शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

मान्यतेपेक्षा अधिक प्रवेश देणाऱ्यांना शिक्षा

By admin | Updated: September 28, 2016 04:49 IST

अध्यापक विद्यालयात (डीएड) ५० जागांना मान्यता असतानाही त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन पैसे उकळणाऱ्या संस्थाचालकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि

पुणे : अध्यापक विद्यालयात (डीएड) ५० जागांना मान्यता असतानाही त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन पैसे उकळणाऱ्या संस्थाचालकाला ३ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.रामदास कारभारी चव्हाण (रा. पिरेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या संस्थाचालकांचे नाव आहे. याबाबत ज्ञानेश्वर एकनाथ खराद (रा. मालेगाव बुद्रुक, ता. गेवराई, जि. बीड) याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी काम पाहिले. हा प्रकार २००३मध्ये घडला होता. बारावी पास झाल्यानंतर डीएड करण्याची खराद यांची इच्छा होती. त्यामुळे जाहिरात पाहून त्यांनी बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ अध्यापक विद्यालयाचे अध्यक्ष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. प्रवेशासाठी २ लाख ५ हजार रुपये भरले. त्यांपैकी केवळ १५ हजार रुपयांचीच पावती फिर्यादींना देण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील अध्यापक विद्यालयात फिर्यादींना प्रवेश देण्यात आला. त्यांनी वर्षभर शिक्षण घेतले; मात्र त्यांना वार्षिक परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्या वेळी अधिक चौकशी केली असता अध्यापक विद्यालयात केवळ ५० विद्यार्थ्यांना मान्यता आहे. फिर्यादी आणि इतर काही जणांना अनधिकृतपणे प्रवेश देऊन फसवणूक केली असल्याची माहिती उघड झाली. त्या वेळी फिर्यादींनी चव्हाण याच्याशी संपर्क साधला. त्या वेळी पुढच्या वर्षी परीक्षा घेऊ, असे त्याने फिर्यादीला सांगितले. या वेळी फिर्यादींनी फसवणूक का केली, याचा जाब चव्हाण याला विचारला. त्या वेळी चव्हाण याने फिर्यादीला त्याने भरलेल्या १ लाख ९० हजार रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश न वटता परत आला. याबाबतही फिर्यादीने येथील न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात फिर्यादी सुनावणीदरम्यान फितूर झाला. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात फसवणूक झालेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याची साक्ष ग्राह्य धरून चव्हाण याला शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)१० हजार रुपये विद्यार्थ्याला द्यावेतफिर्यादी फितूर झाला असतानाही अशा प्रकारे फसवणूक झालेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याची साक्ष ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. कुलकर्णी यांनी हा आदेश दिला आहे. ज्या विद्यार्थ्याची साक्ष ग्राह्य धरण्यात आली, त्याला दंडापैकी १० हजार रुपये देण्यात यावेत, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. घटना घडल्यापासून तब्बल १३ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला.