शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

उरुळी कांचनमध्ये डेंगीच्या रुग्णांत वाढ

By admin | Updated: November 15, 2015 00:46 IST

उरुळी कांचन परिसरात डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे़ मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांची डेंगीच्या आजाराची

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे़ मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांची डेंगीच्या आजाराची भीती दाखवून खाजगी दवाखाने, रुग्णालये व रक्त लघवी तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा अवाच्या सवा आकारणी करून करीत असलेल्या लुबाडणुक करीत आहेत़ या च्या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीय उरुळी कांचन बंदचे आयोजन करण्यात आले आहे़ राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व सर्व स्तरावरील आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ गावातील राममंदिरापासून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे़ हा मोर्चा संपूर्ण गावातून फिरुन ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येईल़ तेथे निषेध सभा होऊन ठप्प प्रशासनाविरुद्ध आवाज उठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे यांनी दिली. उरुळी कांचन गावात डेंगीसदृश्य रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून घरटी किमान एक तरी व्यक्ती या रोगाने बाधीत झाली आहे़ घाणीचे साम्राज्य व पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाईमुळे उरुळी कांचन येथे डेंगीचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की आज दुपारी मला याबाबतची माहिती मिळाली आहे, या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असून तातडीने सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावण्याचे आदेश दिले आहेत. डेंगी या जीवघेण्या आजाराचे रुग्ण उरुळी कांचन मधील तुपे वस्ती, डाळिंब रोड, आश्रम रोड व गावाचा मध्यवर्ती भाग व महात्मा गांधी विद्यालय रस्ता अशा परिसरात झपाट्याने वाढत आहेत मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत प्रशासन कासव गतीने चालत असून यावरील तातडीच्या उपाय योजना करण्यात अपयशी ठरल्याची खंत माजी सरपंच दत्तात्रय कांचन यांनी व्यक्त केली आहे़