शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

कोरोना व लाॅकडाऊनमुळे आंबा खरेदीला ग्राहकच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेले वर्षभर दर महिन्याला झालेला पाऊस, चक्रीवादळ, गारपीट या निसर्ग आपत्तीमुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये २०-२५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेले वर्षभर दर महिन्याला झालेला पाऊस, चक्रीवादळ, गारपीट या निसर्ग आपत्तीमुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये २०-२५ टक्के घट झाली. आता कोरोना आणि लाॅकडाऊनच्या संकटामुळे आंबा मार्केटमध्ये आणणे आणि विक्री करण्यात अनेक अडचणी येत आहे. यामुळेच आवक वाढली, पण लाॅकडाऊनमुळे अपेक्षित मागणी नसल्याने दर कमी झाले आहेत.

राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लाॅकडाऊन सुरू झाला. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेला लाॅकडाऊन आणि दुकाने सुरू ठेवण्यावर घातलेल्या मर्यादा यामुळे ऐन आंब्याच्या हंगामामध्ये ठोक बाजारातून आंब्याची उचल निम्म्याने घटली असून दरातही घसरण झाली आहे. याचा फटका विक्रेते आणि आंबा उत्पादकांना शेतकऱ्यांना बसला आहे.

पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सध्या रत्नागिरी हापूस आंब्याची दररोज तीन ते साडे तीन हजार पेट्यांची आवक होते. तर सर्वाधिक आवक कर्नाटक हापूस आंब्याची दररोज २५-३० हजार पेट्याची आवक होते. याशिवाय केशर आणि गावरान आंब्याची देखील आवक सुरू झाली आहे.

--------

आंब्याचा काय दर (प्रती किलो)

रिटेल होलसेल

हापूस (रत्नागिरी) डझन ६००-८०० ४००-६००

हापूस (कर्नाटक) - ७०-१०० ४५-६५

केशर - ८०-१०० ४०-७०

पायरी - ४०-५० ३०-४०

--

आवक वाढली, ग्राहक रोडावले

सध्या जिल्ह्यात आंब्याचा हंगाम जोमात आहे, पण लाॅकडाऊनमुळे आवक मोठ्या प्रमाणात होऊन देखील तुलनेत ग्राहक खूपच कमी आहेत. सध्या पुणे शहरात दिवसाला सुमारे ३० ते ३५ हजार पेट्या आंब्याची आवक होते, पण त्या तुलनेत ग्राहक नाही. यामुळे दर पडले आहेत.

-------

घरपोच सेवेवर अधिक भर

सध्या सुरू असलेले लाॅकडाऊन आणि वेळीची मर्यादा यामुळे ऐन हंगामात आंब्याचा व्यापार करणे खूप कठीण झाले आहे. तयार आंबा बाजारात उपलब्ध असताना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते. आतापर्यंत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ग्राहकांना तयार आंबा मिळणे कठीण असायचे. पण यंदा कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे उलटी परिस्थिती आहे. यामुळेच व्यापाऱ्यांना होमडिलिव्हरी हा एकमेव पर्याय आहे.

- अरविंद मोरे, आंब्याचे व्यापारी

--

आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

निसर्ग आपत्ती आणि कोरोना व लाॅकडाऊनचे संकट यामुळे आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. निर्सगामुळे उत्पादनात २०-२५ टक्के घट झाली, तर कोरोना, लाॅकडाऊनमुळे मार्केटमध्ये मालाला उठाव नसल्याने अपेक्षित दर मिळत नाही.

- मकरंद काणे, शेतकरी, रत्नागिरी