शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पशुधन घटल्याने शेणखत झाले दुर्मिळ

By admin | Updated: June 14, 2014 01:52 IST

मावळच्या ग्रामीण भागात पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेतीसाठी वरदान असणारे शेणखत, लेंडीखत दुर्मिळ झाले आहे

कामशेत : मावळच्या ग्रामीण भागात पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेतीसाठी वरदान असणारे शेणखत, लेंडीखत दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर शेतकरी जास्त करू लागले आहेत. मावळात लोणावळा, तळेगाव, देहूरोड ही शहरे सोडून सुमारे दीडशेहून अधिक गावे आहेत. सध्या तालुक्यात सुमारे १५ ते २० हजार एवढीच जनावरे आहेत. गावागावातून मागील २० वर्षांपासून असणारी जनावरांची लाखोंची संख्या कमी झाली आहे. जनावरांना चरण्यासाठीच्या गायरान, गायचरण, माळरानांची विक्री झाली. तेथे इमारती उभ्या राहिल्याने जनावरे पाळणेही कठीण झाले आहे. सुमारे ५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांकडे घरगुती दुग्ध उत्पादनासाठी गाय किंवा एखादी म्हैस आहे. कामासाठी एक बैलजोडी आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ५०, १०० जनावरांचा कळप अन् गोठाही काळाच्या ओघात नाहीसा झाला. पशुधनातून लेंडीखत मिळवून देणाऱ्या शेळ्याही कमी झाल्या आहेत. लेंडीखत व गाय, म्हैस, बैलापासून मिळणारे शेणखतही पूर्णपणे कमी झाले आहे. शेणखताचे उकिरडे, शेणकई आता दिसत नाही. शेतकरी घरासमोर खोल खड्डा खोदून त्यात शेण, लेंडीची साठवणूक करतात. गोठ्यातील वैरणीचा कचरा, घरगुती कचरा, यापासून वर्षभर या खड्ड्यात शेणखत तयार होते. आता मात्र शेणखत एका गावात पाच-सहा शेतकरीच तयार करतात. काही शेतकरी हे खत विकतातही. सध्या शेणखत २५०० रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने विक्री होत आहे. मात्र, तरीही खेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळे भात, भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात थेट रासायनिक खतांचा वारेमाप वापर सुरू केला आहे. यामुळे जमिनीचा पोतही खराब होतो. अन् उत्पादनही कमी होत चालले आहे. त्यामुळे रासायनिक खते शेतीला घातक ठरत आहेत.याबाबत कृषिअधिकारी पुरुषोत्तम वाणी म्हणाले, ‘‘जैविक खतनिर्मितीसाठी शासन अनुदान देते. परंतु, त्याला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. शेणखताची उपलब्धता कमी झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. त्यामुळे जमिनीचा पोत कमी होत आहे. (वार्ताहर)