्या बाजूला समाजानेही महिलांना आत्मसन्मान द्यायला हवा. हुंडाबळीसारख्या समस्या, स्त्रीभ्रूणहत्येसारखी समाजामध्ये वेगाने पसरत चाललेली विकृती, पुण्यातील स्टेशनवरील घटना किंवा ...

दुसऱ्या बाजूला समाजानेही महिलांना आत्मसन्मान द्यायला हवा. हुंडाबळीसारख्या समस्या, स्त्रीभ्रूणहत्येसारखी समाजामध्ये वेगाने पसरत चाललेली विकृती, पुण्यातील स्टेशनवरील घटना किंवा मुंबईतील साकीानाक्यासारख्या घटनांनी भय इथले संपले नाही, हे पुन्हा एकदा जाणवू लागले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत पुण्यातच घडलेल्या घटनांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर नव्याने विचार करण्याची गरज आहे. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ला फिट ठेवून स्वयंपूर्ण व्हावे. व्यायामासारखा विषय महिलांच्या अजेंड्यावरच नसतो. हे क्षेत्र केवळ पुरुषांचे आहे, असा समज आहे. त्यामध्ये बदल व्हायला हवा. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू, पी. सिंधू यांनी भारताला गौरवाचे स्थान मिळवून दिले. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत महिला उत्तुंग कामगिरी बजावत आहेत. त्यांना बळ देण्याची गरज आहे. त्यांच्या क्षमतांचा अधिक विकास करण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याचीही गरज आहे.

आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण झाल्याशिवाय महिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकणार नाहीत. आज समाजामध्ये आपण पाहतो की, कौटुंबिक हिंसाचारात होरपळलेल्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या परावलंबी असलेल्या महिलांची संख्या तुलनेने जास्त आहे. पीडित महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक ताकदीची गरज असते. नोकरी, व्यवसाय करीत असतील तर त्यांच्यामध्ये आर्थिक स्वयंपूर्णता येते. त्यासाठी समाजात पोषक वातावरण तयार व्हायला हवे. यासाठी केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहून चालणार नाही. विविध स्वयंसेवी संघटना, नागरी समूह यांनी त्यासाठीचे उपक्रम राबवायला हवेत.

- दीप्ती अऱ्हाना