शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

धरणं रिकामी झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात टंचाई

By admin | Updated: June 13, 2014 05:01 IST

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणं १00 टक्के भरली होती. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा कमी बसल्या.

पुणे : गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणं १00 टक्के भरली होती. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा कमी बसल्या. मात्र ७ जूनला येणारा पाऊस अद्यपही न पडल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याची मागणी वाढून आता धरणंही रिकामी झाली आहेत. काही धरणांत फक्त गाळ उरला आहे. गावागावांतील पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. आठवडाभरात पावसाचे आगमन झाले नाही तर तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात ६ टक्के, नीरा देवघर धरणात फक्त १.६0 टक्के व वीर धरणात ६.६३ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात निम्मा गाळ आहे. यामुळे दोन्ही धरणांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ३५ नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. तालुक्यात २ महिने ७ टँकर व तीन पिकअपद्वारे १३ गावे, ३३ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या वाढणार आहे. नीरा देवघर व भाटघर धरण भागातील १३ गावे, ३३ वाड्यावस्त्यांना ७ टँकर व तीन पिकअप जीपमधून दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. (प्रतिनिधी)