शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ ग्रुप आणि आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशनमध्ये शैक्षणिक करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST

बेल्हा: येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ पॉलिटेक्निक आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशन, केरळ ...

बेल्हा: येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ पॉलिटेक्निक आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम फाऊंडेशन, केरळ यांच्यामध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.

विशिष्ट क्षेत्रातील दीर्घकालीन संशोधन व विकास प्रकल्प सक्षमपणे राबविण्यासाठी या सामंजस्य करारांतर्गत ज्ञान व माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितले. दरम्यान, हा सामंजस्य करार विद्यार्थी व शिक्षक या दोघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून कौशल्यवाढीसाठी व रोजगारक्षम दृष्टिकोन विकसित करण्यासाठी फायदेशीर असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.

समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील व समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अनिल कपिले आणि अटल इन्क्युबेशन सेंटर-आयआयआयटी कोट्यायम, केरळचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीलाल यांनी सदर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून शिक्कामोर्तब केले. या करारांतर्गत समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे नोडल सेंटर असणार आहे व त्या अंतर्गत समर्थ पॉलिटेक्निक या विद्यालयाचा समावेश केला आहे.

सामंजस्य करारांतर्गत संकुलातील विद्यार्थ्यांना दोन्ही संस्थांकडून प्रकल्प करण्यासाठी व त्या-त्या विभागांमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी विविध प्रकारच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सेमीनार, अल्पमुदतीतील अभ्यासक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आणि परिषद आयोजित करण्यात येणार आहेत. नवीन उद्योग, व्यवसाय कार्यक्रम यासाठी निर्माण होणाऱ्या संधी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.

विषयानुरूप तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनदेखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी आयोजित केले जाईल. एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना या सामंजस्य करारांतर्गत असलेल्या सर्व सुख सुविधांचा वापर करता येणे शक्य होणार आहे.या सामंजस्य कराराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे. हा सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. महेश पोखरकर व प्रा. भूषण बोऱ्हाडे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यासाठी प्रा. प्रदीप गाडेकर, प्रा. प्रवीण सातपुते, प्रा. अमोल खतोडे, प्रा. निर्मल कोठारी यांनी विशेष प्रयत्न केले.