शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कामगारांचा वेतनवाढीसाठी अन्नत्याग

By admin | Updated: March 31, 2017 02:40 IST

महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील ‘केहिन फाय प्रा. लि.’ या कंपनीतील कामगारांचा गेल्या १९ महिन्यांपासून

आसखेड : महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील ‘केहिन फाय प्रा. लि.’ या कंपनीतील कामगारांचा गेल्या १९ महिन्यांपासून वेतनवाढ करार रखडला असल्याने कामगारांनी गेल्या दोन दिवसांपासून कंपनीत जेवणाचे डबे न आणता सलग आठ तास काम करून काहीही न खाता अन्नत्याग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या २ एप्रिलपासून कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण होणारच, या निर्णयावर कामगार ठाम राहिले आहेत. ‘केहिन फाय’ ही बहुराष्ट्रीय कंपनी २००० सालापासून चाकण येथील औद्योगिक वसाहतीत आहे. पण कामगारांची पगारवाढ गेल्या काही वर्षांपासून रखडलेली आहे. कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट व हलाखीची झाली आहे. पगारवाढ करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. व्यवस्थापनाने उत्पादनासंदर्भातील आपल्या मागण्यांचे निवेदन युनियनला सादर केले आहे. उत्पादनासंदर्भातील वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी त्याचे निकष ठरविण्यासाठी बाहेरील प्रमाणित संस्थेकडून कामाचे मोजमाप होणे गरजेचे आहे. यासंदर्भात युनियनने वारंवार लेखी व तोंडी व्यवस्थापनास कळवूनही आजतागायत वरील बाबींची पूर्तता व्यवस्थापनाकडून करण्यात आली नाही.कामगारांची पगारवाढ न करणाऱ्या केहिन फाय व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणाच्या निषेधार्थ केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय संभाजी गायकवाड हे येत्या २ एप्रिल २०१७ पासून आमरण उपोषणास बसणार आहेत.यासंदर्भात युनियनने व्यवस्थापनास कळविले असून, या बाबतीत केहिन फाय व्यवस्थापनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन, गेल्या दोन दिवसांपासून उपाशी राहून कंपनीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कामगार प्रतिनिधी शंकर गडदे यांनी सांगितले.