शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

गतिमान वाहतूक, २४ तास पाणी!

By admin | Updated: December 3, 2015 03:37 IST

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या स्मार्ट आराखड्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा

- स्मार्ट सिटीचा आराखडा सादरपुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या स्मार्ट आराखड्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा, मल्टीलेव्हल पार्किंग, वाहतूक नियंत्रण केंद्र याच्या मदतीने गतिमान वाहतूक, २४ तास पाणीपुरवठा यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मॉडेल एरिया म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या औंध, बाणेर भागासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे.स्मार्ट सिटीच्या आराखड्यामध्ये नागरिकांचा सहभाग असला पाहिजे, अशी अट केंद्र शासनाकडून घालण्यात आली होती. त्यानुसार वेगवेगळया टप्प्यांवर नागरिकांकडून सुचना, शिफारशी व त्यांचे मते आराखडा तयार करताना मागविण्यात आली होती. नागरिकांनी स्वच्छ व सुंदर पुण्याला पहिली पसंती दिली होती. तसेच वाहतूक समस्या प्राधान्याने सोडविली जाण्याची शिफारस केली होती. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये वाहतूक समस्या, पाणीपुरवठा याला प्राधान्य देण्यात आले आहे.शहराची वाहतूक व्यवस्था अधिक गतीशील व्हावी, यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. बस थांब्याची सुधारणा, बसची देखभाल, बसमधील आयटीएमएस यंत्रणा याकरिता १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी ९५ कोटी, मल्टीलेव्हल पार्किंग सुविधेसाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत वाहतूक व्यवस्थेवर ५८५ कोटी रुपयांपर्यंत खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.शहराला २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासठी ३५५ ते ३७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, एसटीपी केंद्रातून ऊर्जा निर्मितीसाठी १० कोटी व त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी ६५ कोटी अशी ४५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. त्यामुळे शहराला मीटर पद्धतीने २४ तास पाणीपुरवठा करता येऊ शकणार आहे.स्मार्ट सिटी आराखड्यामध्ये मॉडेल एरिया म्हणून डेव्हलप करण्यासाठी एक क्षेत्र निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने औंध, बाणेर भागाची त्यासाठी निवड केली आहे. त्यानुसार तिथे स्मार्ट सिटीच्या संकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नदीसुधारणा, सोलर एनर्जी, स्मार्ट मीटरिंग, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे सुसूत्रीकरण, वाहनतळ, देखभाल दुरूस्ती, पाण्याचा पुनर्वापर आदी प्रयोग तिथे राबविले जाणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा सविस्तर आराखडा लवकरच संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. असा होईल औंध-बाणेरचा मॉडेल विकास1) मॉडेल एरिया म्हणून निवडलेल्या औंध-बाणेर येथे स्मार्ट सिटीच्या संकल्पनांचे प्रयोग केले जाणार आहेत. तेथील यशस्वीतेनंतर ते संपूर्ण शहरात राबविले जाणार आहेत. औंधमधून जाणाऱ्या नदीकाठी उद्यानाची उभारणी केली जाणार आहे, त्यासाठी १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2) सोलर एनर्जी प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी २८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाण्याच्या पुनर्वापरासाठी ९० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टी सुधारणा, वाहनतळ, ई-गव्हर्नन्स अ‍ॅक्टिव्हिटी तिथे राबविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर तिथील रस्त्यांचे सुसूत्रीकरण करून पदपथांची संख्या वाढविली जाणार आहे.