शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

गतिमान वाहतूक, २४ तास पाणी!

By admin | Updated: December 3, 2015 03:37 IST

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या स्मार्ट आराखड्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा

- स्मार्ट सिटीचा आराखडा सादरपुणे : महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या स्मार्ट आराखड्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा, मल्टीलेव्हल पार्किंग, वाहतूक नियंत्रण केंद्र याच्या मदतीने गतिमान वाहतूक, २४ तास पाणीपुरवठा यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मॉडेल एरिया म्हणून विकसित करण्यासाठी निवड झालेल्या औंध, बाणेर भागासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद या आराखड्यात करण्यात आली आहे.स्मार्ट सिटीच्या आराखड्यामध्ये नागरिकांचा सहभाग असला पाहिजे, अशी अट केंद्र शासनाकडून घालण्यात आली होती. त्यानुसार वेगवेगळया टप्प्यांवर नागरिकांकडून सुचना, शिफारशी व त्यांचे मते आराखडा तयार करताना मागविण्यात आली होती. नागरिकांनी स्वच्छ व सुंदर पुण्याला पहिली पसंती दिली होती. तसेच वाहतूक समस्या प्राधान्याने सोडविली जाण्याची शिफारस केली होती. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या प्रस्तावित आराखड्यामध्ये वाहतूक समस्या, पाणीपुरवठा याला प्राधान्य देण्यात आले आहे.शहराची वाहतूक व्यवस्था अधिक गतीशील व्हावी, यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला आहे. बस थांब्याची सुधारणा, बसची देखभाल, बसमधील आयटीएमएस यंत्रणा याकरिता १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी ९५ कोटी, मल्टीलेव्हल पार्किंग सुविधेसाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत वाहतूक व्यवस्थेवर ५८५ कोटी रुपयांपर्यंत खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.शहराला २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासठी ३५५ ते ३७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, एसटीपी केंद्रातून ऊर्जा निर्मितीसाठी १० कोटी व त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी ६५ कोटी अशी ४५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. त्यामुळे शहराला मीटर पद्धतीने २४ तास पाणीपुरवठा करता येऊ शकणार आहे.स्मार्ट सिटी आराखड्यामध्ये मॉडेल एरिया म्हणून डेव्हलप करण्यासाठी एक क्षेत्र निवडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने औंध, बाणेर भागाची त्यासाठी निवड केली आहे. त्यानुसार तिथे स्मार्ट सिटीच्या संकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नदीसुधारणा, सोलर एनर्जी, स्मार्ट मीटरिंग, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांचे सुसूत्रीकरण, वाहनतळ, देखभाल दुरूस्ती, पाण्याचा पुनर्वापर आदी प्रयोग तिथे राबविले जाणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा सविस्तर आराखडा लवकरच संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. असा होईल औंध-बाणेरचा मॉडेल विकास1) मॉडेल एरिया म्हणून निवडलेल्या औंध-बाणेर येथे स्मार्ट सिटीच्या संकल्पनांचे प्रयोग केले जाणार आहेत. तेथील यशस्वीतेनंतर ते संपूर्ण शहरात राबविले जाणार आहेत. औंधमधून जाणाऱ्या नदीकाठी उद्यानाची उभारणी केली जाणार आहे, त्यासाठी १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2) सोलर एनर्जी प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी २८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाण्याच्या पुनर्वापरासाठी ९० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टी सुधारणा, वाहनतळ, ई-गव्हर्नन्स अ‍ॅक्टिव्हिटी तिथे राबविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर तिथील रस्त्यांचे सुसूत्रीकरण करून पदपथांची संख्या वाढविली जाणार आहे.