शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

आरक्षण अर्जातल्या बदलांमुळे प्रवाशांना तिकिटास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:12 IST

‘वेटिंग’चा वाढला त्रास : अर्ज भरण्यास लागतात दोन मिनिटे प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेचे आरक्षित ...

‘वेटिंग’चा वाढला त्रास : अर्ज भरण्यास लागतात दोन मिनिटे

प्रसाद कानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेल्वेचे आरक्षित तिकीट काढण्यासाठीच्या अर्जात विचारण्यात येत असलेल्या माहितीमुळे प्रवाशांना अर्ज भरण्यास उशीर लागत आहे. अर्जातच जास्त माहिती असल्याने तिकीट काढतानादेखील वेळ लागत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना ‘वेटिंग’ मिळत आहे. अनेकदा ‘वेटिंग’ तिकीट नको म्हणून प्रवाशांना जास्तीची रक्कम देऊन तत्काळ कोट्यातून तिकीट काढावे लागत आहे. म्हणजे दोन्हीकडून प्रवाशांचे नुकसान होत आहे.

पहिल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आरक्षण फॉर्मात बदल केला. यात प्रवाशांचे नाव, पत्ता यासह तो कोणत्या शहरात जात आहे, का जात आहे, तिथला पूर्ण पत्ता, पिन कोडसह सर्व तपशील अर्जात लिहावा लागतो. त्यावेळी विलगीकरण केले जात होते. अशा स्थितीत प्रवाशांचा स्थानिक प्रशासनाला शोध घेण्यास मदत मिळावी म्हणून हा निर्णय घेतला गेला. मात्र, याचा फारसा फायदा झालाच नाही.

उलट प्रवाशांनाच फटका बसत आहे. आजही पद्धत सुरूच आहे. अनेकदा प्रवासी यात चुकीची माहिती देतात. त्यामुळे माहिती घेण्याचा उद्देशच सफल होत नाही. मात्र, या अनावश्यक माहिती देण्यासाठी लागणाऱ्या वेळामुळे पूर्वी ३० ते ४० सेकंदात मिळणाऱ्या तिकिटासाठी आता दीड ते दोन मिनिटे थांबावे लागत आहे. परिणामी, ‘जनरल कोट्या’सोबत तत्काळ कोट्याला देखील प्रतीक्षा आहे.

चौकट

लांब पल्ल्याच्या गाड्या लगेच ‘फुल्ल’

रेल्वे आरक्षण केंद्रावरून तिकीट काढताना प्रवाशांना संपूर्ण माहिती लिहून तो अर्ज घेऊन रांगेत उभे राहावे लागते. आरक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यास एक अर्ज संगणक भरण्यास वेळ लागतो. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यासाठीचा तत्काळ कोटा काही मिनिटांतच भरून जातो. अनेकांना ‘वेटिंग’ तिकीट मिळत आहे.

चौकट

‘ऑनलाईन एजंटां’च्या पथ्यावर

“रेल्वे आरक्षण केंद्रावरून तिकिटे उशिरा व वेटिंग मिळत असल्याने तिकिटे कन्फर्म मिळावी म्हणून अनेक प्रवासी ऑनलाईन एजंटकडे वळत आहेत. एजंट फॉर्ममधील सर्व माहिती आधीच संगणकात भरून ठेवतो. कोट्याची वेळ सुरू झाली की तो फक्त एंटर मारून तिकीट काढतो. यासाठी तो प्रवाशांकडून जास्तीचे दर आकारून तिकीट देतो. प्रवासी देखील कन्फर्म तिकीट मिळत असल्याने एजंटला जास्तीचे पैसे देण्यास तयार होतात.

चौकट

“हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. यात पुणे विभागाची कोणती भूमिका नाही. जेव्हा तो रद्द होईल तेव्हा कळविले जाईल.”

-

मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग , पुणे

चौकट

“संक्रमित प्रवाशांचा शोध तत्काळ लागावा म्हणून रेल्वे प्रशासनाने कोरोनाकाळात आवश्यक बदल केले. आता अनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरू झाले. स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणे देखील बंद झाले आहे. अशात ही माहिती जमा करणे पूर्वी इतके गरजेचे राहिले नाही. किंबहुना हे आता प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे आरक्षण फॉर्म पूर्वीप्रमाणे करावे.”

-निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे.