शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

कामगारांचा वेतनवाढीसाठी अन्नत्याग

By admin | Updated: March 31, 2017 02:40 IST

महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील ‘केहिन फाय प्रा. लि.’ या कंपनीतील कामगारांचा गेल्या १९ महिन्यांपासून

आसखेड : महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील ‘केहिन फाय प्रा. लि.’ या कंपनीतील कामगारांचा गेल्या १९ महिन्यांपासून वेतनवाढ करार रखडला असल्याने कामगारांनी गेल्या दोन दिवसांपासून कंपनीत जेवणाचे डबे न आणता सलग आठ तास काम करून काहीही न खाता अन्नत्याग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या २ एप्रिलपासून कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण होणारच, या निर्णयावर कामगार ठाम राहिले आहेत. ‘केहिन फाय’ ही बहुराष्ट्रीय कंपनी २००० सालापासून चाकण येथील औद्योगिक वसाहतीत आहे. पण कामगारांची पगारवाढ गेल्या काही वर्षांपासून रखडलेली आहे. कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट व हलाखीची झाली आहे. पगारवाढ करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. व्यवस्थापनाने उत्पादनासंदर्भातील आपल्या मागण्यांचे निवेदन युनियनला सादर केले आहे. उत्पादनासंदर्भातील वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी त्याचे निकष ठरविण्यासाठी बाहेरील प्रमाणित संस्थेकडून कामाचे मोजमाप होणे गरजेचे आहे. यासंदर्भात युनियनने वारंवार लेखी व तोंडी व्यवस्थापनास कळवूनही आजतागायत वरील बाबींची पूर्तता व्यवस्थापनाकडून करण्यात आली नाही.कामगारांची पगारवाढ न करणाऱ्या केहिन फाय व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणाच्या निषेधार्थ केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय संभाजी गायकवाड हे येत्या २ एप्रिल २०१७ पासून आमरण उपोषणास बसणार आहेत.यासंदर्भात युनियनने व्यवस्थापनास कळविले असून, या बाबतीत केहिन फाय व्यवस्थापनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन, गेल्या दोन दिवसांपासून उपाशी राहून कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कामगार प्रतिनिधी शंकर गडदे यांनी सांगितले.