शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

समर्थ ग्रुप आणि आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशनमध्ये शैक्षणिक करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST

बेल्हा: येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ पॉलिटेक्निक आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशन, केरळ ...

बेल्हा: येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ पॉलिटेक्निक आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशन, केरळ यांच्यामध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.

विशिष्ट क्षेत्रातील दीर्घकालीन संशोधन व विकास प्रकल्प सक्षमपणे राबविण्यासाठी या सामंजस्य करारांतर्गत ज्ञान व माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितले. दरम्यान, हा सामंजस्य करार विद्यार्थी व शिक्षक या दोघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून कौशल्यवाढीसाठी व रोजगारक्षम दृष्टिकोन विकसित करण्यासाठी फायदेशीर असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.

समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील व समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अनिल कपिले आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम, केरळचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीलाल यांनी सदर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून शिक्कामोर्तब केले. या करारांतर्गत समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे नोडल सेंटर असणार आहे व त्या अंतर्गत समर्थ पॉलिटेक्निक या विद्यालयाचा समावेश केला आहे.

सामंजस्य करारांतर्गत संकुलातील विद्यार्थ्यांना दोन्ही संस्थांकडून प्रकल्प करण्यासाठी व त्या-त्या विभागांमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी विविध प्रकारच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सेमीनार, अल्पमुदतीतील अभ्यासक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आणि परिषद आयोजित करण्यात येणार आहेत. नवीन उद्योग, व्यवसाय कार्यक्रम यासाठी निर्माण होणाऱ्या संधी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.

विषयानुरूप तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनदेखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी आयोजित केले जाईल. एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना या सामंजस्य करारांतर्गत असलेल्या सर्व सुख सुविधांचा वापर करता येणे शक्य होणार आहे.या सामंजस्य कराराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे. हा सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. महेश पोखरकर व प्रा. भूषण बोऱ्हाडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यासाठी प्रा. प्रदीप गाडेकर, प्रा. प्रवीण सातपुते, प्रा. अमोल खतोडे, प्रा. निर्मल कोठारी यांनी विशेष प्रयत्न केले.