शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

उन्हाच्या वाढत्या झळांमुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

इंदापूर : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या उन्हाच्या झळा वाढलेल्या असून, दिवसभर रस्त्यावर असणारी तोबा गर्दी अत्यंत अल्प प्रमाणात दिसू लागली ...

इंदापूर : इंदापूर तालुक्यामध्ये सध्या उन्हाच्या झळा वाढलेल्या असून, दिवसभर रस्त्यावर असणारी तोबा गर्दी अत्यंत अल्प प्रमाणात दिसू लागली आहे. तर याच उन्हाचा परिणाम इंदापूर शहराच्या बाजारपेठेवर झालेला दिसतो. रविवार आठवडी बाजार असताना देखील, उन्हाची तीव्रता व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव या दोन्ही कारणांमुळे इंदापूर शहरात सकाळपासून अत्यंत अल्प प्रमाणात गर्दी दिसत होती.

इंदापूर तालुक्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये फरक झालेला नव्हता. परंतु मागील वर्षापासून सातत्याने वातावरणात अत्यंत वेगाचा फरक असल्यामुळे व मागील काही आठवड्यांत वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस झाला. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. परंतु पावसाचे वातावरण जाताच पुन्हा सूर्य आग ओकायला लागला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी १२ वाजल्यापासून शहरातील रस्त्यावर नागरिकांची गर्दीही विरळ होताना दिसून येते. परंतु महत्त्वाच्या कामांसाठी तुरळक प्रमाणात नागरिक बाहेर पडताना दिसत आहे.

तर मागील आठ दिवसांपासून नागरिक उसाचा रस, ज्यूस, लिंबू सरबत तसेच आईस्क्रीमचे सेवन करताना दिसून येत होते. मात्र शासनाचे नवे नियम व कोरोना आजाराचे रुग्ण सध्या इंदापूर तालुक्यात वाढत असल्यामुळे पुन्हा या थंड पेयांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. तर काही ठिकाणी असे शीतपेय व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. तसेच गावोगावी काही प्रमाणात भरणारे आठवडे बाजार यावर उन्हाचा प्रचंड परिणाम झाला आहे.

वाढत्या तापमानाची झळ नागरिकांसोबतच जनावरांनासुध्दा बसत आहे. याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होत असल्याचे चित्र आहे.

यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी ओंकारनाथ ताटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या नागरिकांनी आपली व कुटुंबातील सर्व सदस्यांची खबरदारी घेण्याची गरज असून, या वर्षी सध्या तापमानवाढीला सुरुवात आहे. अशा वेळी नागरिकांनी तापमानाची माहिती घेण्यासाठी रेडिओ तसेच मोबाईलच्या माध्यमातून बातम्या पाहाव्या. शक्यतो पांढरे कपडे वापरून छत्री, गाॅगल वापरावा. जास्त बाहेर फिरू नये आहे, अशी माहिती डॉ. ताटे यांनी दिली.

नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये

इंदापूर शहरात व परिसरामध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे व इंदापूर शहर हे कोरोनामुक्त करण्यासाठी, नागरिकांनी खबरदारी म्हणून महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडले पाहिजे. उन्हाची तीव्रता देखील वाढलेली आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले आहे.

०४ इंदापूर

इंदापूर शहरातील बाजारपेठेत पसरलेला शुकशुकाट.